शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

नियोजन समितीच्या निधीला दोन वर्षांपासून लागतेय कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:13 IST

वाढीव निधी मिळण्याची गरज

ठळक मुद्दे मिळणारा निधी समस्यांच्या १० टक्केही नाहीरस्त्यांचा निधी गेला पाण्यात

जळगाव: राज्यातील अन्य काही जिल्हा नियोजन समित्यांना १५ ते २० टक्के वाढीव निधी दरवर्षी मिळत असताना जळगाव जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या निधी मात्र गेल्या दोन वर्षांपासून कपातच होत असल्याचे दिसून येत आहे. आधीच उपलब्ध होणारा एकूण निधी हा जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक निधीच्या १० टक्के देखील नसताना त्यास कात्री लावली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान सोमवारी तब्बल ९ महिन्यांच्या कालावधीनंतर डीपीसीची बैठक होत असल्याने सदस्य संतप्त असले तरी देखील ही बैठकही घाईगर्दीतच उरकली जाण्याची शक्यता आहे.रस्त्यांचा निधी गेला पाण्यातगेल्या सहा वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या कामासाठी व दुरुस्तीसाठी तब्बल ३५१ कोटी रूपये खर्च झाले असले तरीही जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची अवस्था बिकट आहे. कामाचा दर्जा राखला जात नसल्याने तसेच बैलगाडी, ट्रॅक्टरसारख्या वाहनांचा सातत्याने वापर असल्याने या रस्त्यांचे काही महिन्यांमध्येच तीनतेरा होत असल्याने परिस्थिती जैसे-थेच दिसून येत आहे. याउलट मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही मक्तेदारावरच असल्याने या रस्त्यांची अवस्था ५ वर्ष चांगलीच राहणार आहे. त्यामुळेच नियोजनकडील रस्त्यांचा निधी शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकडे वळविला आहे. मात्र त्यापूर्वी गेल्या ६ वर्षात रस्त्यांवर खर्च झालेला ३५१ कोटींचा निधी मात्र पाण्यात गेला आहे. आधीच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी हजारो कोटींच्या निधीची गरज असताना तुलनेत कमी निधी मिळतो. अशा परिस्थिती नियोजनच्या माध्यमातून खर्च झालेल्या निधीतील रस्त्यांची कामे ही जेमतेम वर्षभरही टिकू न शकल्याने आज या रस्त्यांची चाळणी झालेली दिसून येत आहे. पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्हा व राज्य तसेच राष्टÑीय महामार्गावर खड्डेमुक्त अभियान राबविले. त्यात काही प्रमाणात खड्डे कमी करण्यात यशही आले. तशीच मोहीम ग्रामीण रस्त्यांसाठी देखील राबविण्याची घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती मोहीम देखील राबविण्याची गरज आहे.निधीला लागतेय कात्रीजिल्हा नियोजन समितीचे वार्षिक अंदाजपत्रक हे २०१६-१७ मध्ये ४५७ कोटी मंजूर असताना दोन वर्षात मात्र शासनाने या निधीला कात्री लावली आहे. २०१८-१९ साठी ४५१ कोटींचा नियतव्यय मंज़ूर केला आहे. वास्तविक जिल्ह्यासाठी खरी गरज १०८२ कोटींची असताना हा ४५१ कोटींचा निधी अत्यंत तोकडा आहे.शहरी भागावर अन्यायजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण दोन्ही भागांवर लोकसंख्येच्या तुलनेत निधी खर्च करणे अपेक्षित असताना तसे होताना दिसत नाही. नागरी भागाला अत्यल्प निधी दिला जातो. तर ग्रामीणभागासाठी उपलब्ध करून दिला जाणारा निधी हा तेथील समस्यांच्या तुलनेत अत्यल्प असल्याने सगळ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम सुरू आहे.नाविन्यपूर्ण योजनेत हायमास्ट अन् संरक्षक भिंतीजिल्हा नियोजन समितीला निधी खर्च करण्यासाठी शासनानेच वेगवेगळे हेड ठरवून दिलेले असल्याने ठरलेल्या हेडखालील निधी त्याच कामांसाठी खर्च करावा लागतो. अन्य कामाला तो वापरता येत नाही. त्यामुळे समितीचे अधिकार मर्यादित झालेले आहेत. त्यातच नाविन्य पूर्ण योजना हे एक लेखाशिर्ष शासनाने उपलब्ध करून दिले आहे. त्यातून नवीन, नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधी देता येऊ शकतो. मात्र जिल्ह्यात हा निधी प्रामुख्याने हायमास्ट बसविणे, संरक्षक भिंती बांधणे यासारख्या कामांवरच खर्च केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.