शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

जामनेरच्या राजकारणावर महाविकास आघाडीच्या परिणामाची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 14:51 IST

विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल एक महिन्यानंतर राजकीय अस्थिरता संपली. भाजपला बाजूला सारून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याने त्याचे भविष्यात तालुक्याच्या राजकारणावर काय व कसे परिणाम होतील याची चर्चा सत्ताधारी व विरोधक भाजप कार्यकर्ते करीत आहे.

ठळक मुद्दे‘महाविकास आघाडी’नंतर...ग्राम पंचायत निवडणुकीमुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहू शकतेपंचायत समितीत शिवसेनेचा एकही सदस्य नसला तरी राष्ट्रवादीचे तीन सदस्यजिल्हा परिषदेत सरोजिनी गरुड व प्रमिला पाटील या राष्ट्रवादीच्या दोन सदस्या

मोहन सारस्वतजामनेर, जि.जळगाव : विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल एक महिन्यानंतर राजकीय अस्थिरता संपली. भाजपला बाजूला सारून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याने त्याचे भविष्यात तालुक्याच्या राजकारणावर काय व कसे परिणाम होतील याची चर्चा सत्ताधारी व विरोधक भाजप कार्यकर्ते करीत आहे. जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण व पालकमंत्रिपद भूषविलेल्या गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात प्रबळ असलेल्या भाजपला रोखण्याचे काम महाविकास आघाडी कसे करते हे नजीकच्या काळात दिसून येईलच.तालुक्यातील ग्राम पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपचे बहुमत असून सहकारी संस्थेतदेखील भाजपने ईश्वरलाल जैन गटाशी हात मिळवणी करून सत्ता हस्तगत केली आहे. २५ वर्षांपासून महाजन आमदार असून त्यातील १५ वर्षे त्यांनी विरोधात काढली. १० वर्षे मिळालेल्या सत्तेपैकी पाच वर्षे त्यांना मंत्रिपद मिळाले. गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी खेचून आणला. जामनेर पालिकेच्या माध्यमातून सुमारे ३०० कोटींची कामे केली काही सुरू आहेत.२०१४ नंतर राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार असले तरी तालुक्यात शिवसेना पाहिजे तशी पाय रोऊ शकली नाही. शिवसेनेला वाढू न देण्यामागे मित्र पक्षच असल्याची भावना शिवसैनिकांच्या मनात आहे.पंचायत समितीत शिवसेनेचा एकही सदस्य नसला तरी राष्ट्रवादीचे मात्र तीन सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत सरोजिनी गरुड व प्रमिला पाटील या दोन राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पुढील वर्षी बाजार समिती व शेतकरी संघाची निवडणूक होऊ घातल्याने यात महाविकास आघाडी उतरण्याची दात शक्यता आहे. याचबरोबर काही ग्राम पंचायत निवडणूक होणार असल्याने त्यातही भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहू शकते.पाच वर्षे सत्तेत राहिलेल्या भाजपला पुन्हा विरोधकाची भूमिका वठवावी लागणार आहे. सत्तांतरानंतर विविध शासकीय समित्यांची पुनर्रचना झाल्यास आघाडीतील कुणास यात संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. असे असले तरी गिरीश महाजन हेच आमदार असल्याने फारसा काही फरक पडेल, असे वाटत नाही, अशी शक्यता वाटते.

टॅग्स :PoliticsराजकारणJamnerजामनेर