शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाची उत्सुकता, जल्लोष, निराशा अन् नाराजीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील ७० गावांच्या ग्रामपंचायतींच्या २०२० ते २०२५ या कालावधीसाठीची आरक्षण सोडत गुरूवारी सकाळी पंचायत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील ७० गावांच्या ग्रामपंचायतींच्या २०२० ते २०२५ या कालावधीसाठीची आरक्षण सोडत गुरूवारी सकाळी पंचायत समितीच्या सभागृहात निघाली. त्यावेळी जेथे निवडून आलेल्या सदस्यांच्या पसंतीचे आरक्षण निघाले तेथील सदस्यांनी जल्लोष केला. तर काही गावांतील राजकारण्यांनी आरक्षणाच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली.

तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यासोबत सर्व ७० ग्रामपंचायतींचे २०२० ते २०२५ या कालावधीसाठी आरक्षण लागु करण्यात आले. त्यात तहसीलदार नामदेव पाटील यांनी सकाळी ११ वाजता बैठक घेत ४२ ग्रामपंचायतींना आरक्षण लागु करायचे आहे. त्यांना आरक्षण लागु केले. या आरक्षणाच्या प्रक्रियेनंतर दुपारी चार वाजता प्रांतअधिकारी प्रसाद मते यांनी ४२ पैकी २१ ग्रामपंचायतींना महिला प्रवर्गाचे आरक्षण सोडत काढली.

तर उरलेल्या २८ खुल्या प्रवर्गातील ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतींना महिलांचे आरक्षण लागु करण्यात आले.

तहसिलदारांविरोधात नाराजी

आरक्षणाची वेळ जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जळगाव तालुक्यासाठी दुपारी ४ वाजेची जाहीर करण्यात आली होती. मात्र तहसीलदार नामदेव पाटील यांनी सकाळी ११ वाजता बैठक घेऊन तालुक्यातील ग्रामपंचायतींना आरक्षण जाहीर केले. त्यांनी घेतलेल्या बैठकीच्या वेळेची माहिती तालुक्यातील ग्रामस्थांना नव्हती. त्यामुळे अनेकांनी या बाबत नाराजी व्यक्त केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ

तालुक्यातील काही गावांमध्ये विशिष्ट गटात महिला प्रवर्गाचे आरक्षण देण्यात आले आहे. मात्र त्या गावात त्यासाठी पात्र ठरु शकेल अशी एकही महिला सदस्य नाही. त्यामुळे या गावातील पुढाऱ्यांनी तहसीलदार आणि प्रांत अधिकारी मते यांच्याशी वादही घातला. त्यावर अन्य गटात मात्र महिला राखीवच आरक्षण मिळु शकेल, असे सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी लागणार आहे. किंवा तहसिलदार स्वत: त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देतील.

शिरसोली प्र.नमध्ये एस.टी. राखीवचे आरक्षण, मात्र सदस्यच नाही

शिरसोली प्र.न.गावांमध्ये एस.टी.महिला राखीव प्रवर्गाचे आरक्षण लागु झाले आहे. मात्र या गावातील १७ सदस्यांपैकी एकही सदस्य एस.टी. महिला नाही. येथे एस.टी. साठी एक प्रभाग राखीव आहे. तेथे सदस्यासाठी महिला आरक्षण नव्हते. त्यामुळे तेथे सरपंच कसा निवडून येणार, असा पेच उभा राहिला आहे.