शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

आरक्षणाची उत्सुकता, जल्लोष, निराशा अन् नाराजीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील ७० गावांच्या ग्रामपंचायतींच्या २०२० ते २०२५ या कालावधीसाठीची आरक्षण सोडत गुरूवारी सकाळी पंचायत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील ७० गावांच्या ग्रामपंचायतींच्या २०२० ते २०२५ या कालावधीसाठीची आरक्षण सोडत गुरूवारी सकाळी पंचायत समितीच्या सभागृहात निघाली. त्यावेळी जेथे निवडून आलेल्या सदस्यांच्या पसंतीचे आरक्षण निघाले तेथील सदस्यांनी जल्लोष केला. तर काही गावांतील राजकारण्यांनी आरक्षणाच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली.

तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यासोबत सर्व ७० ग्रामपंचायतींचे २०२० ते २०२५ या कालावधीसाठी आरक्षण लागु करण्यात आले. त्यात तहसीलदार नामदेव पाटील यांनी सकाळी ११ वाजता बैठक घेत ४२ ग्रामपंचायतींना आरक्षण लागु करायचे आहे. त्यांना आरक्षण लागु केले. या आरक्षणाच्या प्रक्रियेनंतर दुपारी चार वाजता प्रांतअधिकारी प्रसाद मते यांनी ४२ पैकी २१ ग्रामपंचायतींना महिला प्रवर्गाचे आरक्षण सोडत काढली.

तर उरलेल्या २८ खुल्या प्रवर्गातील ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतींना महिलांचे आरक्षण लागु करण्यात आले.

तहसिलदारांविरोधात नाराजी

आरक्षणाची वेळ जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जळगाव तालुक्यासाठी दुपारी ४ वाजेची जाहीर करण्यात आली होती. मात्र तहसीलदार नामदेव पाटील यांनी सकाळी ११ वाजता बैठक घेऊन तालुक्यातील ग्रामपंचायतींना आरक्षण जाहीर केले. त्यांनी घेतलेल्या बैठकीच्या वेळेची माहिती तालुक्यातील ग्रामस्थांना नव्हती. त्यामुळे अनेकांनी या बाबत नाराजी व्यक्त केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ

तालुक्यातील काही गावांमध्ये विशिष्ट गटात महिला प्रवर्गाचे आरक्षण देण्यात आले आहे. मात्र त्या गावात त्यासाठी पात्र ठरु शकेल अशी एकही महिला सदस्य नाही. त्यामुळे या गावातील पुढाऱ्यांनी तहसीलदार आणि प्रांत अधिकारी मते यांच्याशी वादही घातला. त्यावर अन्य गटात मात्र महिला राखीवच आरक्षण मिळु शकेल, असे सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी लागणार आहे. किंवा तहसिलदार स्वत: त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देतील.

शिरसोली प्र.नमध्ये एस.टी. राखीवचे आरक्षण, मात्र सदस्यच नाही

शिरसोली प्र.न.गावांमध्ये एस.टी.महिला राखीव प्रवर्गाचे आरक्षण लागु झाले आहे. मात्र या गावातील १७ सदस्यांपैकी एकही सदस्य एस.टी. महिला नाही. येथे एस.टी. साठी एक प्रभाग राखीव आहे. तेथे सदस्यासाठी महिला आरक्षण नव्हते. त्यामुळे तेथे सरपंच कसा निवडून येणार, असा पेच उभा राहिला आहे.