शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सार्वजनिक ठिकाणावरील गर्दी अजून काही दिवस टाळावी -प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 22:51 IST

आगामी दिवसात नागरिकांनी अजून काही दिवस प्रशासनास सहकार्य करण्यासाठी सार्वजनिक स्थळावरील गर्दी टाळावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे.

यावल, जि.जळगाव : रावेर-यावल तालुक्यातील नागरिकांनी दक्ष राहिल्यानेच कोरोना संसर्गापासून नागरिक दूर आहेत. ही बाब दोन्ही तालुकावासीयासाठी दिलासादायक असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. आगामी दिवसात नागरिकांनी अजून काही दिवस प्रशासनास सहकार्य करण्यासाठी सार्वजनिक स्थळावरील गर्दी टाळावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे.प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, लॉॅकडाऊन हे मुख्यत: आपल्या सर्वांच्या सुरक्षितेसाठी आहे. याचा मुख्य उद्देश हा कोरोनाची साखळी तोडणे हा आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंचे पालन करणे, सतत हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. मागील एक महिन्यापासून आपण त्याचे तंतोतंत पालन करत आहोत.मास्क न वापरणारे आणि आणि विनाकारण गाडीवर फिरणारे यांच्याकडून एक लाख रुपयांपेक्षा जास्त दंड प्रशासनाने वसूल केला आहे.परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून फैजपूर उपविभागात एक हजार रुग्णांसाठी आवश्यक सुविधांसह सेंटर उभे केले आहे.प्रत्येक गावात आणि शहरांमध्ये बाहेरून येणाऱ्यांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. या कक्षांमध्ये आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त नागरिक राहत आहेत.सर्व डॉक्टर, पोलीस, शिक्षक, आरोग्य सेविका, आशावर्कर, प्रशासकीय यंत्रणा चांगल्याप्रकारे काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याYawalयावल