शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

जामनेरला गुरुवार बंदमुळे शुक्रवारी वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 22:29 IST

गुरुवारी भरणारा आठवडे बाजार व नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलले असले तरी नागरिक गुरुवारऐवजी शुक्रवारी बाजारपेठेत मोठ्या संख्येने गर्दी करीत आहे.

जामनेर, जि.जळगाव : प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या सहमतीने गुरुवार या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी भरणारा आठवडे बाजार व नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलले असले तरी नागरिक गुरुवारऐवजी शुक्रवारी बाजारपेठेत मोठ्या संख्येने गर्दी करीत आहे. यापेक्षा गुरुवारीदेखील बाजारपेठ सुरु ठेवली तर शुक्रवारी होणारी गर्दी टाळता येईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.गेल्या पाच महिन्यांपासून आठवडे बाजार बंद आहे. लॉकडाऊननंतर अनलॉक तीन सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात निर्बंध उठविण्यात आले. यामुळे आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यास मदत होत आहे. खरेदीसाठी एकाच दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमित पूर्णवेळ बाजारपेठ सुरू राहिली तर गर्दी कमी होईल, असे बोलले जात आहे.दरम्यान, सध्या आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांमध्ये वाढ केल्याने शहर व ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होते म्हणून बाधित वाढतात, असे म्हणणे संयुक्तिक ठरत नाही. गेल्या महिन्यात सलग सात दिवस बंद असतानाही शहरात बाधित निघतच होते. सध्या शहराची स्थिती ग्रामीण भागाच्या तुलनेत सुधारत आहे.‘बंद’ची सक्ती न करता नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती करणे, शारीरिक अंतर ठेवण्यास प्रवृत्त करणे, याबाबत नगरपालिका प्रशासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJamnerजामनेर