शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

खड्ड्यांची शर्यंत पार करीत जिल्ह्यात सर्व मार्गांवर लालपरिच्या फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST

जळगाव : यंदा पावसाळ्यात अनेक रस्त्यांची चाळण झाली. विशेषत : ग्रामीण भागातील रस्त्याची तर अधिकच दुरवस्था झाली आहे. असे ...

जळगाव : यंदा पावसाळ्यात अनेक रस्त्यांची चाळण झाली. विशेषत : ग्रामीण भागातील रस्त्याची तर अधिकच दुरवस्था झाली आहे. असे असतांना महामंडळातर्फे `सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी ` या ब्रीद वाक्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व मार्गांवर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवाशांना सुविधा देतांना बसच्या मेन्टेंन्सचा खर्चही वाढला असल्याचे महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

कोरोनामुळे यंदाही एसटी महामंडळाची सेवा तीन महिने ठप्प होती. जून पासून शासनाने टप्प्या-टप्प्याने अनलॉक करायला सुरूवात केल्यानंतर महामंडळाच्या जळगाव विभागातर्फेही टप्प्या-टप्प्याने बससेवा सुरू करण्यात आली. आता तर शासनाने १५ ऑगस्ट पासून सर्वत्र अनलॉक केल्यामुळे महामंडळातर्फे सर्व मार्गांवर बससेवा सुरू करण्यात आली आहे. वेळापत्रकाप्रमाणे शहरी व ग्रामीण मार्गावर बसेस धावत आहेत. मात्र, महामार्गालगतचे काही गावे वगळता इतर गावांच्या मार्गाची अतिशय दुरवस्था झाली आहे. आधीच रस्त्यांची दुरवस्था झाली असतांना, त्यात यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यांची अधिकच चाळण झाली आहे. मात्र, तरीदेखील प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळातर्फे ९० टक्के गावांना बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, ही सुविधा देतांना रस्त्यांची दुरवस्थेमुळे बसच्या मेटेंनन्सवर मोठा खर्च निघत असल्यामुळे, उत्पन्ना पेक्षा खर्चच महाग, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे महामंडळाच्या सुत्रांनी सांगितले.

ईन्फो :

सरू असलेल्या बसेस

जळगाव ते औरंगाबाद

जळगाव ते चोपडा

जळगाव ते भुसावळ

जळगाव ते रावेर

जळगाव ते भादली

इन्फो :

औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेसचा मार्ग वळविला

अनलॉकनंतर महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे सर्व मार्गांवर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात चाळीसगाव येथे झालेल्या पुराच्या परिस्थितीमुळे चाळीसगाव ते औरंगाबाद हा रस्ता पूर्णत :बंद आहे. त्यामुळे सध्या चाळीसगावहून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेस या न्यायडोंगरी मार्गे औरंगाबादला जात असल्याचे चाळीसगाव आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

अनलॉक नंतर जिल्ह्यातील सर्व गावांच्या मार्गावर महामंडळाच्या बस फेऱ्या सुरू आहेत. काही गावांना रस्त्यांची दुरवस्था असली तरी, प्रवाशांच्या सुविधेसाठी बसेस जात आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे काही प्रमाणात मेन्टेंन्सचा खर्च वाढतो.

दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी.