शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांची शर्यंत पार करीत जिल्ह्यात सर्व मार्गांवर लालपरिच्या फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST

जळगाव : यंदा पावसाळ्यात अनेक रस्त्यांची चाळण झाली. विशेषत : ग्रामीण भागातील रस्त्याची तर अधिकच दुरवस्था झाली आहे. असे ...

जळगाव : यंदा पावसाळ्यात अनेक रस्त्यांची चाळण झाली. विशेषत : ग्रामीण भागातील रस्त्याची तर अधिकच दुरवस्था झाली आहे. असे असतांना महामंडळातर्फे `सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी ` या ब्रीद वाक्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व मार्गांवर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवाशांना सुविधा देतांना बसच्या मेन्टेंन्सचा खर्चही वाढला असल्याचे महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

कोरोनामुळे यंदाही एसटी महामंडळाची सेवा तीन महिने ठप्प होती. जून पासून शासनाने टप्प्या-टप्प्याने अनलॉक करायला सुरूवात केल्यानंतर महामंडळाच्या जळगाव विभागातर्फेही टप्प्या-टप्प्याने बससेवा सुरू करण्यात आली. आता तर शासनाने १५ ऑगस्ट पासून सर्वत्र अनलॉक केल्यामुळे महामंडळातर्फे सर्व मार्गांवर बससेवा सुरू करण्यात आली आहे. वेळापत्रकाप्रमाणे शहरी व ग्रामीण मार्गावर बसेस धावत आहेत. मात्र, महामार्गालगतचे काही गावे वगळता इतर गावांच्या मार्गाची अतिशय दुरवस्था झाली आहे. आधीच रस्त्यांची दुरवस्था झाली असतांना, त्यात यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यांची अधिकच चाळण झाली आहे. मात्र, तरीदेखील प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळातर्फे ९० टक्के गावांना बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, ही सुविधा देतांना रस्त्यांची दुरवस्थेमुळे बसच्या मेटेंनन्सवर मोठा खर्च निघत असल्यामुळे, उत्पन्ना पेक्षा खर्चच महाग, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे महामंडळाच्या सुत्रांनी सांगितले.

ईन्फो :

सरू असलेल्या बसेस

जळगाव ते औरंगाबाद

जळगाव ते चोपडा

जळगाव ते भुसावळ

जळगाव ते रावेर

जळगाव ते भादली

इन्फो :

औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेसचा मार्ग वळविला

अनलॉकनंतर महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे सर्व मार्गांवर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात चाळीसगाव येथे झालेल्या पुराच्या परिस्थितीमुळे चाळीसगाव ते औरंगाबाद हा रस्ता पूर्णत :बंद आहे. त्यामुळे सध्या चाळीसगावहून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेस या न्यायडोंगरी मार्गे औरंगाबादला जात असल्याचे चाळीसगाव आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

अनलॉक नंतर जिल्ह्यातील सर्व गावांच्या मार्गावर महामंडळाच्या बस फेऱ्या सुरू आहेत. काही गावांना रस्त्यांची दुरवस्था असली तरी, प्रवाशांच्या सुविधेसाठी बसेस जात आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे काही प्रमाणात मेन्टेंन्सचा खर्च वाढतो.

दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी.