शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

खड्ड्यांची शर्यंत पार करीत जिल्ह्यात सर्व मार्गांवर लालपरिच्या फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST

जळगाव : यंदा पावसाळ्यात अनेक रस्त्यांची चाळण झाली. विशेषत : ग्रामीण भागातील रस्त्याची तर अधिकच दुरवस्था झाली आहे. असे ...

जळगाव : यंदा पावसाळ्यात अनेक रस्त्यांची चाळण झाली. विशेषत : ग्रामीण भागातील रस्त्याची तर अधिकच दुरवस्था झाली आहे. असे असतांना महामंडळातर्फे `सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी ` या ब्रीद वाक्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व मार्गांवर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवाशांना सुविधा देतांना बसच्या मेन्टेंन्सचा खर्चही वाढला असल्याचे महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

कोरोनामुळे यंदाही एसटी महामंडळाची सेवा तीन महिने ठप्प होती. जून पासून शासनाने टप्प्या-टप्प्याने अनलॉक करायला सुरूवात केल्यानंतर महामंडळाच्या जळगाव विभागातर्फेही टप्प्या-टप्प्याने बससेवा सुरू करण्यात आली. आता तर शासनाने १५ ऑगस्ट पासून सर्वत्र अनलॉक केल्यामुळे महामंडळातर्फे सर्व मार्गांवर बससेवा सुरू करण्यात आली आहे. वेळापत्रकाप्रमाणे शहरी व ग्रामीण मार्गावर बसेस धावत आहेत. मात्र, महामार्गालगतचे काही गावे वगळता इतर गावांच्या मार्गाची अतिशय दुरवस्था झाली आहे. आधीच रस्त्यांची दुरवस्था झाली असतांना, त्यात यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यांची अधिकच चाळण झाली आहे. मात्र, तरीदेखील प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळातर्फे ९० टक्के गावांना बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, ही सुविधा देतांना रस्त्यांची दुरवस्थेमुळे बसच्या मेटेंनन्सवर मोठा खर्च निघत असल्यामुळे, उत्पन्ना पेक्षा खर्चच महाग, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे महामंडळाच्या सुत्रांनी सांगितले.

ईन्फो :

सरू असलेल्या बसेस

जळगाव ते औरंगाबाद

जळगाव ते चोपडा

जळगाव ते भुसावळ

जळगाव ते रावेर

जळगाव ते भादली

इन्फो :

औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेसचा मार्ग वळविला

अनलॉकनंतर महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे सर्व मार्गांवर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात चाळीसगाव येथे झालेल्या पुराच्या परिस्थितीमुळे चाळीसगाव ते औरंगाबाद हा रस्ता पूर्णत :बंद आहे. त्यामुळे सध्या चाळीसगावहून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेस या न्यायडोंगरी मार्गे औरंगाबादला जात असल्याचे चाळीसगाव आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

अनलॉक नंतर जिल्ह्यातील सर्व गावांच्या मार्गावर महामंडळाच्या बस फेऱ्या सुरू आहेत. काही गावांना रस्त्यांची दुरवस्था असली तरी, प्रवाशांच्या सुविधेसाठी बसेस जात आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे काही प्रमाणात मेन्टेंन्सचा खर्च वाढतो.

दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी.