शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

पीक विमा योजनेचा घोळ

By admin | Updated: July 18, 2014 12:41 IST

हवामानावर आधारित कृषी पीक विमा योजनेत किती लाभार्थी झाले याची नेमकी माहिती कृषी विभागाकडे नसतानाच जुनी कृषी पीक विमा योजना सुधारितरीत्या लागू करण्याचा धडाका सुरू झाला आहे.

 

 
जळगाव : हवामानावर आधारित कृषी पीक विमा योजनेत किती लाभार्थी झाले याची नेमकी माहिती कृषी विभागाकडे नसतानाच जुनी कृषी पीक विमा योजना सुधारितरीत्या लागू करण्याचा धडाका सुरू झाला आहे. 
अर्थातच सुधारित कृषी पीक विमा योजनेबाबत नेमक्या मार्गदर्शक सूचना अद्यापही कृषी विभागाला प्राप्त झालेल्या नाहीत. यामुळे विमा काढण्यासाठी इच्छुक शेतकरी व कर्जदार शेतकरी यांना वणवण करावी लागत आहे. 
या खरीप हंगामात प्रथमच हवामानावर आधारित कृषी पीक विमा योजना लागू केली. त्यात कापूस, उडीद, मूग, ज्वारी या पिकांचा समावेश होता. या योजनेतून बिगर कर्जदार असलेल्या सुमारे १0 हजार शेतकर्‍यांनी विमा काढून घेतला आहे. परंतु कर्जदार शेतकर्‍यांचा विमा काढला की नाही याची नेमकी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी विभागाकडे नाही. 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किसन मुळे यांना विचारले असता हवामानावर आधारित कृषी पीक विमा योजनेतून अनेक शेतकर्‍यांनी विमा काढला आहे. पण त्याची आकडेवारी बँकांकडून अद्याप मिळालेली नाही. बँकांनी मात्र बिगर कर्जदार व कर्जदार शेतकर्‍यांच्या पिकांचा विमा काढण्यास चालढकल केली. 
जिल्हा बँकेत हा प्रकार अधिक झाला. वरिष्ठ कार्यालयातून आदेशच नसल्याचे तालुका व ग्रामीण पातळीवरील जिल्हा बँकांच्या शाखांमधून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना सांगितले गेले. यामुळे किती कर्जदार शेतकरी हवामानावर आधारित कृषी पीक विमा योजनेचे लाभार्थी बनतील? हा प्रश्नच आहे. या स्थितीत शेतकर्‍यांनी जावे कुठे? हा प्रश्न आहे. 
योजनेच्या नावाखाली फक्त धूळफेक करण्यात आल्याचा आरोपही शेतकरी करीत आहेत. 
मार्गदर्शक सूचना नाहीत
कुठल्या पिकासाठी किती हप्ता, कोणत्या व कशा कालावधीत विमा संरक्षण मिळेल यासंदर्भात अजून मार्गदर्शक सूचना आलेल्या नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे सांगण्यात आले. सुधारित योजनेचे घोंगडे भिजत या हंगामात सुधारित कृषी पीक विमा योजनेतून जिल्ह्याला वगळले होते. परंतु हवामानावर आधारित पीक विमा योजनेची मुदत ३0 जून रोजी संपताच ही योजना जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली. ३0 जुलैपर्यंत या योजनेची मुदत आहे. बँकांमध्ये विमा काढला जाईल. परंतु या योजनेच्या मार्गदर्शक सूचना गुरुवारपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या नव्हत्या. भात, कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद व मूग या पिकांसाठी सुधारित कृषी पीक विमा योजना लागू केली जाणार असल्याची माहिती मिळाली. परिसरात कृषी पीक विमा काढण्यासाठी अनेक शेतकरी इच्छुक आहेत. परंतु त्यांना विमा काढण्यासाठी बँका, कृषी विभाग यांच्याकडे वणवण करावी लागत आहे. हवामानावर आधारित कृषी पीक विमा योजनेची मुदत संपलेली आहे. पण याची नेमकी माहिती शेतकर्‍यांना मिळालेली नाही. कुठलाही प्रचार झाला नाही. आता सुधारित कृषी पीक विमा योजना आणली आहे, परंतु या योजनेबाबतही शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. बँकांमध्ये अधिकारी परतवून लावतात.