शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

८३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 22:09 IST

भुसावळ तालुका : सतत झालेल्या पावसाने दिला ‘फटका’, सर्वाधिक नुकसान मूग आणि उडीदचे

भुसावळ : तालुक्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे उडीद , मूग आदी पिके पूर्णपणे वाया गेले आहेत. तर कपाशी , ज्वारी , सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अति पावसामुळे सलग दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर निसर्गाने नांगर फिरविल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, तालुक्यात उडीद व मूग या पिकांचे पंचनामे करण्यात आले असून तालुक्यात एकूृण ८३३ हेक्टर क्षेत्रवरील उडीद, मूग व केळीचे नुकसान झाले आहे.शासकीय अधिकाºयांनी या नुकसानीचे पंचनामे केल्यामुळे शेतकºयांना थोडाफार दिलासा मिळाला आहे . मात्र नुकसान भरपाई किती व कधी मिळते याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पिकांची स्थिती चांगली होती . मात्र उडीद व मुग फुलोरामध्ये येण्याची वेळ असताना पावसाने ओढ दिली. मात्र तरीही उडीद, मुगाचे पीक समाधानकारक येईल, अशी आशा शेतकºयांना होती. हे पीक ऐन तोडणीवर आले असताना पाऊस सुरु झाला. दररोजच्या पावसामुळे शेंगांना जागेवरच कोंब आले व जागेवरच सडले. त्यामुळे उडीद व मूग शेतकºयांच्या हातून पूर्णपणे निघून गेला, तरीही पाऊस सुरूच आहे . त्यामुळे कपाशीच्या कैºयाचेही नुकसान झाले आहे.तर कापणीवर आलेल्या ज्वारी , मका , सोयाबीन या पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.गेल्यावर्षीही परतीच्या पावसाने दिवाळीपर्यंत हाहाकार माजवला होता. त्यामुळे गेल्या वर्षी उडीद , मूग, सोयाबीन, ज्वारी, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.तीच परिस्थिती पुन्हा दुसºया वर्षीही उद्भवली आहे.