शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST

अमळनेर : मान्सूनचा पहिला पाऊस पडल्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यात दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे. मुडी बोदर्डे ...

अमळनेर : मान्सूनचा पहिला पाऊस पडल्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यात दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे. मुडी बोदर्डे परिसरात शेतकरी पिके वाचवण्यासाठी चुहा पद्धतीने पाणी देऊन पिके वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत.

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला आहे. जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाची अपेक्षा असताना समाधानकारक पाऊस झाला नाही. मुडी बोदर्डे परिसरात जमिनी कोरड्याच असून तडे पडू लागले आहेत. शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीला कापूस लागवड केली तसेच पेरणी केली; परंतु पावसाअभावी पिके कोमजून गेले. काही शेतकऱ्यांनी पुनश्च लागवड केली; परंतु पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे हीच परिस्थिती उद्भवली. त्यामुळे शेतकरी वर्गातून पिकांना जीवनदान देण्यासाठी चुहा देणे सुरू आहे. यामुळे पिकांना जीवनदान मिळणार आहे.

काही भागांत थोड्याफार हलक्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे; परंतु भरपूर प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास उत्पन्न हातचे जाणार आहे. दुबार पेरणी करावी लागणार आहे. कोरोनाच्या संकटांनंतर संभाव्य दुष्काळाच्या संकटाने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नंतर पाऊस पडला तरी पिकांना त्याचा त्या प्रमाणात उपयोग होणार नाही. उत्पन्न निश्चित घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा लागवड करावी लागणार असल्यामुळे शासनाकडे मोफत बियाण्याची मागणी केली आहे.

030721\03jal_3_03072021_12.jpg

मुडी बोदर्डे परिसरात चुहा पद्धतीने पिकांना घोटघोट पाणी देताना शेतकरी. (छाया : अंबिका फोटो, अमळनेर)