शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाकोदसह परिसरात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:12 IST

एकीकडे मशागतीसह पेरणी सर्वत्र आटोपली असून, पावसाची अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर वळवाचा ...

एकीकडे मशागतीसह पेरणी सर्वत्र आटोपली असून, पावसाची अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर वळवाचा पाऊस पडेल, ही अपेक्षा सर्वांनाच होती. परंतु रोहिणी नक्षत्र सालाबादप्रमाणे कोरडे ठणठणीत गेले. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज असल्याने व मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अनेक वर्षांनतर यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनीही मशागतीची कामे वेगाने केली. उसनवारीने पैशांची जुळवा-जुळव करून खते, बियाण्यांचे नियोजनही केले. ज्या शेतकरीवर्गाकड़े पाण्याचे स्रोत आहे, त्यांनी पावसाची वाट न पाहता आपल्या शेतातील पेरण्या आटोपून घेतल्या. कोरडवाहू शेतकरीवर्गाने मागील आठवड्यात तुरळक झालेल्या पावसाच्या भरवशावर पेरण्या केल्या. मात्र, पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला असून, दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

यावर्षी निसर्ग आपल्याला साथ देईल, म्हणून रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे उरकून घेतली. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अनेक समस्या सहन कराव्या लागत आहेत. उन्हाळी हंगामात घेतलेली रब्बी पिकेही जमीनदोस्त होत आहेत. शेतकऱ्यांना निसर्ग साथ देत नसून, शासनही वेळोवेळी मदत करीत नाही. अशा परिस्थितीत कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यावर्षी लवकर पेरणी करायची, या इराद्याने अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, खताची खरेदी केली. खरेदीत आलेली तेजी पाहता काही शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. पावसाचे वातावरण पाहून शेतकऱ्यांनाही विचार न करता खरेदीसाठी उत्साह दाखवला.

पावसाअभावी कोमटे जळण्याच्या मागावर :

मागील आठवड्यात पावसाच्या काही प्रमाणात सरी बरसल्याने आता पावसाला दमदार सुरुवात होईल, या आशेवर कोरडवाहू शेतकऱ्यांनी १०० टक्के पेरणी केली आहे. मात्र, पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे खराब होत आहे. काही ठिकाणी बियांना कोमटे फुटून जळत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, दुबार पेरणीची टांगती तलवार शेतकरीवर्गाच्या भोवती फिरत आहे. उन्हाळ्यासारख्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेनेदेखील पेरलेले बियाणे खराब होत आहे.

फोटो : अर्पण लोढा, वाकोद २४/१