शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाकोदसह परिसरात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:12 IST

एकीकडे मशागतीसह पेरणी सर्वत्र आटोपली असून, पावसाची अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर वळवाचा ...

एकीकडे मशागतीसह पेरणी सर्वत्र आटोपली असून, पावसाची अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर वळवाचा पाऊस पडेल, ही अपेक्षा सर्वांनाच होती. परंतु रोहिणी नक्षत्र सालाबादप्रमाणे कोरडे ठणठणीत गेले. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज असल्याने व मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अनेक वर्षांनतर यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनीही मशागतीची कामे वेगाने केली. उसनवारीने पैशांची जुळवा-जुळव करून खते, बियाण्यांचे नियोजनही केले. ज्या शेतकरीवर्गाकड़े पाण्याचे स्रोत आहे, त्यांनी पावसाची वाट न पाहता आपल्या शेतातील पेरण्या आटोपून घेतल्या. कोरडवाहू शेतकरीवर्गाने मागील आठवड्यात तुरळक झालेल्या पावसाच्या भरवशावर पेरण्या केल्या. मात्र, पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला असून, दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

यावर्षी निसर्ग आपल्याला साथ देईल, म्हणून रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे उरकून घेतली. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अनेक समस्या सहन कराव्या लागत आहेत. उन्हाळी हंगामात घेतलेली रब्बी पिकेही जमीनदोस्त होत आहेत. शेतकऱ्यांना निसर्ग साथ देत नसून, शासनही वेळोवेळी मदत करीत नाही. अशा परिस्थितीत कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यावर्षी लवकर पेरणी करायची, या इराद्याने अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, खताची खरेदी केली. खरेदीत आलेली तेजी पाहता काही शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. पावसाचे वातावरण पाहून शेतकऱ्यांनाही विचार न करता खरेदीसाठी उत्साह दाखवला.

पावसाअभावी कोमटे जळण्याच्या मागावर :

मागील आठवड्यात पावसाच्या काही प्रमाणात सरी बरसल्याने आता पावसाला दमदार सुरुवात होईल, या आशेवर कोरडवाहू शेतकऱ्यांनी १०० टक्के पेरणी केली आहे. मात्र, पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे खराब होत आहे. काही ठिकाणी बियांना कोमटे फुटून जळत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, दुबार पेरणीची टांगती तलवार शेतकरीवर्गाच्या भोवती फिरत आहे. उन्हाळ्यासारख्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेनेदेखील पेरलेले बियाणे खराब होत आहे.

फोटो : अर्पण लोढा, वाकोद २४/१