शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

गुन्हेगारी पुन्हा उफाळू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:17 IST

सुनील पाटील शहरात काही महिन्यांपासून थंडावलेली गुन्हेगारी पुन्हा उफाळू लागल्याचे काही घटनांवरून सिद्ध होत आहे. आपआपल्या पोलीस हद्दीतील गुन्हेगारांचे ...

सुनील पाटील

शहरात काही महिन्यांपासून थंडावलेली गुन्हेगारी पुन्हा उफाळू लागल्याचे काही घटनांवरून सिद्ध होत आहे. आपआपल्या पोलीस हद्दीतील गुन्हेगारांचे बीट प्रमुख असो किंवा गुन्हे शोध पथके यांचा त्यांच्यावर वचक नसल्याचे हे द्योतक मानावे लागेल. गुन्हेगार दत्तक योजना प्रभावीपणे राबविली जात नसल्याचेही त्यामागील एक मोठे कारण आहे. दर आठवड्याला उपअधीक्षक गुन्हेगारांची पडताळणी घेतात, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळत नाही. एकूणच पोलिसांचे गुन्हेगारांवर नियंत्रण नसल्याचे सिद्ध होत आहे. दोन दिवसांपूर्वी फातेमानगरात झालेला वाद, तेथून कंपनीत जाऊन केलेली धुडगूस, असली-नकली पिस्तुलीचा खेळ यातून गुन्हेगारांची हिंमत वाढतच चालली आहे. अशा घटनांमध्ये जे गुन्हेगार नाहीत, तेही गुन्हेगारीच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गेल्या महिन्यात तीन अमळनेरच्या तीन गुन्हेगारांवर मोक्काचा प्रस्ताव पाठविला व इतकेच नाही, ही कारवाई का आवश्यक आहे, हेही तितकेच महानिरीक्षकांना पटवून दिले. त्यामुळे या गुन्हेगारांची नाशिक कारागृहात रवानगी झाली. या आधीही रावेर दंगलीतील काही जणांवर अशीच कारवाई झाली. मात्र, उच्च न्यायालयातून दोघांना दिलासा मिळाला. अलीकडच्या काळात प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरात खुनाचा प्रयत्न केल्याचे १२७ गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेले आहेत. हद्दपारी, प्रतिबंधात्मक कारवाईचे हत्यार सातत्याने उपसत राहिले, तरच गुन्हेगारांमध्ये धाक तयार होऊ शकतो. सर्वच बाबी पोलीस अधीक्षक स्वत: करू शकत नाहीत. मात्र, त्या खालच्या यंत्रणेचीही काही जबाबदारी आहे, त्यांच्याकडून ती प्रामाणिकपणे निभावणे अपेक्षित आहे.