शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनासाठी कृती आराखडा तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 21:50 IST

पक्षीमित्र संमेलनातील सूर : उत्तर महाराष्ट्रात जैवविविधता आणि वन्यजीवांच्या संशोधनासाठी व्यासपीठ उभारणार

जळगाव : उत्तर महाराष्ट्र क्षेत्रात वन्यजीव आणि आणि निसर्ग संवर्धनाचे कार्यकर्ते प्रचंड मेहनतीने व्यापक कार्य करीत आहेत. परंतु त्यांच्या कार्याला संशोधनाची जोड नसल्यामुळे त्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात नाही, अशी खंत उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष अनिल माळी यांनी व्यक्त केली. जैवविविधता आणि वन्यजीवांच्या संशोधनासाठी दोन वर्षाचा कृती आराखडा तयार करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.ते पक्षीमित्र संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी जैवविविधतेच्या विविध घटकांवर आधारित प्रबंध, निबंध, लघुशोध प्रबंध, लिहून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये मासिकांमध्ये, पक्षिकामध्ये प्रकाशित केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.संमेलनात आज संशोधन मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सुधाकर कुºहाडे (अहमदनगर) यांच्याकडे संशोधन व्यासपीठाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लहान-मोठ्या शोधकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर महाराष्ट्र संघटनेतर्फे निधी उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी सांगितले. हा निधी उत्तर महाराष्ट्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था व संघटनांकडून भरला जाणार आहे.महाराष्ट्र क्षेत्रात पक्षी संवर्धन याबरोबरच वन्यजीवन जैव विविधता यांचे संवर्धन आणि संशोधन करण्यासाठी सर्वंकष विचार करणारी संघटना स्थापन करण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. या अनुषंगाने अस्थायी समितीची घोषणाही करण्यात आली आहे.वसुंधरा महोत्सवाची सांगताजळगाव : विभागीय पक्षीमित्र संमेलनात रविवारी सकाळी सात वाजता गांधी तीर्थवरील जलाशयावर जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर सुधाकर कुºहाडे आणि अनिल माळी यांनी मार्गदर्शन केले. या परिसरात निसर्ग भ्रमण आणि पक्षी निरीक्षणही करण्यात आले, या पार्श्वभूमीवर सुहास जोशी (मुंबई) यांनी सविस्तर सादरीकरण केले. त्यांनी देशातील पाणथळ क्षेत्र संकटात असल्याचे सांगितले.याविषयी अनेक आंतरराष्ट्रीय दाखले देऊन मुंबई आणि महाराष्ट्रातील जमिनी मोठ्या प्रमाणावर नष्ट होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. वेटलँड इंटरनॅशनल साउथ एशियाच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे भारतात सर्वाधिक वेटलँडचा नाश होत असून, पाणथळीचे संवर्धन हा शासन-प्रशासन, समाज अशा सर्वांच्याच अनास्थेचा विषय आहे. जोशी यांनी खान्देशातील अनेक उदाहरणे दिली. यातील विशेषत: नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अलिकडे आपल्या जिल्ह्यात पाणथळ क्षेत्र उपलब्ध नाही, असे विधान केल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि सांगितले की, पाणथळीच्या सर्वेक्षणा विषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये ७३५ पाणथळ क्षेत्रे आहेत आणि त्यातील ३१ क्षेत्रे आरक्षित करण्यात आली आहे, परंतु तरीही एका जबाबदार प्रशासकीय अधिकाºयाने असे विधान करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.याव्यतिरिक्त संमेलनात अनेक पक्षीमित्रांनी सादरीकरण केले, यामध्ये इम्रान तडवी, डॉ. भागवत (धुळे), उदय चौधरी (तां दळवाडी), राहुल सोनवणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आगामी संमेलन नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ येथे आयोजित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या संमेलनाचे संयोजन समर्पण संस्था संचालित पर्यावरण शाळेच्यावतीने करण्यात आले होते आणि संयोजन सहभाग म्हणून वन्यजीव संरक्षण संस्था, न्यू काँझर्वर, चातक नेचर कॉन्झर्वेशन संस्था, उपज, गरुड झेप, अग्निपंख, आणि उडान, आॅर्किड नेचर फाऊंडेशन या संस्थांनी भूमिका पार पाडली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव