शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

१५ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 01:36 IST

अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी भावात मूग खरेदी केल्याप्रकरणी बाजार समितीतील १५ व्यापाºयांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्देहमीभावापेक्षा कमी भावाने केली होती मूग, उडदाची खरेदीगावरान जागल्या संघटनेने न्यायालयात घेतली होती धाव

अमळनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी भावात मूग खरेदी केल्याप्रकरणी बाजार समितीतील १५ व्यापाºयांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील प्रथम न्यायदंडाधिकारी (वर्ग १) वाय. जे. वळवी यांनी दिले आहेत. सदर आदेशात ३० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचेही न्यायालयाने सूचित केले आहे.याबाबत राष्ट्रीय किसान संघाचे अध्यक्ष व गावरान जागल्या संघटनेचे कार्यकारी सदस्य अरुण बाबूराव देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली होती. उच्चतम दर्जाचा (एफएक्यू) माल असूनही त्यांचा उडीद, मूग हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करण्यात आला होता. याबाबत तालुक्यातील गावरान जागल्या सेनेसह शेतकºयांनी सहाय्यक निबंधक व सचिवांकडे लेखी तक्रार केली होती. मात्र दखल न घेतली गेल्याने याबाबत दावा न्यायालयात दाखल केला होता.काय दिले आहे तक्रारीतसन २०१७- १८ च्या पावसाळी हंगामात निघालेल्या उडीद, मुगास फिर्यादीसह अन्य विविध गावातील शेतकºयांनीही कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केले असता सदरच्या उच्च प्रतीच्या उडीद व मुगास केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत दराने म्हणजेच अनुक्रमे ५४००/- रुपये ते ५५७५ रुपयांप्रमाणे खरेदी करणे संबंधीत आरोपी आडत व्यापाºयांवर बंधनकारक असतांनाही आरोपींनी सध्या १७००- ते ४५००- रुपये प्रति क्विंट्ल असा दर सुरू आहे असा विश्वास देवून फिर्यादी आणि अन्य अनेक शेतकयांकडून उच्च प्रतीच्या शेतमालास अत्यंत कमी दराने खरेदी करून शेतकºयांची संगनमताने फसवणूक केली आहे. हे करतांना त्यांनी सदर शेतकºयांना उच्च प्रतिच्या शेतमालास विश्वासघात करून फसवणुकीने खरेदी करतांना बोगस बिले सुध्दा तयार करून दिली आहेत.सदरच्या बिलांवर जर शेतमाल उच्च प्रतीचा नसेल व तो हलक्या प्रतीचा असल्यास नॉन एफएक्यू असा शिक्का मारला जातो. मात्र फिर्यादी व इतर शेतकºयांना नॉन एफएक्यूचे शिक्के न मारता दर्जाचे कोणतेही शिक्के पावत्यांवर दिसून आले नाही. त्यामुळे आडते आणि व्यापारी यांनी संगनमताने चांगल्या प्रतीचा हा माल नियमांनुसार एफएक्यू असतांना देखील त्याला किमान आधारभूत भाव न देता माल खरेदी केला. या प्रकरणी विविध ठिकाणी तक्रारी पाठपुरावा करूनही याबाबत शासकीय यंत्रणांनी कारवाई केली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली होती., आणि आता त्यामुळे न्यायालयाने १५ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.यांच्याविरूद्ध आहे तक्रारभवलक्ष्मी एजन्सीचे नितू हर्ष जैन, श्रद्धा एजन्सीचे सुरेखा पूनमचंद छाजेड द्वारा रमेशचंद छाजेड, एच.बी.चे हरी भिका वाणी, देवराज प्रसन्न बाफना, निशांतचे संगीता विजय पारख, संपतलाल अगरचंदचे हर्षकुमार प्रकाशचंद जैन, व्ही. बी. एजन्सीचे विजय गुलाबचंद बाफना, समर्थ एजन्सीचे हेमलता देवराज बाफना, नर्मदाचे महेंद्र मोहनलाल जैन, साईकृपाचे वृषभ प्रकाश पारख, ओमश्रीचे योगेश चुडामण शेटे, बी.टी. एजन्सीचे शंंकरलाल तेजुमल बितराई, लामा एजन्सीचे विनोदकुमार कांतीलाल कोठारी, चितसीयाचे शेखर कौसर अहमद शेख रियाजोद्दीन, भगवतीचे शंकरलाल तेजुमल बितराई यांचा समावेश आहे. हे सर्व बाजार समितीतील परवानाधारक व्यापारी आहेत. भा.दं.वि.कलम १९९, ४२०, ४६४, ४६८, व ३४ प्रमाणे दावा दाखल करण्यात आला होता. त्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Marketबाजार