शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खासगी बाजारपेठेत कापसाचे भाव कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 17:23 IST

कापसावर पडलेल्या गुलाबी बोंडअळीला रोखण्यात शेतकऱ्यांनी यश मिळवले.

ठळक मुद्देवेचणी खर्च मजुरीचे न परवडणारे दर यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत

उत्तम काळेभुसावळ : तालुक्यात कापसावर पडलेल्या गुलाबी बोंडअळीला रोखण्यात शेतकऱ्यांनी यश मिळवले. त्यातच सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यात कपाशीच्या उत्पन्नावर परिणाम झाला. तरीही शिवारात पांढºया सोन्याचे चांदणे फुलले आहे. त्यामुळे आर्थिक आधार मिळण्याची आस शेतकऱ्यांना लागली आहे. मात्र वेचणी खर्च व सध्या खासगी बाजारपेठेत शेतकºयांची लूट होत असल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत आला आहे.कापूस वेचणीसह ज्वारी, मका, सोयाबीन आदी सर्वच पिके काढण्यासाठी शेतकºयांना मजुरांची अक्षरश: मनधरणी करावी लागत आहे. शासनाने शासकीय व हमीभाव जाहीर केले असले तरी सर्वच धान्याचे भाव खासगी बाजारपेठेत चांगलेच कोसळले आहेत. कापसासोबतच ज्वारी एक तृतीयांश भावात खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच संकटात सापडला आहे.तालुक्यात गेल्यावर्षी पांढरे सोने अतिवृष्टीमुळे गोत्यात आले होते. त्याची विक्री करताना शेतकºयांची मोठी दमछाक झाली. तरीही यंदाच्या हंगामात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे राहिले. सुरुवातीला गुलाबी अळीचे ग्रहण लागले. त्याचे उच्चाटन करण्यासाठी शेतकºयांनी कृषी विभागाच्या व्यवस्थापनाचा फायदा झाला. विविध प्रकारची कीटकनाशके फवारणी करून शेतकºयांनी गुलाबी अळीवर नियंत्रण मिळवले, मात्र सध्या कापूस वेचणीला आला असूनही मजूर मिळत नाही. यामुळे शेतकºयांची अक्षरश: दमछाक होत आहे. सध्या कापूस वेचणीचा खर्च मजुरी सात रुपये किलो, रिक्षा भाडे व मध्यस्थी माणसाची दलाली असा जवळपास १० रुपये किलोप्रमाणे खर्च येत आहे. त्यात बी-बियाणे, निंदणी, कोळपणी, खते, रासायनिक खते, पेरणी, फवारणी विविध प्रकारच्या खचार्चा विचार केला तर किमान तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे खर्च येत असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत मात्र सध्या सीसीआय केंद्र कुठेही सुरू नाही. यामुळे साडेचार ते सहा हजार ६०० रुपये क्विंटलने कापूस घेण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात तर साडेतीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे कापूस घेण्यात आला. त्यामुळे शेतकरीवर्ग व्यापारी व मजुरांच्या चांगलाच कचाट्यात सापडल्याचे दिसून येत आहे.आद्रता जास्त असल्यामुळे कापूस खरेदी केंद्रात विलंबकेंद्र शासनाने सीसीआयतर्फे कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी पाच हजार ७२५ रुपये क्लिंटन हमीभावही जाहीर केला आहे. मात्र अद्याप आर्द्रता जास्त असल्यामुळे कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब होणार आहे. अधिक मास असल्यामुळे दिवाळी लांब दिसत असली तरी, हा मोसम दिवाळीचा असल्याचे शेतकºयांमधून बोलले जात आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे खासगी कापूस बाजारपेठेत अक्षरश: लूट होत आहे. परिणामी शेतकरीवर्ग चांगलाच अडचणीत सापडला आहे.सर्वच मालाचे खाजगी बाजारपेठेत भाव कोसळलेकापूस- सीसीआय भाव ५,७२५खासगी बाजारपेठेत ४५०० रुपयेज्वारी शासकीय भाव २४६०खाजगी बाजारपेठेत ८०० ते ९०० रुपयेमका शासकीय भाव १८००; खासगी भाव ११००मूग खासगी बाजारपेठेत केवळ ३५०० ते ४००० रुपयेसोयाबीन खासगी बाजारपेठेत केवळ ३००० रुपयेगहू खासगी बाजारपेठेत १५०० ते १६०० रुपयेसर्वच मालाचे भाव कोसळले असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहेसीसीआयने भुसावळ तालुक्यामध्ये तीन जिनिंगमध्ये नियोजन केले आहे. त्यातील एका जिनिंगमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहे.कापसाचे आॅनलाWXन नोंदणी सुरू , ३६ शेतकºयांची झाली नोंदणीकापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसले तरी, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदी करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. यावर्षी प्रत्यक्ष शेतकºयांना हजर राहून अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्या अर्जासोबत सातबारा उतारा, आधार कार्ड आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडण्यात येत आहे. अर्ज भरण्यात आल्यानंतर त्या अर्जावर नोंदणी क्रमांक टाकण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसापासून नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत ३६ शेतकºयांची नोंदणी झाली आहे.-नितीन पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, भुसावळआद्रता जास्त असल्यामुळे केंद्र सुरू करण्यास विलंब - कोकाटेकापूस खरेदी करून करण्यासाठी शासनाने नियोजन केले आहे. मात्र सध्या आर्द्रता जास्त असल्यामुळे कापूस खरेदी करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. आर्द्रता कमी होताच कापूस खरेदी सुरू करण्यात येईल.-मयूर कोकाटे, ग्रेडर, सीसीआय केंद्र, भुसावळ

टॅग्स :cottonकापूसBhusawalभुसावळ