शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

ऐन दिवाळीत कापसाचे भाव कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:28 IST

ऐन दिवाळी तोंडावर आली असताना कापसाचे भाव कोसळल्याने भुसावळ, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अगोदरच दुष्काळ, त्यात अद्यापही कापूस, ज्वारीसह कोणतीही खरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस वगळता शासनाच्या हमीपेक्षा कमी भावाने माल विकावा लागत आहे. व्यापाºयांकडून होणाºया लुटीमुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे

ठळक मुद्देसरकीचे भाव कमी झाल्याने भाव कोसळलेबोदवड येथे पांढºया सोन्याचे दिवसभरात झाले तीन भावखरेदी केंद्रास विलंब : ज्वारी व मकाही मातीमोलशेतकरीवर्गातून व्यक्त होतोय संताप

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : ऐन दिवाळी तोंडावर आली असताना कापसाचे भाव कोसळल्याने भुसावळ, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अगोदरच दुष्काळ, त्यात अद्यापही कापूस, ज्वारीसह कोणतीही खरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस वगळता शासनाच्या हमीपेक्षा कमी भावाने माल विकावा लागत आहे. व्यापाºयांकडून होणाºया लुटीमुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बोदवड येथे तर बुधवारी कापसाचे बाजारात दिवसभरात तीन भाव करण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्ग चकीत झाला आहे.यावर्षी सर्वत्र भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे कापूस ,ज्वारी, मका, सोयाबीन, उडीद, मूग आदी सर्वच मालांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. कापसाचे खासगी जिनिंगमध्ये खरेदीसाठी जिनिंग मालकांनी दसºयाचा मुहूर्त साधला व काही ठिकाणी सहा हजार तर काही ठिकाणी सात हजार १०० रुपये भाव देऊन काटा पूजन केले. जिल्ह्यात मात्र गेल्या २०-२५ दिवसांपासून पाच हजार ८०० ते सहा हजार रुपयांपर्यंत खरेदी सुरू आहे. मंगळवारपासून हे भाव अचानक कोसळले आहे. बोदवड येथे बुधवारी दिवसभरात तीन भाव दिसून आले. सकाळी पाच हजार ७०० रुपये दुपारी पाच हजार ६०० तर सायंकाळी पाच हजार ५०० रुपये भावाने कापूस खरेदी करण्यात आला. त्यामुळे शेतकरी आश्चर्यचकीत झाला आहे. शेतकºयांनी सकाळी दुकानदारांना भ्रमणध्वनीवरून भाव विचारला असता, पाच हजार ७०० रुपये भाव सांगण्यात आला. काही शेतकºयांनी किरकोळ कापूस विक्रीसाठी बाजारात आणला. मात्र त्यांना १०० रुपयांनी भाव कमी झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सायंकाळी तर पुन्हा १०० रुपयांनी भाव कमी करण्यात आले. त्यामुळे शेतकरीवर्गातून संताप व्यक्त करण्यात आला. तथापि, दिवाळी तोंडावर असल्यामुळे शेतकºयांना कापूस विकल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तर व्यापाºयांनी डाव साधला नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे . मात्र शासनाच्या हमीभावापेक्षा हा भाव अधिक असल्यामुळे शेतकरीवर्गाला तूर्त समाधान मानावे लागत आहे.दरम्यान, जिल्ह्यात अद्यापही कपाशी, ज्वारी, मका खरेदी केंद्र सुरू नाही. शासनाने ज्वारीला दोन हजार ४३० रुपये तर मक्याला एक हजार ७०० रुपये भाव घोषित केला आहे. खाजगी बाजारपेठेत मात्र शेतकºयांना ज्वारीही अवघ्या एक हजार ६०० ते एक हजार ७०० रुपये भावात विकावी लागत आहे. ज्वारी महिनाभरापूर्वीच शेतकºयांच्या घरात आली आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. मात्र खरेदी केंद्र्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान, शेतकºयांची ज्वारी विकल्यानंतर तर खरेदी केंद्र्र सुरू होणार नाही ना, असा प्रश्न शेतकरीवर्गातून उपस्थित करण्यात आला आहे.सरकीचे भाव दोन दिवसापूर्वी दोन हजार पाचशे रुपये होते. ते भाव आता दोन हजार शंभरावर आले आहे. त्यात कापसाची आवक वाढली आहे. त्यामुळे कपाशीचे भाव कमी झाले असल्याची माहिती बोदवड येथील जिनिंग मालक अरविंद बरडिया यांनी दिली. 

टॅग्स :cottonकापूसBhusawalभुसावळ