शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

ऐन दिवाळीत कापसाचे भाव कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:28 IST

ऐन दिवाळी तोंडावर आली असताना कापसाचे भाव कोसळल्याने भुसावळ, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अगोदरच दुष्काळ, त्यात अद्यापही कापूस, ज्वारीसह कोणतीही खरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस वगळता शासनाच्या हमीपेक्षा कमी भावाने माल विकावा लागत आहे. व्यापाºयांकडून होणाºया लुटीमुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे

ठळक मुद्देसरकीचे भाव कमी झाल्याने भाव कोसळलेबोदवड येथे पांढºया सोन्याचे दिवसभरात झाले तीन भावखरेदी केंद्रास विलंब : ज्वारी व मकाही मातीमोलशेतकरीवर्गातून व्यक्त होतोय संताप

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : ऐन दिवाळी तोंडावर आली असताना कापसाचे भाव कोसळल्याने भुसावळ, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अगोदरच दुष्काळ, त्यात अद्यापही कापूस, ज्वारीसह कोणतीही खरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस वगळता शासनाच्या हमीपेक्षा कमी भावाने माल विकावा लागत आहे. व्यापाºयांकडून होणाºया लुटीमुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बोदवड येथे तर बुधवारी कापसाचे बाजारात दिवसभरात तीन भाव करण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्ग चकीत झाला आहे.यावर्षी सर्वत्र भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे कापूस ,ज्वारी, मका, सोयाबीन, उडीद, मूग आदी सर्वच मालांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. कापसाचे खासगी जिनिंगमध्ये खरेदीसाठी जिनिंग मालकांनी दसºयाचा मुहूर्त साधला व काही ठिकाणी सहा हजार तर काही ठिकाणी सात हजार १०० रुपये भाव देऊन काटा पूजन केले. जिल्ह्यात मात्र गेल्या २०-२५ दिवसांपासून पाच हजार ८०० ते सहा हजार रुपयांपर्यंत खरेदी सुरू आहे. मंगळवारपासून हे भाव अचानक कोसळले आहे. बोदवड येथे बुधवारी दिवसभरात तीन भाव दिसून आले. सकाळी पाच हजार ७०० रुपये दुपारी पाच हजार ६०० तर सायंकाळी पाच हजार ५०० रुपये भावाने कापूस खरेदी करण्यात आला. त्यामुळे शेतकरी आश्चर्यचकीत झाला आहे. शेतकºयांनी सकाळी दुकानदारांना भ्रमणध्वनीवरून भाव विचारला असता, पाच हजार ७०० रुपये भाव सांगण्यात आला. काही शेतकºयांनी किरकोळ कापूस विक्रीसाठी बाजारात आणला. मात्र त्यांना १०० रुपयांनी भाव कमी झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सायंकाळी तर पुन्हा १०० रुपयांनी भाव कमी करण्यात आले. त्यामुळे शेतकरीवर्गातून संताप व्यक्त करण्यात आला. तथापि, दिवाळी तोंडावर असल्यामुळे शेतकºयांना कापूस विकल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तर व्यापाºयांनी डाव साधला नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे . मात्र शासनाच्या हमीभावापेक्षा हा भाव अधिक असल्यामुळे शेतकरीवर्गाला तूर्त समाधान मानावे लागत आहे.दरम्यान, जिल्ह्यात अद्यापही कपाशी, ज्वारी, मका खरेदी केंद्र सुरू नाही. शासनाने ज्वारीला दोन हजार ४३० रुपये तर मक्याला एक हजार ७०० रुपये भाव घोषित केला आहे. खाजगी बाजारपेठेत मात्र शेतकºयांना ज्वारीही अवघ्या एक हजार ६०० ते एक हजार ७०० रुपये भावात विकावी लागत आहे. ज्वारी महिनाभरापूर्वीच शेतकºयांच्या घरात आली आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. मात्र खरेदी केंद्र्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान, शेतकºयांची ज्वारी विकल्यानंतर तर खरेदी केंद्र्र सुरू होणार नाही ना, असा प्रश्न शेतकरीवर्गातून उपस्थित करण्यात आला आहे.सरकीचे भाव दोन दिवसापूर्वी दोन हजार पाचशे रुपये होते. ते भाव आता दोन हजार शंभरावर आले आहे. त्यात कापसाची आवक वाढली आहे. त्यामुळे कपाशीचे भाव कमी झाले असल्याची माहिती बोदवड येथील जिनिंग मालक अरविंद बरडिया यांनी दिली. 

टॅग्स :cottonकापूसBhusawalभुसावळ