शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
4
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
5
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
6
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
7
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
8
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
9
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
11
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
12
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
13
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
14
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
16
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
17
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
18
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
19
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
20
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या

कापसाचे दर ६६०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कापसाच्या दरात गेल्या महिनाभरात मोठी वाढ झाली असून कापसाचे दर प्रतिक्विंटल ६ हजार ६०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कापसाच्या दरात गेल्या महिनाभरात मोठी वाढ झाली असून कापसाचे दर प्रतिक्विंटल ६ हजार ६०० रुपयांपर्यंत गेले आहेत. तसेच घाटावरील कापसाला ६,७०० पर्यंत भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढली असून, भारतीय गठाणचे दर ४६ हजारपर्यंत गेले आहेत. त्यातच पाकिस्तानकडून ही भारतीय कापसाची मागणी केली जात असून, पाकिस्तानला ही कापूस निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यास भावात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबरमध्ये कापूस हंगाम सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात चीन व अमेरिकेच्या ट्रेंड वॉरचा परिणाम असल्याने खासगी बाजारात कापसाला जास्त भाव नव्हता. त्यातच हमी भाव ५,८०० असला तरी ग्रेड पद्धतमुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच नाही. त्यातच गेल्यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने यंदा शेतकऱ्यांनी भाव वाढीची वाट न पाहता आपला माल विक्री करून टाकला; मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव आला असून कापसाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मात्र शेतकऱ्यांकडे मालच शिल्लक नाही. काही मोठ्या शेतकऱ्यांकडे माल शिल्लक असल्याने त्यांना या भाव वाढीचा फायदा होऊ शकतो.

भाव वाढीचे कारण

१) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर हे न्यूयॉर्क बाजारावरून ठरतात. सेंट ची किंमत वाढली तर भाव वाढतात. नोव्हेंबर मध्ये सेंटची किंमत ६६ इतकी होती. मात्र, त्यानंतर भाव वाढत गेले. २५ फेब्रुवारीला ९५.५७ सेट प्रति पौंड वाढले होते. तर २०१८ मध्ये कापसाचा दर सर्वाधिक ९६.४९ सेंट प्रति पौंड पर्यंत पोहोचले होते. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव ८८ सेंट प्रति पौंडपर्यंत पोहोचले आहेत.

२) यंदा भारतात कापसाची विक्रमी लागवड झाली होती. त्यामुळे भारतात यंदा ४ कोटी गाठी इतके उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. त्यापैकी १ कोटी गाठी या महाराष्ट्रात होतील अशी ही अपेक्षा कापूस बाजारातील तज्ज्ञांना होती. मात्र, अतिवृष्टी, गुलाबी अळी मुळे २० टक्के उत्पादनात मोठी घट होऊन राज्यात ६५ लाख गाठींचे उत्पन्न झाले आहे. तर देशात ही ३० ते ४० टक्के घट झाली. त्यात यंदा निर्यातदेखील वाढली होती. मागणी वाढली मात्र उत्पादन कमी असल्याने भावात वाढ झाली असल्याची माहिती. कॉटन क्षेत्रातील तज्ज्ञ प्रदीप जैन यांनी दिली.

शेतकऱ्यांना फायदा नाहीच

कापसाचे दर जरी वाढले असले तरी मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना फारसा होणार नाहीय, कारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला माल फेब्रुवारी महिन्यातच विक्री केला आहे. त्यामुळे या भाव वाढीचा फायदा खासगी व्यापा-यांना अधिक होणार आहे.

पुढच्या हंगामात कापसाला राहील मागणी

पुढील वर्षीदेखील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. भारताच्या कापसाची गुणवत्ता आणि भाव हे इतर देशांना परवडणारे आहेत. त्यामुळे पुढील हंगामातदेखील कापसाला मागणी राहणार असून खासगी बाजारात शेतकऱ्यांना हमी भावापेक्षादेखील जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे.

कोट

यंदा जेवढी अपेक्षा होती तेवढे उत्पादन झाले नाही, राज्यातदेखील उत्पन्न कमी आले आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढली आहे. मात्र माल कमी असल्याने भावात वाढ झाली आहे. पुढील वर्षीही भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

- प्रदीप जैन, कॉटन क्षेत्रातील जाणकार