शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कापसाचे दर ६६०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कापसाच्या दरात गेल्या महिनाभरात मोठी वाढ झाली असून कापसाचे दर प्रतिक्विंटल ६ हजार ६०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कापसाच्या दरात गेल्या महिनाभरात मोठी वाढ झाली असून कापसाचे दर प्रतिक्विंटल ६ हजार ६०० रुपयांपर्यंत गेले आहेत. तसेच घाटावरील कापसाला ६,७०० पर्यंत भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढली असून, भारतीय गठाणचे दर ४६ हजारपर्यंत गेले आहेत. त्यातच पाकिस्तानकडून ही भारतीय कापसाची मागणी केली जात असून, पाकिस्तानला ही कापूस निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यास भावात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबरमध्ये कापूस हंगाम सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात चीन व अमेरिकेच्या ट्रेंड वॉरचा परिणाम असल्याने खासगी बाजारात कापसाला जास्त भाव नव्हता. त्यातच हमी भाव ५,८०० असला तरी ग्रेड पद्धतमुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच नाही. त्यातच गेल्यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने यंदा शेतकऱ्यांनी भाव वाढीची वाट न पाहता आपला माल विक्री करून टाकला; मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव आला असून कापसाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मात्र शेतकऱ्यांकडे मालच शिल्लक नाही. काही मोठ्या शेतकऱ्यांकडे माल शिल्लक असल्याने त्यांना या भाव वाढीचा फायदा होऊ शकतो.

भाव वाढीचे कारण

१) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर हे न्यूयॉर्क बाजारावरून ठरतात. सेंट ची किंमत वाढली तर भाव वाढतात. नोव्हेंबर मध्ये सेंटची किंमत ६६ इतकी होती. मात्र, त्यानंतर भाव वाढत गेले. २५ फेब्रुवारीला ९५.५७ सेट प्रति पौंड वाढले होते. तर २०१८ मध्ये कापसाचा दर सर्वाधिक ९६.४९ सेंट प्रति पौंड पर्यंत पोहोचले होते. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव ८८ सेंट प्रति पौंडपर्यंत पोहोचले आहेत.

२) यंदा भारतात कापसाची विक्रमी लागवड झाली होती. त्यामुळे भारतात यंदा ४ कोटी गाठी इतके उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. त्यापैकी १ कोटी गाठी या महाराष्ट्रात होतील अशी ही अपेक्षा कापूस बाजारातील तज्ज्ञांना होती. मात्र, अतिवृष्टी, गुलाबी अळी मुळे २० टक्के उत्पादनात मोठी घट होऊन राज्यात ६५ लाख गाठींचे उत्पन्न झाले आहे. तर देशात ही ३० ते ४० टक्के घट झाली. त्यात यंदा निर्यातदेखील वाढली होती. मागणी वाढली मात्र उत्पादन कमी असल्याने भावात वाढ झाली असल्याची माहिती. कॉटन क्षेत्रातील तज्ज्ञ प्रदीप जैन यांनी दिली.

शेतकऱ्यांना फायदा नाहीच

कापसाचे दर जरी वाढले असले तरी मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना फारसा होणार नाहीय, कारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला माल फेब्रुवारी महिन्यातच विक्री केला आहे. त्यामुळे या भाव वाढीचा फायदा खासगी व्यापा-यांना अधिक होणार आहे.

पुढच्या हंगामात कापसाला राहील मागणी

पुढील वर्षीदेखील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. भारताच्या कापसाची गुणवत्ता आणि भाव हे इतर देशांना परवडणारे आहेत. त्यामुळे पुढील हंगामातदेखील कापसाला मागणी राहणार असून खासगी बाजारात शेतकऱ्यांना हमी भावापेक्षादेखील जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे.

कोट

यंदा जेवढी अपेक्षा होती तेवढे उत्पादन झाले नाही, राज्यातदेखील उत्पन्न कमी आले आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढली आहे. मात्र माल कमी असल्याने भावात वाढ झाली आहे. पुढील वर्षीही भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

- प्रदीप जैन, कॉटन क्षेत्रातील जाणकार