शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

कापूस उत्पादक अडकले फरदडच्या मोहात, कृषी विभागाकडून मात्र ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 15:48 IST

अतिवृष्टीमुळे हातात आलेले पीक अक्षरश: वाया गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असताना, उत्पन्नात मोठी घट झाली. अशाही परिस्थितीत शेतात लागलेल्या खर्चाला हातभार लागावा या हेतूने फरदड घेण्याचा प्रयत्न काही शेतकरी वर्ग करीत आहे. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांना शेतातून फरदड काढून टाकण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउत्पन्नाची घट भरून काढण्यासाठी सुरू आहे धडपडकृषी विभाग म्हणतो, आता फरदड न काढल्यास पुढील लागवडीच्या वेळी बोंडअळी संक्रमण करू शकते

अर्पण लोढावाकोद, ता.जामनेर, जि.जळगाव : यंदा अतिवृष्टीमुळे हातात आलेले पीक अक्षरश: वाया गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असताना, उत्पन्नात मोठी घट झाली. अशाही परिस्थितीत शेतात लागलेल्या खर्चाला हातभार लागावा या हेतूने फरदड घेण्याचा प्रयत्न काही शेतकरी वर्ग करीत आहे. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांना शेतातून फरदड काढून टाकण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. असे असतानाही शेतकरी या सूचनेकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.पुढील वर्षी करावा लागू शकतो सामनाबोंडअळी ही कपाशी पिकासाठी अत्यंत घातक आहे. कोणत्याही प्रकारची फवारणी केली तरी या अळीवर नियंत्रण मिळविणे कठीण आहे. ही अळी थेट बियाण्यातून कैरीपर्यंत संक्रमण करते. आता फरदड कपाशी शेतातून न काढल्यास ही अळी मातीतून पुन्हा पुढच्या पिकाच्या लागवडीच्या वेळी संक्रमण करण्याची शक्यता असते. शेतातील उभी फरदड कपाशी काढण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात येत आहेत. मात्र बहुतांश शेतकरी दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.भाववाढीची अपेक्षायंदा सधन शेतकºयापासून तर सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पैशांच्या रेलचेलअभावी आर्थिक संकटाचा सामना करीत सुरवातीला मिळेल त्या भावाने कापूस विक्री केला. सद्य:स्थितीत कपाशीला पाच हजारावर भाव मिळेल या आशेनेदेखील फरदडमुळे तरी काहींना काही नुकसान भरून निघेल म्हणून शेतकरीवर्ग हे पीक घेण्यासाठी आतूर दिसत आहे.सर्वत्र कपाशी पीक मुख्य असल्याने लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या तरी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याने पुढील उत्पन्न धोक्याचे ठरणार आहे. बोंडअळी असलेली फरदड कपाशी लगेच काढली गेली पाहिजे. थोड्याशा रकमेच्या मोहात न पडता ही कपाशी नष्ट करणे गरजेचे आहे. शासकीय कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठ यांच्याकडून फरदड न घेण्याचा सल्ला शेतकरी बांधवाना दिला जात आहे.-अभिमन्यू चोपडे, तालुका कृषी अधिकारी, जामनेरअपेक्षेपेक्षा यंदा उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यात अति पावसामुळे निम्म्यावर कपाशी वाया गेली. शेतात लावलेला मोठा खर्च पाहता सारखा तोटा सहन करावा लागत आहे. शेतात लावलेला काहीना काही खर्च निघेल या आशेपोटी फरदड घेण्याचा प्रयत्न करीत आहे.-लखन चव्हाण, शेतकरी, कुंभारी तांडा, ता.जामनेर