शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

कापूस उत्पादक अडकले फरदडच्या मोहात, कृषी विभागाकडून मात्र ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 15:48 IST

अतिवृष्टीमुळे हातात आलेले पीक अक्षरश: वाया गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असताना, उत्पन्नात मोठी घट झाली. अशाही परिस्थितीत शेतात लागलेल्या खर्चाला हातभार लागावा या हेतूने फरदड घेण्याचा प्रयत्न काही शेतकरी वर्ग करीत आहे. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांना शेतातून फरदड काढून टाकण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउत्पन्नाची घट भरून काढण्यासाठी सुरू आहे धडपडकृषी विभाग म्हणतो, आता फरदड न काढल्यास पुढील लागवडीच्या वेळी बोंडअळी संक्रमण करू शकते

अर्पण लोढावाकोद, ता.जामनेर, जि.जळगाव : यंदा अतिवृष्टीमुळे हातात आलेले पीक अक्षरश: वाया गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असताना, उत्पन्नात मोठी घट झाली. अशाही परिस्थितीत शेतात लागलेल्या खर्चाला हातभार लागावा या हेतूने फरदड घेण्याचा प्रयत्न काही शेतकरी वर्ग करीत आहे. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांना शेतातून फरदड काढून टाकण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. असे असतानाही शेतकरी या सूचनेकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.पुढील वर्षी करावा लागू शकतो सामनाबोंडअळी ही कपाशी पिकासाठी अत्यंत घातक आहे. कोणत्याही प्रकारची फवारणी केली तरी या अळीवर नियंत्रण मिळविणे कठीण आहे. ही अळी थेट बियाण्यातून कैरीपर्यंत संक्रमण करते. आता फरदड कपाशी शेतातून न काढल्यास ही अळी मातीतून पुन्हा पुढच्या पिकाच्या लागवडीच्या वेळी संक्रमण करण्याची शक्यता असते. शेतातील उभी फरदड कपाशी काढण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात येत आहेत. मात्र बहुतांश शेतकरी दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.भाववाढीची अपेक्षायंदा सधन शेतकºयापासून तर सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पैशांच्या रेलचेलअभावी आर्थिक संकटाचा सामना करीत सुरवातीला मिळेल त्या भावाने कापूस विक्री केला. सद्य:स्थितीत कपाशीला पाच हजारावर भाव मिळेल या आशेनेदेखील फरदडमुळे तरी काहींना काही नुकसान भरून निघेल म्हणून शेतकरीवर्ग हे पीक घेण्यासाठी आतूर दिसत आहे.सर्वत्र कपाशी पीक मुख्य असल्याने लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या तरी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याने पुढील उत्पन्न धोक्याचे ठरणार आहे. बोंडअळी असलेली फरदड कपाशी लगेच काढली गेली पाहिजे. थोड्याशा रकमेच्या मोहात न पडता ही कपाशी नष्ट करणे गरजेचे आहे. शासकीय कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठ यांच्याकडून फरदड न घेण्याचा सल्ला शेतकरी बांधवाना दिला जात आहे.-अभिमन्यू चोपडे, तालुका कृषी अधिकारी, जामनेरअपेक्षेपेक्षा यंदा उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यात अति पावसामुळे निम्म्यावर कपाशी वाया गेली. शेतात लावलेला मोठा खर्च पाहता सारखा तोटा सहन करावा लागत आहे. शेतात लावलेला काहीना काही खर्च निघेल या आशेपोटी फरदड घेण्याचा प्रयत्न करीत आहे.-लखन चव्हाण, शेतकरी, कुंभारी तांडा, ता.जामनेर