शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कापूस उत्पादक अडकले फरदडच्या मोहात, कृषी विभागाकडून मात्र ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 15:48 IST

अतिवृष्टीमुळे हातात आलेले पीक अक्षरश: वाया गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असताना, उत्पन्नात मोठी घट झाली. अशाही परिस्थितीत शेतात लागलेल्या खर्चाला हातभार लागावा या हेतूने फरदड घेण्याचा प्रयत्न काही शेतकरी वर्ग करीत आहे. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांना शेतातून फरदड काढून टाकण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउत्पन्नाची घट भरून काढण्यासाठी सुरू आहे धडपडकृषी विभाग म्हणतो, आता फरदड न काढल्यास पुढील लागवडीच्या वेळी बोंडअळी संक्रमण करू शकते

अर्पण लोढावाकोद, ता.जामनेर, जि.जळगाव : यंदा अतिवृष्टीमुळे हातात आलेले पीक अक्षरश: वाया गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असताना, उत्पन्नात मोठी घट झाली. अशाही परिस्थितीत शेतात लागलेल्या खर्चाला हातभार लागावा या हेतूने फरदड घेण्याचा प्रयत्न काही शेतकरी वर्ग करीत आहे. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांना शेतातून फरदड काढून टाकण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. असे असतानाही शेतकरी या सूचनेकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.पुढील वर्षी करावा लागू शकतो सामनाबोंडअळी ही कपाशी पिकासाठी अत्यंत घातक आहे. कोणत्याही प्रकारची फवारणी केली तरी या अळीवर नियंत्रण मिळविणे कठीण आहे. ही अळी थेट बियाण्यातून कैरीपर्यंत संक्रमण करते. आता फरदड कपाशी शेतातून न काढल्यास ही अळी मातीतून पुन्हा पुढच्या पिकाच्या लागवडीच्या वेळी संक्रमण करण्याची शक्यता असते. शेतातील उभी फरदड कपाशी काढण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात येत आहेत. मात्र बहुतांश शेतकरी दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.भाववाढीची अपेक्षायंदा सधन शेतकºयापासून तर सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पैशांच्या रेलचेलअभावी आर्थिक संकटाचा सामना करीत सुरवातीला मिळेल त्या भावाने कापूस विक्री केला. सद्य:स्थितीत कपाशीला पाच हजारावर भाव मिळेल या आशेनेदेखील फरदडमुळे तरी काहींना काही नुकसान भरून निघेल म्हणून शेतकरीवर्ग हे पीक घेण्यासाठी आतूर दिसत आहे.सर्वत्र कपाशी पीक मुख्य असल्याने लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या तरी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याने पुढील उत्पन्न धोक्याचे ठरणार आहे. बोंडअळी असलेली फरदड कपाशी लगेच काढली गेली पाहिजे. थोड्याशा रकमेच्या मोहात न पडता ही कपाशी नष्ट करणे गरजेचे आहे. शासकीय कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठ यांच्याकडून फरदड न घेण्याचा सल्ला शेतकरी बांधवाना दिला जात आहे.-अभिमन्यू चोपडे, तालुका कृषी अधिकारी, जामनेरअपेक्षेपेक्षा यंदा उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यात अति पावसामुळे निम्म्यावर कपाशी वाया गेली. शेतात लावलेला मोठा खर्च पाहता सारखा तोटा सहन करावा लागत आहे. शेतात लावलेला काहीना काही खर्च निघेल या आशेपोटी फरदड घेण्याचा प्रयत्न करीत आहे.-लखन चव्हाण, शेतकरी, कुंभारी तांडा, ता.जामनेर