शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात 40 हजार हेक्टरवर कापसाची लागवड

By admin | Updated: June 14, 2017 17:22 IST

कोरडवाहू कापसाची लागवड मात्र थांबली आहे

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 14 - जिल्हाभरात आतार्पयत विविध खरीप पिकांची 52 हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यात एकटय़ा कापसाची 40 हजार हेक्टरवर लागवड झाली असून, या क्षेत्रात पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाचे क्षेत्र 35 हजार हेक्टर एवढे आहे. कोरडवाहू कापसाची लागवड मात्र थांबली आहे. मान्सूनपूर्व पाऊस सर्वत्र बरसला. परंतु मागील दोन दिवसांपासून पाऊस नाही. काही भागात तुरळक पाऊस सुरू आहे. जिल्हाभर मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर मशागतीची कामे गतीने झाली. परंतु नंतर पावसाबाबत अनुकूल स्थिती नसल्याने पेरण्या थांबल्या. तापीकाठावरील काही भागामध्ये पेरण्या झाल्या. या भागाचा अपवाद वगळता इतरत्र पेरण्या झालेल्या नाहीत. कडधान्य, तृणधान्य, गळीत धान्य यांची पेरणी किंवा लागवड थांबली आहे. सोयाबीन, तूर या पिकांना उगवणीसाठी 40 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची गरज असते. पण एवढा पाऊस मागील दोन दिवसात नसल्याने पेरण्या थांबल्या आहेत. शेतकरी पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणीसाठी 40 मि.मी. पावसाची गरज असते. एवढा पाऊस मागील आठवडय़ात काही तालुक्यांमध्ये झाला. नंतर मात्र पाऊस नाही. सद्य:स्थितीत पेरणी टाळावी. आणखी पाऊस बरसल्यानंतर पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्हाभरात 52 हजार हेक्टरवर पेरण्या झालेल्या असल्या तरी त्यात एकटय़ा कापसाचे क्षेत्र 40 हजार हेक्टर आहे. उर्वरित 12 हजार हेक्टरवर सोयाबीन, ज्वारी, तूर, उडीद मूग या पिकांची पेरणी झाली आहे. 35 हजार हेक्टरवर पूर्वहंगामी (बागायती) कापसाची लागवड झाली आहे. कृत्रीम जलसाठा उपलब्ध असलेले शेतकरी कापूस लागवड करीत आहेत. कापसाची लागवड सुरूच आहे. पण कोरडवाहू शेतक:यांनी मात्र कापसाची लागवड सुरू केलेली नसल्याचे चित्र आहे. कोरडवाहू कापसाची लागवड मागील अठवडय़ात काही भागात झाली. त्याची आकडेवारी पाच हजार हेक्टर्पयत असल्याचा अंदाज आहे.