शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात नगरसेवकांचा ‘इंटरेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST

एकनाथ खडसेंचा आरोप : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील शिवाजीनगर भागातील नागरिकांसह जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या दृष्टीने ...

एकनाथ खडसेंचा आरोप :

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील शिवाजीनगर भागातील नागरिकांसह जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या दृष्टीने शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम महत्त्वाचे आहे. मात्र, केवळ काही नगरसेवक व मक्तेदाराच्या आर्थिक फायद्यासाठी हे काम रखडवले जात असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच जेवढे हे काम रखडेल तेवढी या कामाची रक्कम वाढेल व प्रशासकीय मान्यता मिळाल्यास शासनाकडून जास्त निधी मिळेल, अशी ठेकेदाराची भूमिका असल्याने हे संथगतीने सुरू असल्याचा आरोप खडसे यांनी केला.

शहरातील शांताराम अहिरे यांनी शिवाजीनगर उड्डाणपुलाचे थांबलेले काम लवकर सुरू व्हावे या मागणीसाठी मनपासमोर उपोषण पुकारले होते. सोमवारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मनपासमोर जाऊन अहिरे यांचे उपोषण सोडविले.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ओबीसींना ३ महिन्यात आरक्षण देऊ, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईल, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. मात्र, फडणवीस वारंवार अशी वक्तव्ये करतात. कारण फडणवीस यांनी यापूर्वी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनावेळीही, वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत आपण लग्न करणार नाहीत, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण त्यांनी ही भीष्मप्रतिज्ञा मोडून लग्न केले असा चिमटा घेत खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ओबीसींच्या मुद्यावर लक्ष्य केले आहे.