शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

मनपाच्या ‘वसुली मिशन’ ला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:16 IST

-एकूण वसुली ७६ कोटींची मागणी -आतापर्यंत झालेली वसुली ४५ कोटी अंदाजे -वसुलीसाठी १२ पथकांची नियुक्ती -२६ दिवसात ४० ते ...

-एकूण वसुली ७६ कोटींची मागणी

-आतापर्यंत झालेली वसुली ४५ कोटी अंदाजे

-वसुलीसाठी १२ पथकांची नियुक्ती

-२६ दिवसात ४० ते ५० टक्के वसुलीचे आव्हान

- शहरात १ लाख १० हजार मालमत्ताधारक

-बडे थकबाकीदार रडारवर

- मालमत्ता कराची रक्कम न भरल्यास नळ कनेक्शन होणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराची रक्कम भरण्याची ३१ मार्च पर्यंत शेवटची मूदत असून, मनपाने सालाबादाप्रमाणे मार्च एंडीगच्या पार्श्वभूमीवर वसुलीसाठी कंबर कसली आहे. मनपाने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रभाग समिती निहाय प्रत्येकी ३ अशा १२ पथकांची नियुक्ती केली आहे. दररोज शहरातील प्रत्येक भागात वसुलीची मोहीम राबविण्याचा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच बड्या थकबाकीदारांवर मनपाची नजर असणार आहे. यासह थकबाकीदारांचे नळ कनेक्शन देखील सील करण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आहे. यासह कोरोनामुळे खबरदारी घेण्याचेही आदेश मनपा कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी मनपाची कोरोनाचा प्रादुर्भावामुळे वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. यंदा ही वसुलीची टक्केवारी वाढावी यासाठी मनपाने जानेवारी महिन्यापासूनच वसुलीसाठी कंबर कसली होती. मनपाने जानेवारी महिन्यात अभय योजना राबवून मालमत्ताधारकांना काही प्रमाणात सुट देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे मनपाची वसुली काही प्रमाणात वाढली आहे. तसेच मालमत्ताकराच्या रक्कमेच्या वसुलीसाठी आता मनपाने विशेष वसुली मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून, यासाठी प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

वसुलीसह कोरोनाचे आव्हानही कायम

मनपाकडून प्रभाग समितीनिहाय प्रत्येकी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये एकूण १०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. थकीत कर्ज व उत्पन्न कमी यामुळे कोलमडलेल्या आर्थिक नियोजनामुळे हवालदील झालेल्या मनपा प्रशासनाने थकबाकी असलेल्या मिळकतधारकांवर वक्रदृष्टी केली आहे. सध्या महापालिकेच्या चारही प्रभाग समित्यांची वसुली ५० ते ६० टक्के इतकीच झाली आहे. आर्थिक वर्ष सपंण्यासाठी अवघे २६ दिवस बाकी असल्याने या २८ दिवसात ४० ते ५० टक्के वसुलीचे आव्हान मनपा प्रशासनासमोर आहेत. यासह एकीकडे वसुलीचे आव्हान मनपाला पार पाडावे लागणार आहे. तर दुसरीकडे मनपासमोर कोरोनाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव यावर देखील प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे.

नळकनेक्शन ही केले जातील कट

मनपा आयुक्तांनी प्रभाग अधिकारी यांना १०० बड्या थकबाकीदारांच्या याद्या तयार करण्याचे आदेश दिले होते. या याद्या देखील तयार करण्यात आल्या असून, चौकाचौकात त्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. यासह ज्यांनी मालमत्ताकराची रक्कम भरली नाही. अशा नागरिकांचे नळ कनेक्शन देखील मनपाकडून कट करण्यात येणार आहे.