शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मालमत्ताकराच्या थकबाकीदारांसाठी मनपाची ‘अभय’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:45 IST

थकबाकीदारांना मिळणार दिलासा : शास्तीच्या रक्कमेत ७५ टक्क्यापर्यंत सुट ; उद्यापासून घेता येईल लाभ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - ...

थकबाकीदारांना मिळणार दिलासा : शास्तीच्या रक्कमेत ७५ टक्क्यापर्यंत सुट ; उद्यापासून घेता येईल लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - कोरोना काळात थकलेली मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी तसेच थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या उद्देशाने मनपा प्रशासनाने थकबाकीदारांसाठी अभय योजना आणली आहे. या योजनेनुसार ७ जानेवारीपासून ते फेब्रुवारी अखेरपर्यंत मालमत्ता कराची मुळरक्कमेसह थकबाकी भरल्यास दंडाच्या रक्कमेवर ७५ ते २५ टक्क्यांची सूट देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच आतापर्यंत थकबाकीवर एक वर्षापर्यंतच दरमहा २ टक्के दंड लावण्यात येणार होता. तो दंड आता जोपर्यंत थकबाकी भरणाकरेपर्यंत लावला जाणार असल्याचेही आयुक्त कुलकर्णी यांनी सांगीतले आहे.

शहरातील विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता मनपा आयुक्तांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन,माजी महापौर नितीन लढ्ढा, सभागृह नेते ललित कोल्हे, ॲड.शुचिता हाडा आदी उपस्थित होते. या बैठकीत अभय योजनेबाबत निर्णय घेण्यात आला. पत्रकार परिषदेत आयुक्तांनी सांगितले की, यंदा मालमत्ता कराची बिले विलंबाने वाटप करण्यात आली. त्यामुळे मालमत्ता कराची वसुली देखील प्रभावीपणे झाली नाही. तसेच करोना काळात सर्व सामन्य नागरिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. या दृष्टीने महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या थकबाकीची वसुली व्हावी तसेच थकाबाकीदारांना देखील दिलासा मिळावा या उद्देशाने अभय योजना आणल्याचे आयुक्तांनी सांगीतले.

आधीची पध्दत

महापालिका अधिनियमातील मालमत्ता कराच्या कलमानुसर थकबाकीवर लावण्यात आलेल्या दंडात सवलत देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शहरातील मालमत्ताकरांच्या थकबाकीदारांना पहिल्या महिन्यात रक्कम भरल्यास काही प्रमाणात सुटदेण्यात येते. मात्र, घरपट्टी डिसेंबरअखेरपर्यंत न भरल्यास १ जानेवारीपासून त्यावर दरमहा २ टक्के शास्ती दंड म्हणून आकरण्यात येते.

पुढील दंडाचा बोजा टळणार

थकबाकीदार मिळकतधारकांना वर्षाला २४ टक्के शास्ती लावण्यात येते. तसेच अनेक वर्ष ही रक्कम न भरल्यास २४ टक्केच शास्ती असते. मात्र, आता अभय योजनेचा लाभ न घेतल्यास १ एप्रिल २०२१ पासून एका वर्षासाठी कमाल २४ टक्के इतकी शास्ती न आकारता कायद्यातील तरतुदीनुसार कर भरण्याच्या शेवटच्या तारखेपासून रक्कम भरेपर्यंत प्रत्येक महिन्यासाठी २ टक्के शास्ती आकारली जाणार अहे. त्यानुसार २०२१-२२ या आर्थिक वर्षात सुधारीत बिले बजावण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

काय आहे योजना ?

७ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी ३१ जानेवारीपर्यंत मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास त्यांना दंडाच्या रक्कमेत ७५ टक्के सुट मिळणार आहे. तर १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत भरणा केल्यास ५० टक्के सुट तर १५ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत थकबाकीचा भरणा केल्यास २५ टक्के सुट मिळणार आहे.

यांना नाही मिळणार लाभ

१. शास्तीची सर्व रक्कम भरणा केलेल्या मालमत्ताधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

२. थकबाकीदार व मिळकतधारकांना मालमत्ताकराचा संपुर्ण भरणा करणे आवश्यक आहे.

३. मालमत्ताकरासंदभार्ती दावा न्यायालयात प्रलंबीत असलेल्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही.

४.गाळेधारकांना नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यामुळे या भोगवटादारांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही.

मालमत्तांचे फेरमुल्यांकन

मनपा हद्दीतील सर्व मालमत्तांचे फेरमुल्यांकनाचे काम सुरु करण्यात आले आहे. जीपीएस तसेच मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून देखील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येवून ३१ मार्च २०२१ पर्यंत सर्व मालमत्तांचे फेरमुल्यांकन पुर्ण होईल अशी माहीती मनपा आयुक्तांनी दिली. हे फेर मुल्यांकन केवळ मालमत्ता करात सुसुत्रता तसेच समानता आणण्यासाठी केले जाणार आहे. यामध्ये करात कुठलीही वाढ केली जाणार नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.