शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

शिवाजीनगर पुलाच्या कामात अडथळा आणला तर मनपा येणार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 17:34 IST

कोर्टाच्या आदेशाच्या अवमाननेची भिती

ठळक मुद्दे आधीच मनपाने ढकललीय जबाबदारीपर्यायी रस्ते असतानाही मागणी रेल्वेने मक्तेदाराला कार्यादेश देऊनही काम खोळंबले

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाचा खर्च पेलवणार नसल्याने रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ढकलल्यानंतर शिरजोर झालेल्या महापालिकेने पर्यायी रस्ता दिल्याशिवाय शिवाजीनगर पूल न पाडण्याचे पत्र रेल्वेला देत कामात अडथळा आणला आहे. मात्र त्यामुळे मनपाला न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.ब्रिटीशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल १०० वर्षांहून अधिक जुना झाल्याने जीर्ण झाला असल्याने तो कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने या पुलाचे काम करण्याची मागणी होत होती. मात्र हे काम कोणी करावयाचे? यावरच चालढकल सुरू होती. रस्ता मनपाच्या ताब्यात असल्याने मनपानेच या पुलाचे काम करावे, अशी रेल्वेची भूमिका होती. मात्र मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मनपाने पूल बांधणे शक्य नसल्याची व हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याने त्यांनी त्याचा निम्मा खर्च करावा, अशी मागणी शासनाकडे केली होती. पूल कोसळून नागरिकांच्या जिवाला धोका उद्भवू नये म्हणून रेल्वे व शासनाने या उड्डाणपुलाचे काम करावे, असे ठरले.मात्र त्यावर निर्णय अंतिम होत नव्हता. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून पुलाचे काम तातडीने करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयात रेल्वेने त्यांच्या हद्दीतील काम तातडीने करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानुसार निविदाही प्रसिद्ध करून अंतिम केली. तसेच मक्तेदाराला कार्यादेशही दिले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्ही शासनाला कळवतो. शासन आम्हाला याबाबत सूचना देईल, असे सांगताच कोर्टाने सार्वजनिक बांधकाम विभागाला फटकारून किती दिवसांत पुलाच्या जोडरस्त्यांचे काम करणार? ते कोर्टाला सांगा, असे सुनावले आहे. त्यामुळे आता पुढील तारखेला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार आहे.पर्यायी रस्ते असतानाही मागणीशिवाजीनगर पुलाचे हे काम रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहे. हा विषय महापालिकेचा नाही, पुलाच्या कामासाठी महापालिकेने यापूर्वीच ना-हरकत दिली आहे. सध्या अस्तित्वात असलेले सूरत रेल्वे गेट आणि ममुराबाद स्मशानभूमीजवळ पुलाखालून पर्यायी रस्ते असल्याचे शहर अभियंता बी.डी. दाभाडे यांनी स्थायी समितीच्या सभेत स्पष्ट केले. असे असताना त्यांनी रेल्वेला आधी पर्यायी मार्ग करण्याबाबत पत्र देऊन कामात खोडा घालण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.--------...तर मनपा अडचणीतआर्थिक परिस्थितीचे कारण दाखवत जबाबदारी ढकलणाºया मनपाच्या नगरसेवकांना आता पुलाचे काम मार्गी लागल्यावर नागरिकांच्या गैरसोयीचा पुळका आला आहे. शहर अभियंत्यांनी याबाबत कुणाशी चर्चा करून रेल्वेला पर्यायी रस्त्यांबाबत पत्र दिले? मनपाच्या आयुक्तांशी चर्चा केली होती का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण रेल्वेने कोर्टात लेखी आश्वासन दिलेले असताना रेल्वे उड्डाणपुलाची कुठलीही जबाबदारी न घेणारी मनपा मात्र पर्यायी रस्त्यांच्या अटी घालून शिवाजीनगर पुलाच्या कामात अडथळा आणणार असेल तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊन संबंधीत अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.