शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

शिवाजीनगर पुलाच्या कामात अडथळा आणला तर मनपा येणार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 17:34 IST

कोर्टाच्या आदेशाच्या अवमाननेची भिती

ठळक मुद्दे आधीच मनपाने ढकललीय जबाबदारीपर्यायी रस्ते असतानाही मागणी रेल्वेने मक्तेदाराला कार्यादेश देऊनही काम खोळंबले

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाचा खर्च पेलवणार नसल्याने रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ढकलल्यानंतर शिरजोर झालेल्या महापालिकेने पर्यायी रस्ता दिल्याशिवाय शिवाजीनगर पूल न पाडण्याचे पत्र रेल्वेला देत कामात अडथळा आणला आहे. मात्र त्यामुळे मनपाला न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.ब्रिटीशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल १०० वर्षांहून अधिक जुना झाल्याने जीर्ण झाला असल्याने तो कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने या पुलाचे काम करण्याची मागणी होत होती. मात्र हे काम कोणी करावयाचे? यावरच चालढकल सुरू होती. रस्ता मनपाच्या ताब्यात असल्याने मनपानेच या पुलाचे काम करावे, अशी रेल्वेची भूमिका होती. मात्र मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मनपाने पूल बांधणे शक्य नसल्याची व हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याने त्यांनी त्याचा निम्मा खर्च करावा, अशी मागणी शासनाकडे केली होती. पूल कोसळून नागरिकांच्या जिवाला धोका उद्भवू नये म्हणून रेल्वे व शासनाने या उड्डाणपुलाचे काम करावे, असे ठरले.मात्र त्यावर निर्णय अंतिम होत नव्हता. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून पुलाचे काम तातडीने करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयात रेल्वेने त्यांच्या हद्दीतील काम तातडीने करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानुसार निविदाही प्रसिद्ध करून अंतिम केली. तसेच मक्तेदाराला कार्यादेशही दिले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्ही शासनाला कळवतो. शासन आम्हाला याबाबत सूचना देईल, असे सांगताच कोर्टाने सार्वजनिक बांधकाम विभागाला फटकारून किती दिवसांत पुलाच्या जोडरस्त्यांचे काम करणार? ते कोर्टाला सांगा, असे सुनावले आहे. त्यामुळे आता पुढील तारखेला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार आहे.पर्यायी रस्ते असतानाही मागणीशिवाजीनगर पुलाचे हे काम रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहे. हा विषय महापालिकेचा नाही, पुलाच्या कामासाठी महापालिकेने यापूर्वीच ना-हरकत दिली आहे. सध्या अस्तित्वात असलेले सूरत रेल्वे गेट आणि ममुराबाद स्मशानभूमीजवळ पुलाखालून पर्यायी रस्ते असल्याचे शहर अभियंता बी.डी. दाभाडे यांनी स्थायी समितीच्या सभेत स्पष्ट केले. असे असताना त्यांनी रेल्वेला आधी पर्यायी मार्ग करण्याबाबत पत्र देऊन कामात खोडा घालण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.--------...तर मनपा अडचणीतआर्थिक परिस्थितीचे कारण दाखवत जबाबदारी ढकलणाºया मनपाच्या नगरसेवकांना आता पुलाचे काम मार्गी लागल्यावर नागरिकांच्या गैरसोयीचा पुळका आला आहे. शहर अभियंत्यांनी याबाबत कुणाशी चर्चा करून रेल्वेला पर्यायी रस्त्यांबाबत पत्र दिले? मनपाच्या आयुक्तांशी चर्चा केली होती का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण रेल्वेने कोर्टात लेखी आश्वासन दिलेले असताना रेल्वे उड्डाणपुलाची कुठलीही जबाबदारी न घेणारी मनपा मात्र पर्यायी रस्त्यांच्या अटी घालून शिवाजीनगर पुलाच्या कामात अडथळा आणणार असेल तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊन संबंधीत अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.