शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

३ लाखांच्या खर्चासाठी जलपर्णी काढण्यास मनपाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावात जलपर्णी या वनस्पतीचे वाढत जाणाऱ्या प्रमाणामुळे तलावाचे वैभव नष्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावात जलपर्णी या वनस्पतीचे वाढत जाणाऱ्या प्रमाणामुळे तलावाचे वैभव नष्ट होण्याचा मार्गावर आहे. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी आपली भूमिका जाहीर करून, मेहरूण तलावात होत असलेल्या प्रदूषणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केले आहे. एकीकडे जलपर्णीचा विळखा वाढत असताना, मनपा प्रशासनाने केवळ ३ लाखांचा खर्चाकडे पाहून तलावात वाढत जाणाऱ्या जलपर्णी काढण्यास नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी प्रतिष्ठानकडून मनपा आयुक्त व महापौरांकडे तलावातील जलपर्णी काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापौर भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्तांकडे याबाबत चर्चा करून, जलपर्णी काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, आयुक्तांनी तलावाची पाहणी करून, जलपर्णी तलावाच्या मुख्य भागात नसल्याने ती पाणी कमी झाल्यावर उन्हामुळे आपोआप नष्ट होईल, असा अंदाज लावला होता. त्यामुळे मनपाने जलपर्णी काढण्यासाठी ३ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र, त्यानंतर जलपर्णी काढण्याचा विषय प्रलंबितच राहिला.

सुशोभिकरणावर कोट्यवधींचा खर्च, जैवविविधतेकडे मात्र दुर्लक्ष

मनपाकडून आतापर्यंत मेहरूण तलावाच्या बाह्य सौंदर्यांवर कोट्यवधीचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, तलावातील प्रदूषित होणाऱ्या पाण्याबाबत कोणताही विचार मनपाकडून आतापर्यंत झालेला नाही. अनेक वर्षांपासून तलावात सांडपाणी सोडले जात आहे. मात्र, यावर कोणताही उपाय मनपाने केलेला नाही. तर आता जलपर्णी वाढत जात असतानाही मनपाकडून उपाययोजना नाहीत, सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित होत असल्याने पाण्यातील जलचरांचे आयुष्य धोक्यात आले आहे.