शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

नियम मोडणाऱ्यांकडून मनपाची ३६ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवरदेखील मनपाकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत महापालिकेकडून कोरोनाकाळात नियम मोडणाऱ्यांकडून महापालिका प्रशासनाने एकूण ३६ लाखांची वसुली केली आहे. यामध्ये मास्क न लावणाऱ्या दोन हजारहून अधिक नागरिकांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या पथकांकडून शहरात जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच मास्क न लावणाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड जिल्हा प्रशासनाने निश्चित केला आहे, तर दुकानामध्ये प्रमाणाबाहेर नागरिकांची गर्दी असल्यास या दुकानांवरदेखील कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शहरातील अनेक दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

वर्षभरात ४५० दुकाने करण्यात आली सील

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून काही महत्त्वाचे निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात महापालिकेने शहरातील ४५० दुकाने सील केली असून, या दुकानदारांकडून २४ लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच नियम मोडणाऱ्या ४३ दुकानदारांवर मनपाकडून गुन्हे दाखलदेखील करण्यात आले आहेत. यासह नियम मोडणाऱ्या सार्वजनिक वाहतूक चालकांवरदेखील कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मनपाची वसुली जोरात

कोरोनाकाळात महापालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र नियम मोडणाऱ्यांकडून महापालिकेने चांगलीच वसुली केली आहे. महापालिकेकडून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सहा पथके स्थापन केली असून, मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून ३६ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. दरम्यान आता जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत आपले निर्बंध वाढवले असून, या काळात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई व झालेली वसुली

कारण - दंड झालेल्यांची संख्या - झालेली वसुली

मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई - २,२२६ - ९ लाख ५८ हजार

दुकाने व मंगल कार्यालय - ४५० - २४ लाख २६ हजार

सार्वजनिक वाहतूक - १७५ - १ लाख १६ हजार