शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

नियम मोडणाऱ्यांकडून मनपाची ३६ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवरदेखील मनपाकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत महापालिकेकडून कोरोनाकाळात नियम मोडणाऱ्यांकडून महापालिका प्रशासनाने एकूण ३६ लाखांची वसुली केली आहे. यामध्ये मास्क न लावणाऱ्या दोन हजारहून अधिक नागरिकांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या पथकांकडून शहरात जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच मास्क न लावणाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड जिल्हा प्रशासनाने निश्चित केला आहे, तर दुकानामध्ये प्रमाणाबाहेर नागरिकांची गर्दी असल्यास या दुकानांवरदेखील कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शहरातील अनेक दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

वर्षभरात ४५० दुकाने करण्यात आली सील

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून काही महत्त्वाचे निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात महापालिकेने शहरातील ४५० दुकाने सील केली असून, या दुकानदारांकडून २४ लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच नियम मोडणाऱ्या ४३ दुकानदारांवर मनपाकडून गुन्हे दाखलदेखील करण्यात आले आहेत. यासह नियम मोडणाऱ्या सार्वजनिक वाहतूक चालकांवरदेखील कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मनपाची वसुली जोरात

कोरोनाकाळात महापालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र नियम मोडणाऱ्यांकडून महापालिकेने चांगलीच वसुली केली आहे. महापालिकेकडून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सहा पथके स्थापन केली असून, मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून ३६ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. दरम्यान आता जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत आपले निर्बंध वाढवले असून, या काळात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई व झालेली वसुली

कारण - दंड झालेल्यांची संख्या - झालेली वसुली

मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई - २,२२६ - ९ लाख ५८ हजार

दुकाने व मंगल कार्यालय - ४५० - २४ लाख २६ हजार

सार्वजनिक वाहतूक - १७५ - १ लाख १६ हजार