शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

बॅण्डच्या सुरावटींमध्ये ‘कोरोनाष्टके’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 14:55 IST

यंदा मात्र सोहळ्यांच्या हंगामात बॅण्डचे हवेहवेसे वाटणारे सूर जणू ‘कोरोनाष्टके’ झाल्याने सन्नाटा पसरला आहे.

ठळक मुद्देसंडे हटके स्टोरी३०० वादक कलावंतांच्या कुटुंंबांवर उपासमारीचा वरवंटादेशभर निनादणाऱ्या चाळीसगावच्या बॅण्डचे सूर यंदा शांत

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगावच्या बॅण्डचे ‘निरागस’ सूर निनादले की, भल्याभल्यांना थिरकण्याचा मोह आवरता येत नाही. समारंभ कोणताही असो क्षण झंकारून निघतात. चाळीसगावच्या याच बॅण्ड वादक कलावंतांनी देशभर आपली कला पोहचवली आहे. यंदा मात्र सोहळ्यांच्या हंगामात बॅण्डचे हवेहवेसे वाटणारे सूर जणू ‘कोरोनाष्टके’ झाल्याने सन्नाटा पसरला आहे. सूरांवर ‘पोट’ भरणाºया तीनशे वादक कलावंतांच्या कुटुंंबांवर उपासमारीचा वरवंटा फिरला आहे. विवाह सोहळे रद्द होऊन लागल्याने हे बॅण्ड वादक पुरते हतबल झाले आहे.चाळीसगावच्या बॅण्ड पथकांना दिडशे वर्षांची परंपरा आहे. १९९५ पर्यंत बॅण्डसाठी वैभवाचा काळ होता. पुढे बॅन्जो आणि त्यानंतर डीजेच्या दणदणाटात बॅण्डचे सूर काहीसे दाबले गेले. मात्र गेल्या काही वर्षांपासून डीजे वाजविण्यावर आलेल्या निबंर्धामुळे बॅण्ड पथकांची मागणी वाढली आहे. साधारण वर्षांचे नऊ महिने विवाहे सोहळे होतात. हाच बॅण्ड पथकांचा 'मुख्य सीझन' यंदा मात्र कोरोना आजारासह देशव्यापी संचारबंदीमुळे बॅण्ड पथकांचा रोजगार हिसकावला गेला आहे. त्यांच्यावर अवलंबून असणाºया कुटुंंबांचेदेखील हाल होत आहे. तमाशा कलावंतांप्रमाणेच मानधन मिळावे, अशी मागणी गेल्या १० वर्षांपासून बॅण्ड कलावंत करताहेत.दरमहा सहा ते सात हजार उत्पन्नबॅण्ड पथकांसाठी तेजी सीझन म्हणजे विवाह सोहळ्यांची धूम. चाळीसगावी एकूण सात बॅण्ड पथके आहेत. यात ३०० वादक कलावंतांच्या कुटुंंबांचा उदरनिर्वाह होतो. एका भरगच्च सीझनमध्ये प्रत्येक वादकाला ७५ हजार रुपये मिळतात. त्यामुळे हे मासिक उत्पन्न पाच ते सहा हजारांपर्यंत पोहचते. उर्वरित तीन महिने हे वादक वेगवेगळी कामे करतात. बॅण्ड वादनामुळे त्यांना श्वसनाचे आजारही लवकर जडतात.यावर्षी कोरोनामुळे मार्च ते जूनमधील बॅण्ड पथकांकडे नोंदणी झालेल्या विवाह सोहळ्यांचा बहुतांशी तारखा रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रत्येक वादक कलावंताचे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सातही पथके सद्य:स्थितीत घरी बसून आहेत.देशभर चाळीसगावच्या बॅण्डचे सूरशास्त्रीय संगीताची ‘जोड’ हा चाळीसगावच्या बॅण्डचा वेगळा पैलू आहे. त्यामुळे राज्याची उपराजनाधी नागपूर असो की राजधानी मुंबई चाळीसगावच्या बॅण्ड तालावर सर्वांचीच पावले थिरकतात. नागपुरात तर दरवर्षी दोन पथके नऊ महिन्यांच्या सीझनसाठी बुक असतात.ओडिसातील झारतुकडा, कर्नाटकाती विजापूर, गुराजरातमधील सुरत, अहमदाबाद, बडोदा, तामिळनाडूतील चेन्नई, मध्य प्रदेशातील इंदूर, बºहाणपूर आदी ठिकाणी ही पथके दरवर्षी जातात. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे ‘सूर आणि ताल’ यांचेही ‘लॉकडाऊन’ झाल्याने बॅण्ड पथकातील ३०० कलावंत आणि त्यांचे कुटुंंबे हताश झाली आहे.चाळीसगावच्या बॅण्ड पथकांचा लौकिक देशभर असल्याने आमचा सीझन दरवर्षी ‘फुल्ल’ असतो. यावर्षी मात्र कोरोनामुळे उपासमारीचे संकट ओढावले आहे. चार महिन्यांचा सीझन बुडाला आहे. तमाशा कलावंतांप्रमाणे आम्हालाही शासकीय मानधन मिळावे, अशी १० वर्षांपासून मागणी करतो आहे. दखल मात्र घेतली गेली नाही. आपत्तीच्या काळात तरी मदत मिळावी, अशी शासनाकडून अपेक्षा आहे.- विजय गुरव, प्रमुख, सद्गुरू बॅण्ड पथक, चाळीसगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChalisgaonचाळीसगाव