शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

बॅण्डच्या सुरावटींमध्ये ‘कोरोनाष्टके’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 14:55 IST

यंदा मात्र सोहळ्यांच्या हंगामात बॅण्डचे हवेहवेसे वाटणारे सूर जणू ‘कोरोनाष्टके’ झाल्याने सन्नाटा पसरला आहे.

ठळक मुद्देसंडे हटके स्टोरी३०० वादक कलावंतांच्या कुटुंंबांवर उपासमारीचा वरवंटादेशभर निनादणाऱ्या चाळीसगावच्या बॅण्डचे सूर यंदा शांत

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगावच्या बॅण्डचे ‘निरागस’ सूर निनादले की, भल्याभल्यांना थिरकण्याचा मोह आवरता येत नाही. समारंभ कोणताही असो क्षण झंकारून निघतात. चाळीसगावच्या याच बॅण्ड वादक कलावंतांनी देशभर आपली कला पोहचवली आहे. यंदा मात्र सोहळ्यांच्या हंगामात बॅण्डचे हवेहवेसे वाटणारे सूर जणू ‘कोरोनाष्टके’ झाल्याने सन्नाटा पसरला आहे. सूरांवर ‘पोट’ भरणाºया तीनशे वादक कलावंतांच्या कुटुंंबांवर उपासमारीचा वरवंटा फिरला आहे. विवाह सोहळे रद्द होऊन लागल्याने हे बॅण्ड वादक पुरते हतबल झाले आहे.चाळीसगावच्या बॅण्ड पथकांना दिडशे वर्षांची परंपरा आहे. १९९५ पर्यंत बॅण्डसाठी वैभवाचा काळ होता. पुढे बॅन्जो आणि त्यानंतर डीजेच्या दणदणाटात बॅण्डचे सूर काहीसे दाबले गेले. मात्र गेल्या काही वर्षांपासून डीजे वाजविण्यावर आलेल्या निबंर्धामुळे बॅण्ड पथकांची मागणी वाढली आहे. साधारण वर्षांचे नऊ महिने विवाहे सोहळे होतात. हाच बॅण्ड पथकांचा 'मुख्य सीझन' यंदा मात्र कोरोना आजारासह देशव्यापी संचारबंदीमुळे बॅण्ड पथकांचा रोजगार हिसकावला गेला आहे. त्यांच्यावर अवलंबून असणाºया कुटुंंबांचेदेखील हाल होत आहे. तमाशा कलावंतांप्रमाणेच मानधन मिळावे, अशी मागणी गेल्या १० वर्षांपासून बॅण्ड कलावंत करताहेत.दरमहा सहा ते सात हजार उत्पन्नबॅण्ड पथकांसाठी तेजी सीझन म्हणजे विवाह सोहळ्यांची धूम. चाळीसगावी एकूण सात बॅण्ड पथके आहेत. यात ३०० वादक कलावंतांच्या कुटुंंबांचा उदरनिर्वाह होतो. एका भरगच्च सीझनमध्ये प्रत्येक वादकाला ७५ हजार रुपये मिळतात. त्यामुळे हे मासिक उत्पन्न पाच ते सहा हजारांपर्यंत पोहचते. उर्वरित तीन महिने हे वादक वेगवेगळी कामे करतात. बॅण्ड वादनामुळे त्यांना श्वसनाचे आजारही लवकर जडतात.यावर्षी कोरोनामुळे मार्च ते जूनमधील बॅण्ड पथकांकडे नोंदणी झालेल्या विवाह सोहळ्यांचा बहुतांशी तारखा रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रत्येक वादक कलावंताचे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सातही पथके सद्य:स्थितीत घरी बसून आहेत.देशभर चाळीसगावच्या बॅण्डचे सूरशास्त्रीय संगीताची ‘जोड’ हा चाळीसगावच्या बॅण्डचा वेगळा पैलू आहे. त्यामुळे राज्याची उपराजनाधी नागपूर असो की राजधानी मुंबई चाळीसगावच्या बॅण्ड तालावर सर्वांचीच पावले थिरकतात. नागपुरात तर दरवर्षी दोन पथके नऊ महिन्यांच्या सीझनसाठी बुक असतात.ओडिसातील झारतुकडा, कर्नाटकाती विजापूर, गुराजरातमधील सुरत, अहमदाबाद, बडोदा, तामिळनाडूतील चेन्नई, मध्य प्रदेशातील इंदूर, बºहाणपूर आदी ठिकाणी ही पथके दरवर्षी जातात. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे ‘सूर आणि ताल’ यांचेही ‘लॉकडाऊन’ झाल्याने बॅण्ड पथकातील ३०० कलावंत आणि त्यांचे कुटुंंबे हताश झाली आहे.चाळीसगावच्या बॅण्ड पथकांचा लौकिक देशभर असल्याने आमचा सीझन दरवर्षी ‘फुल्ल’ असतो. यावर्षी मात्र कोरोनामुळे उपासमारीचे संकट ओढावले आहे. चार महिन्यांचा सीझन बुडाला आहे. तमाशा कलावंतांप्रमाणे आम्हालाही शासकीय मानधन मिळावे, अशी १० वर्षांपासून मागणी करतो आहे. दखल मात्र घेतली गेली नाही. आपत्तीच्या काळात तरी मदत मिळावी, अशी शासनाकडून अपेक्षा आहे.- विजय गुरव, प्रमुख, सद्गुरू बॅण्ड पथक, चाळीसगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChalisgaonचाळीसगाव