शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे तृतीयपंथीयांचा जगण्यासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून जळगाव जिल्ह्यात तृतीयपंथीयांची आर्थिक परिस्थिती अंत्यंत बिकट झाली आहे. जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून जळगाव जिल्ह्यात तृतीयपंथीयांची आर्थिक परिस्थिती अंत्यंत बिकट झाली आहे. जिल्ह्यात नोंदणी असलेले २४० तृतीयपंथीय आहेत. त्यातही गुरू परंपरेत राहणाऱ्या तृतीयपंथीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उत्पन्न नसल्याने त्यांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.

गेल्या मार्च महिन्यात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाले. आता त्याला १४ महिने उलटत आले असले तरी परिस्थिती सुरळीत झालेली नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी इतरांवर अवलंबून असलेल्या तृतीयपंथीयांच्या वाट्याला आता दुर्लक्षित जगण्यासोबतच पोट कसे भरायचे ही विवंचनादेखील समोर आली आहे. बहुतांश तृतीयपंथी हे रेल्वे, बाजार, बस या ठिकाणी भीक मागून आपले जीवन जगत असतात. मात्र गेल्या १४ महिन्यात रेल्वेदेखील बराच काळ बंद राहिल्या आहेत. आता पूर्वीसारखे रेल्वेत जाता येत नाही. तसेच बाजारदेखील या काळात काही मोजके महिनेच सुरू राहिला आहे.त्यामुळे तृतीयपंथीयांचे उत्पन्न नाही.

काहीवेळा तृतीयपंथीय वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये सहभागी होत. तेथेदेखील त्यांना पैसे मिळत असत. मात्र मागच्या वर्षभरापासून सोहळ्यांना उपस्थितीला मर्यादा आली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, सावदा, फैजपूर, पाल चोपडा येथे तृतीयपंथीय जास्त करून राहतात. तसेच जळगाव शहरातही तृतीयपंथीयांची दोन घरे आहेत.

जगायचे कसे हीच चिंता - संजना जान

गेल्या वर्षभरापासून उत्पन्नच नाही. आमच्या गुरू परंपरेत ३६ जण आहेत. त्यातील काही जण माझ्याच घरात राहतात. ज्यांची भाड्याने घेतलेली घरे आहेत त्यांच्या मालकांना आम्ही घरभाडे कमी करण्याची विनंती केली. काहींनी ती मान्यदेखील केली आहे. त्यासोबतच आम्ही अनेकांना जमेल तशी मदत करत आहोत. पण हे किती दिवस चालणार, असे संजना जान यांनी सांगितले.

जगण्याचा मोठा प्रश्न - शमिभा पाटील

वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांनी तृतीयपंथीयांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनदेखील पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनच्या काळात तृतीयपंथीयांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. या समुदायाच्या पोटापाण्यासाठीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. तृतीयपंथीयांना मदत निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच प्रत्येकाला पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, रेशन पुरवठ्यासाठी त्यांना दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका मिळाव्यात. तसेच ज्यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता नसेल, अशा तृतीयपंथीयाला रेशन दुकानदारास त्याचे आधारकार्ड हाच ओळख पुरावा ग्राह्य धरावा, कोविडग्रस्त तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वाॅर्ड उपलब्ध करून देण्यात यावा, अशा मागण्या शमिभा यांनी दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.