शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
4
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
5
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
6
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
7
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
8
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
9
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
10
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
11
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
12
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
13
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
14
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
15
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
16
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
17
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
18
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
19
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

कोरोनाची ‘ग्रामीण’मधील धडक चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 15:58 IST

लॉकडाऊन, जिल्हा बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीला हरताळ, गोदामे भरली असली तरी ती गरिबांच्या उपयोगी येणार काय?, स्थलांतरित मजुरांची घरवापसी सुरुच; प्रशासनापुढे आव्हान

मिलिंद कुलकर्णीकोरोना विषाणूची बाधा झालेल्या राज्यांमध्ये महाराष्टÑ सर्वाधिक आहे. त्यातही मुंबई आणि पुण्यातील रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या पर्वात खान्देशातील नंदुरबार आणि धुळे हे जिल्हे कोरोनापासून दूर होते. निसर्गाच्या सान्नीध्यात राहणाऱ्या आदिवासी बहुल भागात बाधा होणे अवघड आहे, असे मानले जात असताना साक्री शहरात रुग्ण आढळला. नंदुरबार शहरात तर तब्बल चार रुग्ण एकाच कुटुंबातील निष्पन्न झाले. धुळ्याच्या मध्यवर्ती भागातही बाधित रुग्ण समोर आला. मुंगसेसारख्या अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात लागण झाली. शहरी भागासोबतच ग्रामीण भागात ‘कोरोना’ने धडक दिल्याचे स्पष्ट झाले.या रुग्णांच्या बाधेचे कारण, प्रवासाची माहिती जाणून घेतली जात आहे. त्यात मुंबईहून आलेली मंडळी तसेच उत्तर महाराष्टÑातील एकमेव हॉटस्पॉट असलेल्या मालेगावशी संपर्क ही दोन कारणे समोर येत आहेत. पहिल्या २१ दिवसात लॉकडाऊनचा प्रभावी अंमल जाणवत असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे, हे आठवडाभरातील रुग्णांच्या संख्येवरुन लक्षात येते. जिल्हाबंदी नावाला आहे. लोक पायी, वाहनाने उघडपणे येत आहेत. रात्रीच्यावेळी लपून छपून गावांमध्ये प्रवेश होत आहेत. मानवीय दृष्टीकोन योग्य असला तरी आता या स्थितीत जिथे आहे, तिथे राहणे खूप आवश्यक आहे. दूरत्व राखता येणे हे खूप मोठे आव्हान राहणार आहे. लॉकडाऊनच्या दुसºया पर्वात काही उद्योग-व्यापाऱ्यांना सवलत दिली आहे. पहिले दोन दिवस तर गोंधळात गेले. कोणते उद्योग-व्यापार सुरु राहणार हेच मुळी संबंधित उद्योजक-व्यापाºयांना माहित नव्हते, तर जनतेला कळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण शिथिलतेचा अंमल सुरु झाला की, बाजारपेठांमध्ये गर्दी होणार आहे. ती टाळावी लागेल.प्रशासनापुढे आणखी दोन आव्हाने राहणार आहेत. पहिले आव्हान म्हणजे, शेतीमालाची बाजारपेठेत विक्री करताना शिस्तीचे कठोर पालन होणे. बाजार समित्या सुरु झाल्या आहेत, पुढे जाऊन कापूस खरेदी केंद्रे सुरु होतील. याठिकाणी व्यवस्थित नियोजन करुन मालाची खरेदी-विक्री व्हायला हवी. दुसरे आव्हान राहणार आहे, ते स्वस्त धान्य दुकानातील वितरण व्यवस्थेचे. मे महिन्यात केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य मिळणार असल्याची घोषणा झाली आहे. पिवळे आणि केशरी असे दोन्ही रेशनकार्ड धारकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने वेळापत्रक आखले असले तरी गर्दी टाळण्यासाठी प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता आहे. लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या लोकांना घरपोच भाजीपाला, फळे देण्याच्या नावे विक्रेत्यांच्या सुरु असलेल्या अतिरेकाला प्रतिबंध घालायला हवा. शेतकरी असल्याचे भासवून व्यापारीच मालवाहू गाड्या घेऊन कॉलनी आणि छोट्या गावांमध्ये जाऊन गर्दी गोळा करीत आहेत.हे रोखायला हवे. दुसरे पर्व कसोटी पाहत आहे, हे मात्र खरे.जगभर हाहाकार माजविणाºया कोरोनाने अखेर खान्देशात धडक दिली. जळगावात यापूर्वीच बाधा झाली असली तरी नंदुरबार व धुळे हे आदिवासी बहुल जिल्हे संसर्गापासून दूर होते. निसर्गाशी जवळीक, जीवनशैली ही त्याची कारणे आहेत.पण साक्री, मुंगसेसारख्या ठिकाणीकोरोना बाधीत रुग्ण आढळतात हा चिंतेचा विषय आहे. लॉकडाऊन करुनही १० रुग्ण आढळतात याचा अर्थ आपण संकटाच्या तोंडाशी आहोत. दुसºया पर्वात परिणाम अधिक जाणवू लागले आहेत. शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेने कमी असले तरी आता तरी कठोर पावले उचलली गेली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव