शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कोरोनाची ‘ग्रामीण’मधील धडक चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 15:58 IST

लॉकडाऊन, जिल्हा बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीला हरताळ, गोदामे भरली असली तरी ती गरिबांच्या उपयोगी येणार काय?, स्थलांतरित मजुरांची घरवापसी सुरुच; प्रशासनापुढे आव्हान

मिलिंद कुलकर्णीकोरोना विषाणूची बाधा झालेल्या राज्यांमध्ये महाराष्टÑ सर्वाधिक आहे. त्यातही मुंबई आणि पुण्यातील रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या पर्वात खान्देशातील नंदुरबार आणि धुळे हे जिल्हे कोरोनापासून दूर होते. निसर्गाच्या सान्नीध्यात राहणाऱ्या आदिवासी बहुल भागात बाधा होणे अवघड आहे, असे मानले जात असताना साक्री शहरात रुग्ण आढळला. नंदुरबार शहरात तर तब्बल चार रुग्ण एकाच कुटुंबातील निष्पन्न झाले. धुळ्याच्या मध्यवर्ती भागातही बाधित रुग्ण समोर आला. मुंगसेसारख्या अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात लागण झाली. शहरी भागासोबतच ग्रामीण भागात ‘कोरोना’ने धडक दिल्याचे स्पष्ट झाले.या रुग्णांच्या बाधेचे कारण, प्रवासाची माहिती जाणून घेतली जात आहे. त्यात मुंबईहून आलेली मंडळी तसेच उत्तर महाराष्टÑातील एकमेव हॉटस्पॉट असलेल्या मालेगावशी संपर्क ही दोन कारणे समोर येत आहेत. पहिल्या २१ दिवसात लॉकडाऊनचा प्रभावी अंमल जाणवत असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे, हे आठवडाभरातील रुग्णांच्या संख्येवरुन लक्षात येते. जिल्हाबंदी नावाला आहे. लोक पायी, वाहनाने उघडपणे येत आहेत. रात्रीच्यावेळी लपून छपून गावांमध्ये प्रवेश होत आहेत. मानवीय दृष्टीकोन योग्य असला तरी आता या स्थितीत जिथे आहे, तिथे राहणे खूप आवश्यक आहे. दूरत्व राखता येणे हे खूप मोठे आव्हान राहणार आहे. लॉकडाऊनच्या दुसºया पर्वात काही उद्योग-व्यापाऱ्यांना सवलत दिली आहे. पहिले दोन दिवस तर गोंधळात गेले. कोणते उद्योग-व्यापार सुरु राहणार हेच मुळी संबंधित उद्योजक-व्यापाºयांना माहित नव्हते, तर जनतेला कळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण शिथिलतेचा अंमल सुरु झाला की, बाजारपेठांमध्ये गर्दी होणार आहे. ती टाळावी लागेल.प्रशासनापुढे आणखी दोन आव्हाने राहणार आहेत. पहिले आव्हान म्हणजे, शेतीमालाची बाजारपेठेत विक्री करताना शिस्तीचे कठोर पालन होणे. बाजार समित्या सुरु झाल्या आहेत, पुढे जाऊन कापूस खरेदी केंद्रे सुरु होतील. याठिकाणी व्यवस्थित नियोजन करुन मालाची खरेदी-विक्री व्हायला हवी. दुसरे आव्हान राहणार आहे, ते स्वस्त धान्य दुकानातील वितरण व्यवस्थेचे. मे महिन्यात केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य मिळणार असल्याची घोषणा झाली आहे. पिवळे आणि केशरी असे दोन्ही रेशनकार्ड धारकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने वेळापत्रक आखले असले तरी गर्दी टाळण्यासाठी प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता आहे. लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या लोकांना घरपोच भाजीपाला, फळे देण्याच्या नावे विक्रेत्यांच्या सुरु असलेल्या अतिरेकाला प्रतिबंध घालायला हवा. शेतकरी असल्याचे भासवून व्यापारीच मालवाहू गाड्या घेऊन कॉलनी आणि छोट्या गावांमध्ये जाऊन गर्दी गोळा करीत आहेत.हे रोखायला हवे. दुसरे पर्व कसोटी पाहत आहे, हे मात्र खरे.जगभर हाहाकार माजविणाºया कोरोनाने अखेर खान्देशात धडक दिली. जळगावात यापूर्वीच बाधा झाली असली तरी नंदुरबार व धुळे हे आदिवासी बहुल जिल्हे संसर्गापासून दूर होते. निसर्गाशी जवळीक, जीवनशैली ही त्याची कारणे आहेत.पण साक्री, मुंगसेसारख्या ठिकाणीकोरोना बाधीत रुग्ण आढळतात हा चिंतेचा विषय आहे. लॉकडाऊन करुनही १० रुग्ण आढळतात याचा अर्थ आपण संकटाच्या तोंडाशी आहोत. दुसºया पर्वात परिणाम अधिक जाणवू लागले आहेत. शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेने कमी असले तरी आता तरी कठोर पावले उचलली गेली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव