शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुका अद्यापही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुका अद्यापही होवू शकल्या नाहीत. जानेवारीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या होत्या. या निवडणुका झाल्यानंतर शासनाने कोविडमुळे थांबलेल्या सर्व मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास हिरवी झेंडी दाखविली आहे. यासाठी प्रशासनाकडून प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा सहकारी संस्थाच्या निवडणुकांना ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील १११८ सहकारी संस्थांची मुदत संपली आहे. यामध्ये जिल्हा बँक, ग.स.सोसायटी, बाजार समित्या, जिल्हा दूध संघ, मविप्र या मोठ्या संस्थाचाही सहभाग आहे. जानेवारीनंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होवू लागल्यानंतर सहकार व पणन मंत्रालयाने सर्व थांबलेल्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा सूचना दिल्या होत्या. त्याची तयारीदेखील सुरू झाली आहे. जिल्हा बँक व दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे कामदेखील सुरू झाले आहे. मात्र, आठवडाभरातच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या संपूर्ण राज्यभरातच वाढत आहे. यामुळे शासनाकडून पुन्हा या निवडणुकांना ब्रेक लावण्यात येण्याची शक्यता आहे.

सहा टप्प्यांत घेण्यात येतील निवडणुका

सर्व निवडणुका आता मुदत संपलेल्या कार्यकाळानुसार घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ८३ सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०१९ रोजी मुदत संपलेल्या २०४ संस्थांच्या, तिसऱ्या टप्प्यात ३१ मार्च २०२० रोजी मुदत संपलेल्या ६०९ संस्थांच्या, चौथ्या टप्प्यात ३० जून २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ८० संस्थांच्या तर पाचव्या टप्प्यात ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ९० व शेवटच्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ५२ अशा एकूण १११८ सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, शासनाकडून अद्यापपर्यंत निवडणुकांबाबत कोणताही आदेश आला नसल्याने निवडणुकीची प्रक्रिया सुरूच आहे.

कोट..

कोरोना रुग्णांची संख्या जर वाढत जात असेल तर शासनाने निवडणुकांबाबत विचार करावा, निवडणुका येत-जात राहतील. मात्र, कोरोनाचे संकट पुन्हा वाढत असेल तर शासनाला हे संकट आधी थांबविणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तर निवडणुकांबाबत विचार झाला पाहिजे.

-गुलाबराव देवकर, संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक

ग. स. किंवा इतर सहकारी संस्थाच्या निवडणुकांना आधीच उशीर झाला आहे. अशा परिस्थितीत आता निवडणुकांना ब्रेक लावणे चुकीचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ग. स. निवडणूक ही आता ईव्हीएम मशीनद्वारे घेतली पाहिजे. जेणेकरून या निवडणुकीसाठी लागणारी कर्मचारीसंख्या कमी होईल.

-उदय पाटील, गटनेते, सहकार गट, ग. स. सोसायटी