शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या विखळ्यात, तरीही गावागावात लग्न झाले दणक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू होते. यंदा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या तीन ते चार महिन्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू होते. यंदा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या तीन ते चार महिन्यांच्या काळात जोरदार लग्न सोहळे झाले.

मात्र फेब्रुवारीपासून शासनाने कडक नियम लागु केले. तरीही कोरोना आणि शासनाच्या नियमांना झुगारून जिल्ह्यातील विविध गावामध्ये हजारो लग्नांचा बार उडाला.

यंदा लग्न सराई सुरू झाल्यापासून हजारो लग्न सोहळे मोठ्या प्रमाणात साजरे झाले आहेत. काही दिवसांपुर्वी जिल्हा प्रशासनाने लग्नसोहळे घरच्या घरीच साजरे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात २० जणांची उपस्थितीचा नियम लागू करण्यात आला होता. तरी देखील अनेकांनी जळगाव शहरात देखील थाटामाटात लग्न लावले. नियम मोडल्याने शहरातील एका हॉटेलवर गुन्हा दाखल झाला आहे. असे असतांनाही जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेकडो सोहळे नियम मोडून साजरे करण्यात आले आहेत. असे असले तरी काहींनी नियम शिथील होतील, या अपेक्षेवर तारखांवर तारखा

बदलल्या आहेत. अनेक जण परिस्थिती निवळेल, अशी वाट पाहत आहेत. मे महिन्यात यंदा सर्वाधिक १५ लग्नतिथी आहेत. मात्र १ मे पर्यंत संचारबंदीच लागू करण्यात आली आहे.

जानेवारीपासून १४७ नोंदणीकृत विवाह

यंदा जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत १४७ विवाह हे नोंदणीपद्धतीने करण्यात आले आहेत. तसेच २५० जोडप्यांनी विवाहाची एक महिना आधी दिली जाणारी नोटीस दिली आहे, यंदा विवाहाचे ५३ मुहुर्त १९ जानेवारीते २१ एप्रिल प्रयंत यंदा गुरु आणि शुक्र अस्तामुळे तारखा मीच आहेत. सध्या २२ एप्रिल ही विवाहाची मोठी तिथी आहे. यंदा कोरोनााने अडचण केली असली तरी नोव्हेंबर ते जुलै या काळात ५३ विवाह मुहुर्त आहेत. एप्रिलमध्ये ७ मे मध्ये १५ आणि जून महिन्यात फक्त ४ तारखाच आहेत. तसेच जुलै महिन्यात देखील चार विवाह मुहुर्त आहेत.

कोट -

यंदा अजून एकही मंगल कार्यालयाचे बुकिंग झालेले नाही. शहरात तर कुणी मंगल कार्यालयांमध्ये विचारणा करण्यासाठी देखील येत नाही. त्यामुळे व्यावसायीक अडचणीत आले आहेत. टेन्ट देखील कुणीही टाकत नाही. काही ठिकाणी मंगल कार्यालयांमध्ये तर कोविड सेंटर देखील सुरू झाले आहेत. - प्रदीप जैन,

अध्यक्ष, जिल्हा टेन्ट आणि मंगल कार्यालय असोसिएशन