शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच सुरू होईल कोरोनाचा उतरता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:15 IST

कोट : जळगाव शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने, इतर सर्व तालुक्यांचा थेट संबंध जळगावसोबत असतो. त्यामुळे तेथे नागरिकांची ये-जा ...

कोट : जळगाव शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने, इतर सर्व तालुक्यांचा थेट संबंध जळगावसोबत असतो. त्यामुळे तेथे नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे जिल्ह्याच्या तुलनेत शहरात जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहे. हे प्रमाण २० ते २५ टक्के एवढे आहे. मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यात हेच प्रमाण ४० टक्के एवढे आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या ही स्थिर असली, तरी लवकरच ही संख्या कमी व्हायला सुरुवात होईल.

- सतीश कुलकर्णी, आयुक्त, जळगाव शहर महापालिका

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. हे प्रमाण स्थिर झाले आहे. मात्र, आता शहरात १५ दिवसांची संचार बंदी पाळली जाणे आणि अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यात शहरातील मुख्य भाजी बाजाराचे विकेंद्रीकरण केले जात असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ.सतीश कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

प्रश्न : जिल्ह्यातील इतर कोणत्याही तालुक्याच्या तुलनेत शहरात जास्त रुग्ण आढळतात. त्यावर काय सांगाल?

आयुक्त कुलकर्णी : कोविड सुरू झाल्यापासून एक बाब समोर आली आहे. जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येच्या सामान्यत: २० ते २५ टक्के रुग्ण हे जळगाव शहरात आढळून येतात. जिल्ह्याच्या ठिकाणाशी सर्वांचा असणारा संपर्काने हे होते. काही दिवसांपूर्वी जेव्हा जिल्ह्यात १,२००च्या जवळपास रुग्ण येत होते. तेव्हा जळगाव शहरात ३००च्या आसपास रुग्णसंख्या होती. मात्र, हा चढता आलेख आता संपला आहे. आता रुग्णसंख्या स्थिर झाली आहे. लवकरच ती कमी होईल.

प्रश्न : संचारबंदीचे पालन व्हावे आणि गर्दी होऊ नये, यासाठी महापालिकेतर्फे कोणत्या उपाययोजना केल्या आहेत.

आयुक्त सतीश कुलकर्णी : राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी कमी व्हावी, यासाठी शहरातील मुख्य भाजी बाजार सुभाष चौक ते घाणेकर चौक, भिलपुरा पोलीस चौकी या भागातील विक्रेत्यांना शहरातील इतर भागात हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्य बाजारात एकत्र होणारी गर्दी टळेल आणि नागरिकांनाही घराच्या जवळच भाजी व इतर वस्तू मिळतील. अतिक्रमण विरोधी पथकात उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासोबत आता सहा पथके स्थापन करण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील सहा अभियंत्यांचा समावेश करण्यात आला आहे. पथकासोबतच पोलीस कर्मचारीही असतील.

प्रश्न : मनपाच्या टेस्टिंग सेंटरवर केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल उशिराने येतात, अशी वारंवार तक्रार केली जाते?

आयुक्त सतीश कुलकर्णी : मनपाकडे फक्त सॅम्पल घेतले जातात. त्याची तपासणी ही जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये होते. तेथे क्षमतेपेक्षा जास्त सॅम्पल आले की, ते खासगी लॅबकडेही पाठ‌विले जातात. काही वेळा त्यात उशीर होऊ शकतो. सध्या रात्री विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी केली जात आहे. त्यासोबतच शहरातील जे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. तेथेही नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. हायरिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्टच्या चाचण्यांवरही भर दिला आहे. मनपाकडे पुरेसे अँटिजन किट आहेत. हे काम १० नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून होत आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या चाचण्या करणे बंधनकारक आहे. त्यासाठी डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची भरतीही केली जात आहे.

प्रश्न : सध्या संचारबंदी आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व कामे कशा पद्धतीने केली जात आहेत?

आयुक्त सतीश कुलकर्णी : मान्सूनपूर्व कामे करण्यास शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे शहरात भुयारी गटारे, अमृत योजना, रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पाइपलाइनची काही कामे सुरू आहेत, तसेच सोमवारपासून नालेसफाईलाही सुरुवात होणार आहे.