शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

कोरोनावर नियंत्रण, आता लसीकरण व म्युकरमायकोसिसचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहेत. गेल्यावर्षी ज्याप्रमाणे कोरोनावर नियंत्रण ...

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहेत. गेल्यावर्षी ज्याप्रमाणे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला यश आले आतादेखील कोरोनाच्या संकटावर मात करण्यामध्ये यश आले आहे. कोरोना पूर्णपणे गेला असे नाही, मात्र दररोजची रुग्णसंख्या १५ ते २० टक्क्यांवर येण्यासह मृत्यूचे प्रमाण व बाधित रुग्णांची संख्यादेखील घटली आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांचे हे फळ म्हणावे लागेल; मात्र आता प्रशासनापुढे पुन्हा दुसरे संकट म्युकरमायकोसिसच्या रुपाने उभे राहिले आहे. या सोबतच लसीचा तुटवडा हा मुद्दादेखील महत्त्वाचा ठरत असून येणाऱ्या लसींमध्ये प्रशासनाला नियोजन करावे लागत आहे.

एप्रिल महिन्यात एका दिवसात १२००च्या पुढे कोरोनाची रुग्णसंख्या गेली व जिल्ह्यात पुन्हा एकदा संकट उभे राहिले. या काळात बेड उपलब्ध न होणे, ऑक्सिजन न मिळणे, व्हेंटिलेटरचा तुटवडा, रेमडेसिविरसाठी पळापळ यामुळे जिल्हावासीयांची चांगलीच दमछाक झाली. यामध्ये प्रशासनाला ऑक्सिजन असो की रेमडेसिविरसाठी नियोजन करीत ते प्रशासनाच्या नियंत्रणाखालीच वितरित केले जाऊ लागले. हे सर्व करीत असताना गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लावण्यात आले; मात्र यात गर्दी पाहिजे त्या प्रमाणात कमी झाली नाही. त्यामुळे मे महिन्याच्या मध्यापासून निर्बंध अधिक कडक करण्यात आले. यात कारवाईदेखील वाढली व नागरिक बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले. या सर्व उपाययोजनांचे परिणाम समोर येऊन आता दररोजची रुग्णसंख्या २०० खाली आली आहे. कोरोनावर तर नियंत्रण मिळविले, मात्र त्या पाठोपाठ आता म्युकरमायकोसिसने डोके वर काढल्याने त्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये या आजारावर आवश्यक असलेल्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने त्याची माहिती प्रशासनाला देण्याचे निर्देश देण्यात आले व त्याच्या पुरवठ्यासाठीही सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू असून या रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे हे आव्हान असताना जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस येत नसल्याने त्यासाठीही कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा सलग दोन-दोन दिवस लसीकरण बंद राहते. लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य शासनाने फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले; मात्र ४५ वर्षांवरील नागरिकांना देखील पुरणार नाही इतके कमी डोस जिल्ह्याला मिळतात. लसीचा तुटवडा असाच राहिला तर पूर्ण लसीकरण कधी होणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला. आता हळूहळू लसीकरणात सातत्य येत असले तरी भविष्यात ते कायम रहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.