शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईहून परतलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी अनावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:28 IST

गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून जळगावसह राज्यातील विविध आगारातील चालक-वाहक एक आठवडा सेवा बजाविण्यासाठी मुंबई येथे जात आहेत. मुंबईतून ...

गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून जळगावसह राज्यातील विविध आगारातील चालक-वाहक एक आठवडा सेवा बजाविण्यासाठी मुंबई येथे जात आहेत. मुंबईतून आल्यानंतर या कर्मचाऱ्यांची जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करुन, अहवाल येईपर्यंत तीन दिवस कामावर न बोलावता गृहविलगीकरणात राहण्याच्या सुचना करण्यात येत आहेत. मात्र, पुणे येथे गेल्या आठवड्यात २९ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी बेस्ट सेवेसाठी मुंबई, वरळी येथे गेलेल्या चालक - वाहकांना मुंबईहून परतल्यानंतर कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यक नसल्याच्या सुचना केल्या आहेत. त्या सुचनांच्या आधारे राजेंद्र देवरे यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांना पत्र पाठवून, मुंबईतून परतलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी न करता, त्या कर्मचाऱ्यांवर नियोजित कामगिरी सोपविण्याच्या सुचना केल्या आहेत.

इन्फो :

सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा संताप

विभाग नियंत्रकांनी आगार व्यवस्थापकांना पाठविलेले पत्र सोशल मीडियावर शुक्रवारी चांगलेच व्हायरल झाले. जिल्ह्यातील विविध आगारातील चालक-वाहकांनी कामगार संघटनांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर या पत्रावर तीव्र नाराजी अन् संताप व्यक्त करतांना दिसून आले. जर मुंबईहून परतल्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होत नसेल, तर महामंडळ कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

दरम्यान, या पत्राबाबत विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्यांशी ` लोकमत` प्रतिनिधीने दुरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.