शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

मुंबईहून परतलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी अनावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:28 IST

गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून जळगावसह राज्यातील विविध आगारातील चालक-वाहक एक आठवडा सेवा बजाविण्यासाठी मुंबई येथे जात आहेत. मुंबईतून ...

गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून जळगावसह राज्यातील विविध आगारातील चालक-वाहक एक आठवडा सेवा बजाविण्यासाठी मुंबई येथे जात आहेत. मुंबईतून आल्यानंतर या कर्मचाऱ्यांची जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करुन, अहवाल येईपर्यंत तीन दिवस कामावर न बोलावता गृहविलगीकरणात राहण्याच्या सुचना करण्यात येत आहेत. मात्र, पुणे येथे गेल्या आठवड्यात २९ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी बेस्ट सेवेसाठी मुंबई, वरळी येथे गेलेल्या चालक - वाहकांना मुंबईहून परतल्यानंतर कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यक नसल्याच्या सुचना केल्या आहेत. त्या सुचनांच्या आधारे राजेंद्र देवरे यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांना पत्र पाठवून, मुंबईतून परतलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी न करता, त्या कर्मचाऱ्यांवर नियोजित कामगिरी सोपविण्याच्या सुचना केल्या आहेत.

इन्फो :

सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा संताप

विभाग नियंत्रकांनी आगार व्यवस्थापकांना पाठविलेले पत्र सोशल मीडियावर शुक्रवारी चांगलेच व्हायरल झाले. जिल्ह्यातील विविध आगारातील चालक-वाहकांनी कामगार संघटनांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर या पत्रावर तीव्र नाराजी अन् संताप व्यक्त करतांना दिसून आले. जर मुंबईहून परतल्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होत नसेल, तर महामंडळ कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

दरम्यान, या पत्राबाबत विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्यांशी ` लोकमत` प्रतिनिधीने दुरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.