शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

कोरोनामुळे शालेय शुल्कात मुभा द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे अनेक कुटूंब आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. काही ठिकाणी शालेय प्रशासन शुल्कासाठी तगादा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे अनेक कुटूंब आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. काही ठिकाणी शालेय प्रशासन शुल्कासाठी तगादा लावत आहे. अनेक पालक पाल्याचे शुल्क भरू शकत नाही. यामुळे शालेय शुल्कात सद्यस्थितीला मुभा देण्‍यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने करण्‍यात आली आहे.

राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्रात संचारबंदी लावण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांनी जनतेला संबोधित करत असताना अनेक विषय समोर ठेवले आहेत. परंतु शिक्षण क्षेत्राबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या नाहीत. यावरूनच राज्य शासनाचे शिक्षण क्षेत्रातकडे दुर्लक्ष करीत आहे हे लक्षात येते, असा आरोप निवेदनातून अभाविपने केला आहे. तसेच राज्यातील विद्यार्थी व पालकांच्या मानसिकतेचा विचार करता सद्यस्थितीत राज्य शासनाने विद्यार्थी व पालक यांना दिलासा मिळवून द्यावा अशीही मागणी अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी केली आहे.

अशा आहेत मागण्या

- सद्यस्थितीत अनेक कुटुंब आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. काही ठिकाणी शालेय प्रशासन शुल्कासाठी तगादा लावत आहे. अनेक पालक आपल्या पाल्याचे शालेय शुल्क भरू शकत नाही. यामुळे शालेय शुल्कात सद्यस्थितीला मुभा देण्यात यावी.

- १० वी तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरावर निशुल्क समुपदेशन केंद्र सुरु करावेत.

- कोविड संक्रमित विद्यार्थ्यांना कोविड उपचार किट उपलब्ध करून द्यावी.

- व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना जागेवरील प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेतल्यामुळे शिष्यवृत्ती लाभ न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरी हा निर्णय तात्काळ रद्द करून विद्यार्थ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच अन्य प्रलंबित शिष्यवृत्ती देखील लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरात लवकर वर्ग करावी.

- शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दोन्ही सत्रांचा संपूर्ण अभ्यासक्रम हा ऑनलाइन पध्दतीने शिकवला गेला. या काळात प्रयोगशाळा शुल्क, वाहनतळ शुल्क, सांस्कृतिक कार्यक्रम शुल्क, विविध विद्यापीठ स्तरीय शुल्क, विविध स्पर्धा शुल्क, क्रीडा साहित्य शुल्क इत्यादी सुविधांचा विद्यार्थ्यांनी वापर केलेला नाही. त्यामुळे एकूण प्रवेश शुल्काच्या ३० टक्के प्रवेश शुल्क माफ करावे.