शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे विमान सेवेची प्रवासी संख्या ८० टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST

अल्प प्रतिसाद : कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतरच मुंबईची विमान सेवा नियमित होणार जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विमान सेवेच्या ...

अल्प प्रतिसाद : कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतरच मुंबईची विमान सेवा नियमित होणार

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विमान सेवेच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला असून, तब्बल ८० प्रवासी संख्या घटली असल्याची माहिती विमान कंपनीतर्फे देण्यात आली, तसेच कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाल्यानंतरच मुंबईची विमानसेवा नियमित होणार असल्याचेही सांगण्यात आले.

सध्या कोरोनाच्या काळातही जळगाव विमान तळावरून आठवड्यातील चार दिवस वेळापत्रकानुसार विमानसेवा सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार आठवड्यातील चारच दिवस ही सेवा ठेवण्यात आली आहे. यात मुंबईची विमानसेवा दर बुधवारी व रविवारी सुरू आहे. मात्र, या सेवेला कोरोनामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. ७२ आसनी क्षमता असलेल्या या विमानात सध्या १० ते १२ प्रवासी मिळत आहेत. त्यामुळे विमान कंपनीला गेल्या दीड ते दोन महिन्यांच्या काळात एक कोटीहून अधिक आर्थिक नुकसानीचा फटका बसला असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, कोरोनामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असला तरी, केंद्राच्या उडान योजनेअंतर्गत जळगावची विमान सेवा असल्यामुळे ही सेवा नियमित सुरू राहणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

...तर होणार मुंबईची सेवा नियमित

मुंबई विमान सेवेच्या आठवड्यातून दोनच फेऱ्या होत असल्याबाबत विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनामुळे राज्य शासनाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणांना बंदी घातली आहे. त्यामध्ये जळगावला विमानसेवा देणाऱ्या कंपनीचाही समावेश आहे, तर जेव्हा राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होईल तेव्हाच मुंबईची विमानसेवा नियमित होणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.