शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

कोरोना सुरु होताच गाव गाठले, कामासाठी आता मुंबई, पुण्यात पोहचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

जळगाव : कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर, गावाकडे परतलेले नागरिक आता पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतू लागले आहेत. शासनाने अनलॉक ...

जळगाव : कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर, गावाकडे परतलेले नागरिक आता पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतू लागले आहेत. शासनाने अनलॉक केल्यामुळे परप्रांतातून येणाऱ्या बांधवांसह स्थानिक नागरिकही आपल्या कुटुंबासह रोजगारासाठी मुंबई, पुणे, गुजरात, मध्यप्रदेश या भागामध्ये परत येऊ लागले आहेत. विशेष: विदेशात नोकरीसाठी वास्तव्य करणारे नागरिकही आता परतू लागले आहेत. यामध्ये मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे.

शासनाने गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लागू केला होती. अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवले होते. यामुळे मुंबई, पुण्यासह परप्रांतात काम करणारे अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह गावाकडे परतले होते. मात्र,महाराष्ट्रातील सर्व ठिकाणची कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर, पर प्रांतीय बांधव मोठ्या संख्येने महाराष्ट्रात येत असतांना, दुसरीकडे स्थानिक नागरिक आपल्या कुटुंबासह पुन्हा मुंबई, पुणे व परराज्यात कामासाठी परत येत आहेत. यामुळे मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेनंतर हजारो बांधव मुंबई-पुण्याकडे गेले असल्याचे संबंधित विभागांतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

परदेशात ५० हून अधिक नागरिक गेेले

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परदेशात नोकरीला असणारे अनेक नागरिकही मायदेशी परतले होते. मात्र, विदेशातही कोरोनाचे रूग्ण कमी झाल्यानंतर अमेरिका, इटली, ब्रिटन या ठिकाणी पुन्हा नागरिक रवाना होत आहेत. जळगावात पासपोर्ट कार्यालय झाल्यामुळे, पासपोर्ट नवीन काढणे व नुतनी करणासाठी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत. त्यावरून सध्या ५० पेक्षा अधिक जण हे विदेशात गेले असल्याचे पासपोर्टच्या सुत्रांनी सांगितले.

इन्फो :

पर राज्यातही गेले २० हजार बांधव

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भितीने सुरत, अहमदाबाद, बडोदा, बंगळुरू, खंडवा, बऱ्हानपूर या ठिकाणाहूनही हजारो नागरिक गावाकडे परतले होते. मात्र, गेल्या महिन्यापासून कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर, गावी आलेले हे बांधव पुन्हा आपआपल्या कामाच्या ठिकाणी परतू लागले आहे. विशेष म्हणजे गुजरात व मध्यप्रदेशात जाणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक तिकीट बुकींगही जळगाव व भुसावळहून झाल्यामुळे, गेल्या महिनाभरात २० हजाराहून अधिक बांधव पर राज्यात रवाना झाले आहेत.

इन्फो :

सर्वाधिक स्थलांतर मुंबईकडे

कोरोनामुळे गेल्या वर्षी आणि यंदा दुसऱ्या लाटेच्या भितीनेदेखील मुंबई-पुण्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास असणारे अनेक नागरिक गावाकडे परतले होते. दुसरी लाट संपल्यानंतर हे नागरिक पुन्हा आपल्या कुटुंबासह पुणे व मुंबईकडे परतू लागले आहेत. रेल्वे सुत्रांनी व खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी त्यांच्याकडे महिनाभरात झालेल्या तिकीट बुकींग नुसार ४० हजाराहून अधिक नागरिक मुंबई व पुण्याकडे रोजगारासाठी पुन्हा परतले आहेत.

इन्फो :

मुले परदेशात, चिंता भारतात..

आधीच मुले नोकरीनिमित्त परदेशात असल्यामुळे, ती चिंता लागूनच असते. त्यात आता कोरोना सारखे आजार आल्यामुळे, खुपच चिंता वाटते. मुले भारतात राहिल्यावर तात्काळ भेटण्यासाठी निघता येते. विदेशात राहत असल्याचे म्हटल्यावर लगेच पोहचण्यासारखे नसते. त्यामुळे माझा मुलगा अमेरिकेत असल्यामुळे, त्यांची सतत काळजी वाटत असते.

चंद्रकला महाले