शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:19 IST

मागील वर्षभरात कौटुंबिक छळाच्या ९९२ तक्रारी दाखल झालेल्या असल्या तरी त्यातील फक्त २८ प्रकरणात तडजोड झालेली आहे. ५७ प्रकरणांमध्ये ...

मागील वर्षभरात कौटुंबिक छळाच्या ९९२ तक्रारी दाखल झालेल्या असल्या तरी त्यातील फक्त २८ प्रकरणात तडजोड झालेली आहे. ५७ प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. २५ प्रकरणांमध्ये पती-पत्नींनी न्यायालयात धाव घेतली आहे तर ६९ प्रकरणात तक्रारी करूनही संबंधित व्यक्ती न्यायासाठी आल्याच नाहीत. ६५९ प्रकरणे प्रलंबित असून त्यावर सध्या तडजोडीचे काम सुरू आहे. २०१९ मध्ये ११९९ प्रकरणे या विभागाकडे आली होती तर त्यातील २०४ प्रकरणांमध्ये तडजोड झाली होती. २८२ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले होते तर १९९ प्रकरणे न्यायालयात गेलेली आहेत. ४६४ तक्रारदार अर्ज करूनही या विभागात न्याय मागण्यासाठी आले नाहीत तर ५० प्रकरणे प्रलंबित होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले या विभागाचे प्रमुख असून सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील, सविता परदेशी, मनीषा पाटील, वैशाली पाटील, अभिलाषा मनोरे, संगीता पवार आदी जण कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात तडजोड घडवून आणण्याचे कार्य करतात. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच हा कक्ष उघडण्यात आलेला आहे.

१) पॉईंटर्स

२०१९ मध्ये नोंदविलेली प्रकरणे -११९९

२०२० मध्ये नोंदविलेली प्रकरणे -९९२

जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये नोंदविलेली प्रकरणे -१४७

(बॉक्स)

नोकरी गेली, माहेरातून पैसे आण म्हणून...

घर घ्यायचे आहे, वाहन घ्यायचे आहे त्याशिवाय नोकरी नसल्याने घेतलेले कर्ज फेडायचे आहे आदी कारणांसाठी विवाहितांना माहेरुन पैसे आणायला लावल्याचे प्रकरणे जास्त आहेत. उद्योग उभारणीसाठी देखील पैसे आणावेत म्हणून विवाहितांचा छळ होत असल्याचे प्रकरणे या काळात समोर आलेली आहेत. अशा प्रकरणांचे थेट पोलिसात ४९८ कलमान्वये गुन्हे दाखल झालेले आहेत.

(बॉक्स)

२३२ प्रकरणांत मध्यस्थी

२०१९ मध्ये २०४ तर २०२० मध्ये २८ अशी २३२ प्रकरणांमध्ये मध्यस्थी करण्यात यंत्रणेला यश आले आहे. त्यातही ६५९ अर्ज चौकशीवर ठेवण्यात आले आहेत. २२४ प्रकरणांमध्ये पती-पत्नी न्यायालयात दाद मागण्यासाठी गेले आहेत तर दोन वर्षात ३३९ प्रकरणात तडजोड न झाल्याने पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. कोरोनाच्या काळात तक्रारीच कमी आलेल्या आहेत त्यामुळे तडजोडीचा आकडाही कमी आहे.