शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे जळगाव जिल्ह्यात कोविड रुग्णांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे जळगाव जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होत असली तरी गंभीर रुग्णांची संख्या कायम आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. दुसरीकडे आता अनलॉकची प्रक्रिया सुरू करून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनलॉकमध्ये केलेल्या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ ठरणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांसह मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत होते. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत मुलांना घराबाहेर सोडू नका, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे. सद्यस्थितीला जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. मृत्यूचे प्रमाणही आटोक्यात आले असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. हे प्रमाण पाहता प्रशासनाकडून काही कडक निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, जर पुन्हा मागीलप्रमाणे चुका केल्यास तिसरी लाट येण्याची शक्यता अटळ आहे. त्यामुळे शासनाने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण नियमांचे पालक करणे गरजेचे आहे. तर वृध्दांसह बालकांचीसुध्दा काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग ठेवणे व मास्क लावणे आदी नियम नागरिकांनी गांभीर्याने पाळणे अतिआवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

=====

या चुका करू नका...!

- कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मास्क आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आता तर डबल मास्क वापरण्याच्या सूचना आहेत; मात्र अनेक जण मास्कचा वापर हनुवटीवरच करताना दिसतात.

- मंगल कार्यालये बंद आहेत. मात्र घरगुती स्वरूपात होणाऱ्या लग्नसोहळ्यातील गर्दी तसेच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी बाहेर फिरून वाटलेला कोरोनाचा ‘प्रसाद’.

- निर्बंध शिथिल केल्यानंतर बेफिकीर झालेल्या नागरिकांनी वाहतूक कोंडी होईपर्यंत बाजारात प्रचंड गर्दी केली. या गर्दीतून अनेकांनी कोरोनाला घरी नेला असण्याची शक्यता आहे.

- राजकीय कार्यक्रम, बैठकांमधील गर्दीमुळेही कोरोनाचा आलेख उंचावल्याचे दिसून आले.

- पहिल्या लाटेत नागरिकांनी वैयक्तिक व कुटुंबाची काळजी घेतली, लक्षणे दिसताच चाचण्या केल्या. दुसऱ्या लाटेत मात्र वैयक्तिक काळजीचा भर ओसरलेला दिसून आला. त्यामुळेच लक्षणे असूनही घरीच उपचार केल्याने रुग्ण गंभीर झाल्यावर रुग्णालयात दाखल केल्यानेच मृत्युदर वाढलेला दिसला.

- विनाकारण नागरिक फिरताना आढळून आले. पोलीस व आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना चाचणी केल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या काही नागरिकांनासुध्दा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

- आठवडी बाजारांना बंदी असताना बाजार भरविले गेले. त्यात नागरिकांनी मास्कचा वापर न केल्यामुळे कोरोना घरी नेला.

=========

= पालिकेचे सहा पथके

- निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन होते का, याकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेने सहा पथकांची नियुक्ती केली आहे.

- मनपाने गठित केलेल्या या प्रत्येक पथकामध्ये सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

- मास्क न लावणे, गर्दी करणाऱ्यांवर पथकांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

- दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिकांची गर्दी तसेच वेळ संपूनही दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकानधारकांवर दररोज या पथकांकडून कारवाई केली जात आहे. आठवडी बाजारांना परवानगी नसताना, बाजार भरविणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच गर्दी न करण्याचे आवाहनही या पथकांकडून होत आहे.

==========

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत आहे की नाही, यासाठी सहा पथके नेमण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पथकाडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी आता स्वयंशिस्तीने काळजी घ्यावी व कुणाला कोरोनाची लागण होणार नाही याचीही काळजी घ्यावी.

- संतोष वाहुळे, उपायुक्त, मनपा

==========

एकूण बाधित : १,४०,१४२

एकूण बरे झालेले रुग्ण : १,३२,४४९

एकूण मृत्यू : २,५३५

एकूण उपचार घेत असलेले रुग्ण : ५,१५८