शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कोरोनाने दिला सर्वांना बचतीचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:30 IST

कोरोनाने भल्याभल्या लोकांचा उद्योगधंदा, नोकरी यावर गदा आणली. त्यावर पुढचा मार्ग निघेपर्यंत बचतीवर गुजराण करण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. काहींना ...

कोरोनाने भल्याभल्या लोकांचा उद्योगधंदा, नोकरी यावर गदा आणली. त्यावर पुढचा मार्ग निघेपर्यंत बचतीवर गुजराण करण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. काहींना अक्षरशः लोकांकडे हात पसरवावे लागले. ज्यांनी हे अनुभवले त्यांना बचतीचे महत्व कधी नव्हे इतके प्रकर्षाने परिस्थितीने शिकवले.

पण आताच्या तरुण पिढीपैकी काही लोक यापरिस्थितीत सुद्धा जाणीवपूर्वक वागतांना दिसत नाहीत, तेव्हा वाईट वाटते. दिखावू गोष्टींवरच अधिक खर्च होतांना दिसतो. त्याची खरेच गरज आहे का? याचा विचार करायलाच हवा. समाजात आपल्या अवतीभवती अनेक आदर्श लोक असतात. ते काय करतात, कसे राहतात, हे फक्त पाहून सुद्धा ब-याच गोष्टी शिकता येतात. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी आणि जाणीव जागी ठेवली पाहिजे. कारण के तर, कोरोनाचे संकट जसे आता ओढवले, तसे कोणते संकट कधी येईल सांगता येत नाही.

कपडे, मोबाईल आणि वाहन यावर बराच खर्च होतो असे दिसते. साधी राहणी हवी हे आपण स्वतःच्या उदाहरणातून सांगणे केव्हाही अधिक परिणाम कारक असते. मी गांधीजींना पहिले नाही, फक्त वाचले आहे. पण बाबा आमटेंना, प्रकाश आमटे, विकास आमटे, प्रा. राम शेवाळकर, मारुती चितमपल्ली यांना मी अनेकदा भेटलो आहे. मुलांनाही त्यांना भेटायला घेऊन गेलो. बोललो काहीच नाही. पण लहानपणापासून अशाच लोकांना भेटायला म्हणून मुद्दाम घेऊन जात असे. याचा व्हायचा तो परिणाम होतोच. तेव्हा मुलांना दोष देण्याऐवजी त्यांची दृष्टी बदलेल, स्वत:ची राहणी बोलेल, हे पाहणे हे पालकांचेही कर्त्यव्य आहे.

कष्टांना पर्याय कुठेच नाही. तेव्हा कमावलेले पैसे विचारपूर्वक गुंतवावे. त्यापासून कमाई सुरु राहील. अशा बचतीतून केलेल्या गुंतवणुकीतून आलेले उत्पन्न स्वत:साठी जरूर खर्च करा. मुलांसाठी फार बचत करून ठेवू नका. त्यांना उद्योगधंदे उभे करून काम करण्याची सवय लावा. नोक-या सगळ्यांना मिळतीलच असे नाही. अनेकदा खूप शिक्षण घेऊनही बरेच लोक आता परदेशातून स्वदेशात तर शहरांकडून लहान गावात परतू लागले आहेत. शहरी चमकदमक दिखावू व आपल्या कामाची नसते याची जाणीव जागी होऊ लागली आहे. त्याकडे विचारपूर्वक पहिले पाहिजे.

कोरोनाच्या काळात ज्यांनी बचतीचे महत्व जाणले आणि अंमलात आणले ते सुज्ञ ठरले. यावरून आपण सगळ्यांनीच धडा घेणे गरजेचे आहे.

सीए अनिलकुमार शाह