शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

कोरोनाने दिला सर्वांना बचतीचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:30 IST

कोरोनाने भल्याभल्या लोकांचा उद्योगधंदा, नोकरी यावर गदा आणली. त्यावर पुढचा मार्ग निघेपर्यंत बचतीवर गुजराण करण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. काहींना ...

कोरोनाने भल्याभल्या लोकांचा उद्योगधंदा, नोकरी यावर गदा आणली. त्यावर पुढचा मार्ग निघेपर्यंत बचतीवर गुजराण करण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. काहींना अक्षरशः लोकांकडे हात पसरवावे लागले. ज्यांनी हे अनुभवले त्यांना बचतीचे महत्व कधी नव्हे इतके प्रकर्षाने परिस्थितीने शिकवले.

पण आताच्या तरुण पिढीपैकी काही लोक यापरिस्थितीत सुद्धा जाणीवपूर्वक वागतांना दिसत नाहीत, तेव्हा वाईट वाटते. दिखावू गोष्टींवरच अधिक खर्च होतांना दिसतो. त्याची खरेच गरज आहे का? याचा विचार करायलाच हवा. समाजात आपल्या अवतीभवती अनेक आदर्श लोक असतात. ते काय करतात, कसे राहतात, हे फक्त पाहून सुद्धा ब-याच गोष्टी शिकता येतात. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी आणि जाणीव जागी ठेवली पाहिजे. कारण के तर, कोरोनाचे संकट जसे आता ओढवले, तसे कोणते संकट कधी येईल सांगता येत नाही.

कपडे, मोबाईल आणि वाहन यावर बराच खर्च होतो असे दिसते. साधी राहणी हवी हे आपण स्वतःच्या उदाहरणातून सांगणे केव्हाही अधिक परिणाम कारक असते. मी गांधीजींना पहिले नाही, फक्त वाचले आहे. पण बाबा आमटेंना, प्रकाश आमटे, विकास आमटे, प्रा. राम शेवाळकर, मारुती चितमपल्ली यांना मी अनेकदा भेटलो आहे. मुलांनाही त्यांना भेटायला घेऊन गेलो. बोललो काहीच नाही. पण लहानपणापासून अशाच लोकांना भेटायला म्हणून मुद्दाम घेऊन जात असे. याचा व्हायचा तो परिणाम होतोच. तेव्हा मुलांना दोष देण्याऐवजी त्यांची दृष्टी बदलेल, स्वत:ची राहणी बोलेल, हे पाहणे हे पालकांचेही कर्त्यव्य आहे.

कष्टांना पर्याय कुठेच नाही. तेव्हा कमावलेले पैसे विचारपूर्वक गुंतवावे. त्यापासून कमाई सुरु राहील. अशा बचतीतून केलेल्या गुंतवणुकीतून आलेले उत्पन्न स्वत:साठी जरूर खर्च करा. मुलांसाठी फार बचत करून ठेवू नका. त्यांना उद्योगधंदे उभे करून काम करण्याची सवय लावा. नोक-या सगळ्यांना मिळतीलच असे नाही. अनेकदा खूप शिक्षण घेऊनही बरेच लोक आता परदेशातून स्वदेशात तर शहरांकडून लहान गावात परतू लागले आहेत. शहरी चमकदमक दिखावू व आपल्या कामाची नसते याची जाणीव जागी होऊ लागली आहे. त्याकडे विचारपूर्वक पहिले पाहिजे.

कोरोनाच्या काळात ज्यांनी बचतीचे महत्व जाणले आणि अंमलात आणले ते सुज्ञ ठरले. यावरून आपण सगळ्यांनीच धडा घेणे गरजेचे आहे.

सीए अनिलकुमार शाह