शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

कोरोनाने घरातील कर्ती व्यक्ती हिरावली, शासकीय मदतीची उरली केवळ आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST

स्टार ९५६ विजयकुमार सैतवाल जळगाव : कोरोनाकाळात पहिल्या फळीतील विभाग असलेल्या महसूल विभागात कोतवाल म्हणून काम करीत असलेले बाळू ...

स्टार ९५६

विजयकुमार सैतवाल

जळगाव : कोरोनाकाळात पहिल्या फळीतील विभाग असलेल्या महसूल विभागात कोतवाल म्हणून काम करीत असलेले बाळू सुखदेव चिखलकर (कोळी) ही घरातील कर्ती व्यक्ती. कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली आणि काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाला मदत मिळावी म्हणून प्रस्ताव सादर केला खरा. मात्र, अजूनही मदत त्यांच्या वारसांना मिळालेली नाही. कोळी यांच्यासह अशी अनेक उदाहरणे असून, कोरोनामुळे मयत झालेल्यांचे वारस आज शासकीय कार्यालयांच्या चकरा मारत आहेत. शासकीय मदत तसेच आरोग्य विमा यांच्या रकमेसाठी फिराफिर करावी लागत असल्याचे अनेकांनी सांगितले.

मदत न मिळण्याची कारणे

१) कोरोनाकाळात सेवा बजावत असताना शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत त्याच्या वारसाला ५० लाखांची मदत देण्याची घोषणा झाली. मात्र, यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ती केली तरी फाइल वेगवेगळ्या विभागांत अनेक दिवस पडून राहत आहे.

२) आरोग्य विमा काढलेला असल्यास त्यात रेमडेसिविर इंजेक्शनची रक्कम देण्यास नकार दिला जातो, तसेच डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचारावेळी वापरलेले साहित्य हॅण्डग्लोव्हज, मास्क, पीपीई किट यांची रक्कम रुग्णांच्या बिलात लावली जाते. मात्र, या डिस्पोजेबल घटकांची रक्कम आरोग्य विम्यात मिळत नाही.

ही घ्या उदाहरणे...

१) मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे कोतवाल म्हणून असलेले बाळू सुखदेव चिखलकर (कोळी) यांचा कोरोनामुळे १८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. मात्र, कुटुबीयांना अजूनही मदत मिळाली नाही.

२) भुसा‌वळ नगरपालिकेतील चार कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नसल्याची माहिती न.पा. वर्कस युनियनचे अध्यक्ष राजू खरारे यांनी दिली.

३) वरणगाव न.पा.चे कर्मचारी सुरेश केशव शेळके यांचादेखील कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या वारसांनी प्रस्ताव सादर केला. मात्र, अजूनही वारसांना मदत मिळालेली नाही.

वेगवेगळ्या ठिकाणी चकरा

प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यात काही त्रुटी काढल्या जात आहेत. त्यांची पूर्तता केली तरी फाइल पुढे सरकत नसल्याने नगरपालिका, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वारसांना चकरा माराव्या लागत आहेत. यात सुरेश शेळके यांचा मुलगा दीपक शेळके हे स्वत: पुणे येथे जाऊन आले व त्यांनी मदतीसाठी पाठपुरावा केला. तरीदेखील मदत मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

अनुकंपावर नोकरी द्या

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचा वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणीही होत आहे.