शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कोरोनाने घरातील कर्ती व्यक्ती हिरावली, शासकीय मदतीची उरली केवळ आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST

स्टार ९५६ विजयकुमार सैतवाल जळगाव : कोरोनाकाळात पहिल्या फळीतील विभाग असलेल्या महसूल विभागात कोतवाल म्हणून काम करीत असलेले बाळू ...

स्टार ९५६

विजयकुमार सैतवाल

जळगाव : कोरोनाकाळात पहिल्या फळीतील विभाग असलेल्या महसूल विभागात कोतवाल म्हणून काम करीत असलेले बाळू सुखदेव चिखलकर (कोळी) ही घरातील कर्ती व्यक्ती. कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली आणि काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाला मदत मिळावी म्हणून प्रस्ताव सादर केला खरा. मात्र, अजूनही मदत त्यांच्या वारसांना मिळालेली नाही. कोळी यांच्यासह अशी अनेक उदाहरणे असून, कोरोनामुळे मयत झालेल्यांचे वारस आज शासकीय कार्यालयांच्या चकरा मारत आहेत. शासकीय मदत तसेच आरोग्य विमा यांच्या रकमेसाठी फिराफिर करावी लागत असल्याचे अनेकांनी सांगितले.

मदत न मिळण्याची कारणे

१) कोरोनाकाळात सेवा बजावत असताना शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत त्याच्या वारसाला ५० लाखांची मदत देण्याची घोषणा झाली. मात्र, यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ती केली तरी फाइल वेगवेगळ्या विभागांत अनेक दिवस पडून राहत आहे.

२) आरोग्य विमा काढलेला असल्यास त्यात रेमडेसिविर इंजेक्शनची रक्कम देण्यास नकार दिला जातो, तसेच डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचारावेळी वापरलेले साहित्य हॅण्डग्लोव्हज, मास्क, पीपीई किट यांची रक्कम रुग्णांच्या बिलात लावली जाते. मात्र, या डिस्पोजेबल घटकांची रक्कम आरोग्य विम्यात मिळत नाही.

ही घ्या उदाहरणे...

१) मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे कोतवाल म्हणून असलेले बाळू सुखदेव चिखलकर (कोळी) यांचा कोरोनामुळे १८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. मात्र, कुटुबीयांना अजूनही मदत मिळाली नाही.

२) भुसा‌वळ नगरपालिकेतील चार कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नसल्याची माहिती न.पा. वर्कस युनियनचे अध्यक्ष राजू खरारे यांनी दिली.

३) वरणगाव न.पा.चे कर्मचारी सुरेश केशव शेळके यांचादेखील कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या वारसांनी प्रस्ताव सादर केला. मात्र, अजूनही वारसांना मदत मिळालेली नाही.

वेगवेगळ्या ठिकाणी चकरा

प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यात काही त्रुटी काढल्या जात आहेत. त्यांची पूर्तता केली तरी फाइल पुढे सरकत नसल्याने नगरपालिका, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वारसांना चकरा माराव्या लागत आहेत. यात सुरेश शेळके यांचा मुलगा दीपक शेळके हे स्वत: पुणे येथे जाऊन आले व त्यांनी मदतीसाठी पाठपुरावा केला. तरीदेखील मदत मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

अनुकंपावर नोकरी द्या

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचा वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणीही होत आहे.