शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग
2
मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त
3
वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले
4
अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार, ६२२ जणांचा मृत्यू; गावे उद्ध्वस्त, इमारती ढिगाऱ्यात बदलल्या
5
"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
6
बाजाराला 'ट्रम्प टॅरिफ'च्या धक्क्यातून दिलासा! इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' क्षेत्रात तेजी, कुठे झाली घसरण?
7
दरवाजाला कुलूप, प्रियकराला आत लपवलं; महिला कॉन्स्टेबलचं बिंग फुटलं, पोलीस पतीनं लई धुतलं...
8
Raigad: आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक
9
"कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहरेची भावुक पोस्ट
10
'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
11
सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर
12
"मूर्खांना म्हणी पण कळत नाहीत"; अमित शाहांवरील वादग्रस्त विधानानंतर महुआ मोईत्रांची पुन्हा टीका
13
"तुम्ही फार मोठे लोक आहात, तुम्हाला कुणी...", विमानतळावर नेमकं कुणाला काय म्हणाला रोहित शर्मा? VIDEO व्हायरल
14
Maratha Kranti Morcha: मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर!
15
"...तर आमचा देश उद्ध्वस्त होईल"; कोर्टाने टॅरिफचा निर्णय चुकीचा ठरवल्यावर संतापले डोनाल्ड ट्रम्प
16
Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी
17
'जी ले जरा' सिनेमा डबाबंद? फरहान अख्तरने अखेर सोडलं मौन; म्हणाला, "यातील कलाकार..."
18
भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण २०२५: कधी लागेल ग्रहण, भारतात कुठे दिसणार? पाहा, मान्यता
19
Asia Cup 2025साठी ओमानचा संघ जाहीर, पण कर्णधार मात्र भारतीय; जाणून घ्या 'तो' कोण?
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!

राजारामनगरात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

मनपाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासन, मात्र उपाययोजना नाही लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराला लागून असलेल्या कानळदा रस्त्यावरील ...

मनपाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासन, मात्र उपाययोजना नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराला लागून असलेल्या कानळदा रस्त्यावरील राजारामनगरात गेल्या १० वर्षांपासून मनपातर्फे परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन न टाकल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. लोकप्रतिनिधींनी निवडणुकांच्या वेळी आश्वासने दिली. मात्र, गेल्या दहा वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीने आश्वासन पूर्ण केले नसल्याची खंत येथील रहिवाशांनी 'लोकमत' कडे व्यक्त केली.

गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर या परिसरात नागरी वस्ती वाढली. शहराला लागून हा परिसर असला तरी, या भागाची हद्द आव्हाने ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्याचे या रहिवाशांनी सांगितले. मात्र, संबंधित ग्रामपंचायतीकडून या ठिकाणी रस्ते, गटारी ना पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात आली असल्याचे रहिवाशांनी सांगितले. मात्र, शहराला लागून हा भाग असल्याने मनपा प्रशासनानेच या परिसरात सर्व मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी या नागरिकांमधून केली जात आहे. निवडणुकीच्या वेळेला लोकप्रतिनिधी येतात आणि पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन देतात. त्यानुसार गेल्या १० वर्षांत अनेक निवडणुका झाल्या. मात्र, एकही लोकप्रतिनिधीने अद्याप पाण्याची समस्या सोडविली नसल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना बोअरवेलचे पाणी प्यावे लागत असल्याचे या रहिवाशांनी सांगितले. सध्या उन्हाळा सुरू असल्याने येथील बोअरवेलचे पाणी कमी झाल्यामुळे पाण्याची समस्या अधिकच बिकट होत असल्याचेही रहिवाशांनी सांगितले.

इन्फो:

विकतचे घ्यावे लागतेय पाणी

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येथील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून जारचे विकत पाणी घ्यावे लागत आहे. दररोज ५० रुपये खर्च पिण्याच्या पाण्यावर करावा लागत आहे. तर वापरण्यासाठी बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. आतापर्यंत पाण्यावर हजारो रुपये खर्च झाला आहे. तसेच या परिसरात गटारी व रस्ते नसल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

इन्फो :

गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे बोअरवेलचे पाणी तर कधी विकतचे पाणी वापरावे लागत आहे. उन्हाळ्यातही या बोअरवेल आटत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे खूपच हाल होत आहेत.

ज्योती भालेराव, रहिवासी

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पिण्याच्या पाण्यासह रस्ते व गटारींचीही समस्या कायम आहे. मनपाचे व लोकप्रतिनिधी यांचे येथील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. येथील सर्व समस्या माहीत असतानाही लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

लता पवार, रहिवासी

पिण्याच्या पाण्याची मनपाने पाईपलाईन न टाकल्यामुळे रहिवाशांना विकतचे पाणी तर कधी बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. मनपा व लोकप्रतिनिधी यांनी पाण्याच्या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच रस्ते व गटारीच्या समस्याही सोडवाव्यात.

पंकज सैदाने, रहिवासी

इन्फो

हा परिसर आव्हाने परिसरात असून, ग्रामपंचायत किंवा मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली नाही. त्यामुळे रहिवाशांना बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने पाण्याची समस्या सोडावी, ही आमची मागणी आहे.

नीलेश इंगळे, रहिवासी