शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

कमी वेळात अधिक माल विक्रीच्या लगबगीत भाजीपाला नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ असलेल्या खाद्यतेलाचे भाव अजूनही चढेच आहे तर इतर किराणा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ असलेल्या खाद्यतेलाचे भाव अजूनही चढेच आहे तर इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहे. दुसरीकडे कोरोना निर्बंधामुळे किराणा, भाजीपाला विक्री यांच्या वेळांवरही निर्बंध आल्याने कमी वेळात अधिक माल विक्री करण्याच्या प्रयत्नात भाजीपाल्याचे दर ऐन उन्हाळ्यात नियंत्रणात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून चढ-उतार होत असलेल्या खाद्य तेलामध्ये सलग दोन आठवडे मोठी भाववाढ झाली. ती अजूनही कायम आहे. यात तीन आठवड्यांपूर्वी सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १४० ते १४५ रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी त्यात पुन्हा वाढ होऊन सोयाबीन तेलाचे भाव १५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते १८० ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १७५ ते १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. खाद्य तेलातील ही भाववाढ अजूनही कायम आहे.

इतर वस्तू स्थिर

दोन आठवड्यांपूर्वी डाळींचे भावदेखील वाढले व हरभरा डाळीच्या भाववाढीने बेसनपीठदेखील वधारून ते ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. हे भावदेखील कायम आहे. मात्र साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहे.

टमाटे १० रुपयांवर

सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी भाजीपाल्याचे भाव अजूनही स्थिर आहे. कोथिंबीर ४० रुपये किलो तर मेथीही ४५ रुपये किलोवर आहे. टमाट्याचे भाव तर कमी होऊन १० रुपये प्रति किलोवर आले आहे.

लसण खातोय भाव

गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २० रुपये प्रति किलोवर आहेत. यासोबतच कांद्याचे भावदेखील कमी होऊन ते २० रुपये प्रतिकिलोवर आले आहे. मात्र कोरोनामुळे लसण, लिंबू यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव वाढत आहे. लसण १०० ते १४० रुपये तर लिंबू ६० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.

खाद्यतेलाचे भाव कमी होत नसल्याने आर्थिक भार कायम आहे. भाजीपाल्याचे भाव स्थिर असल्याने दिलासा आहे.

- दिलीप सोनवणे, ग्राहक

खाद्यतेलाच्या भाव वाढलेलेच असून इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे. सध्या निर्बंधामुळे मागणी वाढली असली तरी भाव स्थिर आहे.

- सचिन छाजेड, व्यापारी

सध्या भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने त्यांचे भाव स्थिर आहे. लिंबू, लसण यांच्या भावात काहीसी वाढ आहे.

- रमेश वाणी, भाजीपाला विक्रेते