शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

कमी वेळात अधिक माल विक्रीच्या लगबगीत भाजीपाला नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ असलेल्या खाद्यतेलाचे भाव अजूनही चढेच आहेत. तर इतर किराणा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ असलेल्या खाद्यतेलाचे भाव अजूनही चढेच आहेत. तर इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहेत. दुसरीकडे, कोरोना निर्बंधामुळे किराणा, भाजीपाला विक्री यांच्या वेळांवरही निर्बंध आल्याने कमी वेळात अधिक माल विक्री करण्याच्या प्रयत्नात भाजीपाल्याचे दर ऐन उन्हाळ्यात नियंत्रणात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून चढ-उतार होत असलेल्या खाद्यतेलामध्ये सलग दोन आठवडे मोठी भाववाढ झाली. ती अजूनही कायम आहे. यात तीन आठवड्यांपूर्वी सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १४० ते १४५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी त्यात पुन्हा वाढ होऊन सोयाबीन तेलाचे भाव १५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते १८० ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १७५ ते १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. खाद्यतेलातील ही भाववाढ अजूनही कायम आहे.

इतर वस्तू स्थिर

दोन आठवड्यांपूर्वी डाळींचे भावदेखील वाढले व हरभरा डाळीच्या भाववाढीने बेसनपीठदेखील वधारून ते ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. हे भावदेखील कायम आहे. मात्र साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहे.

टोमॅटो १० रुपयांवर

सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी भाजीपाल्याचे भाव अजूनही स्थिर आहेत. कोथिंबीर ४० रुपये किलो तर मेथीही ४५ रुपये किलोवर आहे. टोमॅटोचे भाव तर कमी होऊन १० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.

लसूण खातोय भाव

गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २० रुपये प्रतिकिलोवर आहेत. यासोबतच कांद्याचे भावदेखील कमी होऊन ते २० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. मात्र, कोरोनामुळे लसूण, लिंबू यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव वाढत आहेत. लसूण १०० ते १४० रुपये तर लिंबू ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.

खाद्यतेलाचे भाव कमी होत नसल्याने आर्थिक भार कायम आहे. भाजीपाल्याचे भाव स्थिर असल्याने दिलासा आहे.

- दिलीप सोनवणे, ग्राहक

खाद्यतेलाच्या भाव वाढलेलेच असून इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. सध्या निर्बंधामुळे मागणी वाढली असली तरी भाव स्थिर आहे.

- सचिन छाजेड, व्यापारी

सध्या भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने त्यांचे भाव स्थिर आहेत. लिंबू, लसूण यांच्या भावात काहीसी वाढ आहे.

- रमेश वाणी, भाजीपाला विक्रेते