शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कमी वेळात अधिक माल विक्रीच्या लगबगीत भाजीपाला नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ असलेल्या खाद्यतेलाचे भाव अजूनही चढेच आहेत. तर इतर किराणा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ असलेल्या खाद्यतेलाचे भाव अजूनही चढेच आहेत. तर इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहेत. दुसरीकडे, कोरोना निर्बंधामुळे किराणा, भाजीपाला विक्री यांच्या वेळांवरही निर्बंध आल्याने कमी वेळात अधिक माल विक्री करण्याच्या प्रयत्नात भाजीपाल्याचे दर ऐन उन्हाळ्यात नियंत्रणात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून चढ-उतार होत असलेल्या खाद्यतेलामध्ये सलग दोन आठवडे मोठी भाववाढ झाली. ती अजूनही कायम आहे. यात तीन आठवड्यांपूर्वी सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १४० ते १४५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी त्यात पुन्हा वाढ होऊन सोयाबीन तेलाचे भाव १५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते १८० ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १७५ ते १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. खाद्यतेलातील ही भाववाढ अजूनही कायम आहे.

इतर वस्तू स्थिर

दोन आठवड्यांपूर्वी डाळींचे भावदेखील वाढले व हरभरा डाळीच्या भाववाढीने बेसनपीठदेखील वधारून ते ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. हे भावदेखील कायम आहे. मात्र साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहे.

टोमॅटो १० रुपयांवर

सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी भाजीपाल्याचे भाव अजूनही स्थिर आहेत. कोथिंबीर ४० रुपये किलो तर मेथीही ४५ रुपये किलोवर आहे. टोमॅटोचे भाव तर कमी होऊन १० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.

लसूण खातोय भाव

गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २० रुपये प्रतिकिलोवर आहेत. यासोबतच कांद्याचे भावदेखील कमी होऊन ते २० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. मात्र, कोरोनामुळे लसूण, लिंबू यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव वाढत आहेत. लसूण १०० ते १४० रुपये तर लिंबू ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.

खाद्यतेलाचे भाव कमी होत नसल्याने आर्थिक भार कायम आहे. भाजीपाल्याचे भाव स्थिर असल्याने दिलासा आहे.

- दिलीप सोनवणे, ग्राहक

खाद्यतेलाच्या भाव वाढलेलेच असून इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. सध्या निर्बंधामुळे मागणी वाढली असली तरी भाव स्थिर आहे.

- सचिन छाजेड, व्यापारी

सध्या भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने त्यांचे भाव स्थिर आहेत. लिंबू, लसूण यांच्या भावात काहीसी वाढ आहे.

- रमेश वाणी, भाजीपाला विक्रेते