शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ठेकेदार घुसले अन् ‘जलयुक्त शिवार’ला भ्रष्टाचाराची किड लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 13:04 IST

डॉ. राजेंद्रसिंह : ‘जलयुक्त शिवार’ बंद करणे ही राज्य सरकारची चूकच, पाण्यात राज्य पडले मागे, ‘लोकमत’ भेटीत व्यक्त केल्या भावना

ठळक मुद्देलोकमत संवाद

जळगाव : राज्य सरकारचा ‘जलयुक्त’ शिवार हा एक चांगला प्रकल्प होता. खरं तर तो देशासाठी एक दिशादर्शी ठरणारा प्रकल्प ठरला असता; परंतु या प्रकल्पाची आखणी करताना लोकसहभाग महत्वाचा मानला होता आणि ठेकेदारापासून हा प्रकल्प लांब ठेवावा, असे आम्ही सुचवले होते. मात्र यामध्ये ठेकेदार घुसले आणि त्यामुळे हा प्रकल्प सपशेल अयशस्वी झाला. स्पष्टपणे सांगायचं तर या कामात मोठा भ्रष्टाचार झाला तरीही ही योजना बंद करणे चुकीचे आहे, उलट त्यात सुधारणा करून ती नव्याने राबवायला हवी होती, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.महाराष्ट्रात ५५ टक्के पाण्याचं हे बाष्पीभवन होते, त्यामुळे आता महाराष्ट्राला धरणांमध्ये ड्रेझिंग करून पाणी साठवून ठेवण्यासारखा पर्याय शोधावा लागेल, असे ते म्हणाले.डॉ. सिंह यांनी बुधवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ शहर कार्यालयाला भेट दिली, यावेळी ते बोलत होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी त्यांचे स्वागत केले.डॉ. सिंह यांच्यासोबत लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे उपस्थित होत्या.जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यासाठी त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. ही योजना आपण आणि प्रभाकर देशमुख यांनी तयार केली, त्यावेळी मी आवर्जून लिहीले होते, त्याप्रमाणे ही योजना फक्त लोकसहभागातून राबवली पाहिजे. कारण या योजनेने पहिल्या वर्षी ३०० करोडची, दुसऱ्यावर्षी ४०० करोडची कामे झाली. या योजनेत ठेकेदार आला अन् भ्रष्टाचाराला सुरुवात झाली, असे ते म्हणाले.जलयुक्त शिवारच्या कामाची जबाबदारी ही पंचायत व ग्रामसभांवर दिली गेली पाहिजे तरच ती यशस्वी होऊ शकेल. एक काळ असा होता की, पाण्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे क्रमांक एकचे राज्य होते. आज आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्र क्रमांक एक ठरतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.देशातील ४३ टक्के धरणे ही महाराष्ट्रात आहेत; परंतु अनेक धरणे गेल्या वर्षी कोरडी होती. कारण ही धरणे कोणताही वैज्ञानिक, भौगोलिक विचार न करता उभारण्यात आली आहेत. दुसरे म्हणजे, लातूरसारख्या पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यात साखर कारखाने उभारण्यात आले आहेत.पाण्याचा आराखडा तयार करताना ज्या पध्दतीने विचार करायला हवा, तो न करता कोणताही उद्योग, कारखाना कोठेही आणून ठेवला, त्यामुळे पाण्याची भीषणता जास्त जाणवत आहे, असे ते म्हणाले.

जळगावात केळीचे उत्पादन करणे चूककेळीचे उत्पादन हे दमट हवामानाच्या प्रदेशात झाले पाहिजे. जळगावचे हवामान हे दमट नाही, त्यामुळे याठिकाणी केळीचे उत्पादन घेणे चुकीचे आहे. कारण केळीच्या उत्पादनाला पाणी जास्त लागते. यामुळेच जळगावात पाण्याची टंचाई जाणवते, असे ते म्हणाले. खरी बँक आरबीआय नाही तर धरतीच्या पोटातील पाणी ही खरी बँक आहे. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसारच त्या त्याठिकाणी पिके घेतली पाहिजेत, असे मत राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव