शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

दुषित पाणी पुरवठ्यामुळे  उभा राहिला आरोग्याचा प्रश्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 22:50 IST

जोंधनखेड्याची समस्या : दुर्लक्ष होत असल्याने नाराजी 

मुक्ताईंनगर :     तालुक्यातील जोंधनखेडा येथे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा केला जात असून या संदर्भात वारंवार तक्रार करून देखील ग्रामपंचायत स्तरावर कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.   तालुक्यातील जोंधनखेडा हे जवळपास चार ते पाच हजार लोकवस्ती असलेले कुऱ्हा  परिसरातील अतिशय महत्त्वपूर्ण व मुक्ताईनगर तालुक्यातील शेवटचे गाव आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक विहीर असून या विहिरी वरूनच पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. संपूर्ण गावात पाईपलाईन करण्यात आलेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जोंधनखेडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या या एकमेव विहिरीचे पाणी अशुद्ध झाले असून घाण या पाण्यात साचलेली आहे , तसेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. विशेष म्हणजे गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन देखील ठिकाणी फुटलेली असून पाणी गळती तर होतच आहे. परंतु त्यासोबतच पाण्यामध्ये पाईपलाईन द्वारेही घाण शिरत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना मुतखड्याचे आजार झाले आहेत. या संदर्भात ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारे उपाययोजना होत नाही, अशी ओरड आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडेही तक्रार केलेली आहे.  त्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.