शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

भुसावळात लोकवर्गणीतून विंधन विहिरीची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:54 IST

भुसावळ शहरासह परिसरातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यामुळे पापानगरातील मुस्लीम समाज बांधवांनी लोकवर्गणीतून विंधन विहीर (बोरिंग) तयार करून पाण्याची सोय केली, तर गौसियानगरात युवकांनी बंद पडलेले हातपंप (हापसी) लोकवर्गणीतून दुरुस्ती करून पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देभुसावळातील पाणी प्रश्न गंभीरबुजलेली विहीर २२ फूट खोदलीबंद विंधन विहिरी सुरू करण्यावर भरनगरसेवकांकडून ठराविक भागात पाणीपुरवठा

भुसावळ : शहरासह परिसरातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यामुळे पापानगरातील मुस्लीम समाज बांधवांनी लोकवर्गणीतून विंधन विहीर (बोरिंग) तयार करून पाण्याची सोय केली, तर गौसियानगरात युवकांनी बंद पडलेले हातपंप (हापसी) लोकवर्गणीतून दुरुस्ती करून पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, याच भागात बंद पडलेली (बुजलेली) विहीर युवकांनी पुढाकार घेऊन खोदण्यास सुरुवात केली आहे. शासनाकडून केवळ घोषणाबाजी होत आहे. प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळत नसल्याची या भागातील रहिवाशांची ओरड आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदी पात्राने तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीप्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. शहरांत बारा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. घोटभर पाण्यासाठी लोकांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे.पापानगर भागामध्ये पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाल्यामुळे शासन दरबारी अनेक वेळा पाण्यासाठी नियोजन करण्याची मागणी केली गेली. मात्र दरवेळी करू, बघू, पाहू अशी उत्तरे मिळाली. प्रत्यक्षात कृती मात्र शून्य झाली.मत्शिदीचे मौलाना आले पुढेपाण्यासाठी आता स्वत: पुढाकार घेऊन काहीतरी नियोजन करावे लागेल या उद्देशातून पापानगर मशीदचे हजरत इरफान मौलाना व समाज बांधवांनी लोकवर्गणी करून पापानगरात बोरिंग केली. या भागाला या माध्यमातून सकाळी दोन व संध्याकाळी दोन तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे.गौसियानगर भागांमध्येही पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. या ठिकाणी युवकांनी पालिकेची बंद पडलेल्या हातपंपाची तांत्रिकदृष्ट्या आलेली अडचण लोकवर्गणीतून दूर करून येथील भागातील परिसरातील नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था केली. शिवाय याच भागाच्या दुसºया टोकावरही अशाच पद्धतीने शेख मुख्तार शेख गफूर, शेख मुस्तफा मोहम्मद हरून खाटीक, रोशन इब्राहिम पिंजारी, कलीम अय्युब खान, अजिज शेख उस्मान, आबीद पिंजारी सरदार चव्हाण, शेख भुºया सद्दाम, आबीद याकूब पिंजारी या युवकांनी पुढाकार घेऊन दुसºया टोकावरचा बंद पडलेला हातपंप सुरू केला. यामुळे या भागातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.बुजलेली विहीर खोदली९ वर्षापूर्वी बुजलेली विहीर या युवकांनी सकाळी व संध्याकाळी दोन सत्रामध्ये स्वत: उत्खनन करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत या युवकांनी २३ फूट खोल विहिरीचे उत्खनन केले आहे. या भागातील वृद्ध, दिव्यांग महिला घोटभर पाण्यासाठी वणवण भटकत असतात.वेळेप्रसंगी पाण्यासाठी भांडणतंटेही होतात. शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा काही उपयोग होत नसल्यामुळे स्वत: युवकांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांचे होणारे हाल विशेषता वृद्धांचे व महिलांचे हाल पाहिले जात नाही अशी वेदना नागरिकांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत असल्याचे चित्र आहे.दरम्यान, ठराविक नगरसेवक पाहिजे त्या प्रभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहेत. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ असा प्रत्यय शहरवासीयांना येत आहे तर खासगी टँकरवाले अव्वाच्या सव्वा भावाने पाण्याच्या टँकरचा दर आकारत असल्याची स्थिती आहे.पाण्यासारख्या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून बंद पडलेली मशिदीच्या मालकीची बोर दुरुस्तीसाठी समाजबांधवांना आवाहन करण्यात आले. सर्वांच्या सहकार्यातून अखेर बोर दुरुस्त करण्यात आली.-मोहमद इरफान राजा खान कादरी, मौलाना, पापानगर मशीद, भुसावळ.पालिका प्रशासनाकडून नवीन विंधन विहिरींसाठी ठराव मंजूर झालेले आहेत. जुन्या विहिरीतील ही गाळ काढून उपसा करण्यात येईल व त्याद्वारे नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यात येईल. सध्या ज्या भागांमध्ये पाण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.-महेंद्रसिंग ठाकूर, पाणीपुरवठा समिती सभापती, भुसावळ नगरपालिका.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ