शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिलासा..विमानाने मुंबईला जाणाऱ्यांची "आरटीपीसीआर" होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगावसह राज्यातील इतर कुठल्याही विमान तळावरून मुंबई विमानतळावर जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची करण्यात येणारी आरटीपीसीआर चाचणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगावसह राज्यातील इतर कुठल्याही विमान तळावरून मुंबई विमानतळावर जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची करण्यात येणारी आरटीपीसीआर चाचणी १ जून पासून बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. मात्र, जळगाव विमान तळावरून सध्या मुंबईची आठवड्यातून दोनच दिवस सेवा सुरू असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावरील अनेक उड्डाणानां निर्बंध घातले होते. यामध्ये जळगाव ते मुंबई विमान सेवा पुरविणाऱ्या कंपनीचाही समावेश होता. तर मुंबई महापालिका प्रशासनाने राज्यासह देशभरातून कुठूनही विमानाने मुंबई येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांसाठी 'आरटीपीसीआर' चाचणी बंधनकारक केली होती. मुंबई विमानतळावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत असल्यामुळे भीती पोटी अनेकजण विमान प्रवास टाळत होते. यामुळे याचा विमानाच्या प्रवाशी संख्येवरही मोठा परिणाम झाला होता.

मात्र,राज्य शासनाने १ जून पासून लॉकडाऊन मधून काहीशी शिथिलता उठविल्याने, मुंबई मनपा प्रशासनानेही विमान तळावरील आरटीपीसीआर चाचणीचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयाचे प्रवाशांमधून स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, जळगावला विमान सेवा देणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक अखिलेश सिंग यांनी मुंबई मनपाच्या निर्णयानुसार आमच्या कुठल्याही प्रवाशांची मुंबई अथवा जळगाव विमान तळावरही आरटीपीसीआर चाचणी केली जाणार नसल्याचे सांगितले. मात्र, ज्या नागरिकांना कोरोना सदृश लक्षणे आढळून येतील, त्यांनी स्वतःहून विमान प्रवास टाळण्याचे आवाहनही अखिलेश सिंग यांनी केले आहे.

इन्फो :

लवकरच आठवड्यातून तीन दिवस सेवा

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार जळगावहून मुंबईसाठी आठवड्यातून दर बुधवारी व रविवारी मुंबईची सेवा सुरू आहे. तर आता लॉकडाऊन मध्ये काहीशी शिथिलता उठविल्यानंतर आणखी एक दिवस मुंबईची सेवा वाढणार आहे. तर शक्य झाल्यास शनिवारीही मुंबईची विमान सेवा राहणार असल्याचे अखिलेश सिंग यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईची विमानसेवा नियमित झाल्यावर प्रवाशांचाही प्रतिसाद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.