शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसची खान्देपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 12:50 IST

लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी

चंद्रशेखर जोशीजिल्ह्यातील कॉँग्रेस पक्षाला एक वेगळी ओळख आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेली ही ओळख राष्टÑीय अधिवेशनामुळे अधिकच गडद झाली. याचे परिणाम नंतरच्या कालखंडात पक्षाची जिल्ह्याच्या राजकारणावर असलेली पकड अनेक शतके कायम होती.कॉँग्रेस म्हणेल ती दिशा राजकीय क्षेत्रात असायची. पक्षाची कोणत्याही संस्थेत किंवा मतदार संघात उमेदवारी मिळावी यासाठी मोठी चढओढ असायची. मात्र ९० च्या दशकानंतर हळू हळू उतरती कळा या पक्षाला लागली. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, सहकार क्षेत्रातील संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था अगदी एक-एक संस्था भाजपाने ताब्यात घेण्यास सुरूवातकेली. अगदी संस्थान खालसा व्हावे तद्वतच पक्षाच्या ताब्यातून या संस्था गेल्या. २०१४ च्या विधानभा निवडणुकीनंतर तर अतिशय दयनिय स्थिती या पक्षाची झाली. आता तर उमेदवारी घ्यायला कोणी तयार नसते अशी परिस्थिती पक्षाची झाली असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. मात्र स्थानिक काही पदाधिकाऱ्यांनी यश मिळो न मिळो लढत रहायचे अशीच भूमिका ठेवली आहे. महापालिकेत यश मिळत नसले तरी लढायचे हीच भूमिका त्यांनी ठेवली. नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज बुलंद ठेवला. अशा काही मोजक्या पदाधिकाºयांमध्ये पक्षाचे महानगर कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचे नाव निश्चितच घेतले जाते. महापालिका क्षेत्रातील नागरी समस्यांचे विषय असो किंवा समांतर रस्त्याचा विषय या संदर्भात डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आवाज उठविला. केवळ आंदोलन न करता मुख्यमंत्र्यांना व्टिटरवरून सतत पाठपुरावा त्यांनी करून समांतर रस्त्यांचा कामांचा पाठपुरावा केला. सत्ताधाºयांवर याप्रश्नी वेळोवेळी धारेवर धरले. त्यांच्या आंदोलनांची विविध पातळ्यांवर निश्चितच दखल घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता पक्षानेही दखल घेतली असल्याचेच म्हणावे लागेल. कॉँग्रेस पक्षाने राज्यातील १३ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या नव्याने नियुक्त्या केल्या. त्यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. राधेश्याम चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल पक्षाने केल्याचे दिसून येते. पद मिळाल्याने आगामी आव्हांनांना सामोरे जाण्याची जबाबदारी आता डॉ. चौधरी यांच्यावर आली आहे. मावळते अध्यक्ष डॉ. ए.जी. भंगाळे यांनीही वेळोवेळी आपल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. येत्या काळात लोकसभा व त्यानंर लगेच विधानसभांच्या निवडणुका आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी कॉँग्रेसने नव्या व तरूण व्यक्तीमत्वाला संधी दिल्याचेच या निमित्तान लक्षात येत आहे.