शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कॉँग्रेसची खान्देपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 12:50 IST

लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी

चंद्रशेखर जोशीजिल्ह्यातील कॉँग्रेस पक्षाला एक वेगळी ओळख आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेली ही ओळख राष्टÑीय अधिवेशनामुळे अधिकच गडद झाली. याचे परिणाम नंतरच्या कालखंडात पक्षाची जिल्ह्याच्या राजकारणावर असलेली पकड अनेक शतके कायम होती.कॉँग्रेस म्हणेल ती दिशा राजकीय क्षेत्रात असायची. पक्षाची कोणत्याही संस्थेत किंवा मतदार संघात उमेदवारी मिळावी यासाठी मोठी चढओढ असायची. मात्र ९० च्या दशकानंतर हळू हळू उतरती कळा या पक्षाला लागली. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, सहकार क्षेत्रातील संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था अगदी एक-एक संस्था भाजपाने ताब्यात घेण्यास सुरूवातकेली. अगदी संस्थान खालसा व्हावे तद्वतच पक्षाच्या ताब्यातून या संस्था गेल्या. २०१४ च्या विधानभा निवडणुकीनंतर तर अतिशय दयनिय स्थिती या पक्षाची झाली. आता तर उमेदवारी घ्यायला कोणी तयार नसते अशी परिस्थिती पक्षाची झाली असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. मात्र स्थानिक काही पदाधिकाऱ्यांनी यश मिळो न मिळो लढत रहायचे अशीच भूमिका ठेवली आहे. महापालिकेत यश मिळत नसले तरी लढायचे हीच भूमिका त्यांनी ठेवली. नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज बुलंद ठेवला. अशा काही मोजक्या पदाधिकाºयांमध्ये पक्षाचे महानगर कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचे नाव निश्चितच घेतले जाते. महापालिका क्षेत्रातील नागरी समस्यांचे विषय असो किंवा समांतर रस्त्याचा विषय या संदर्भात डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आवाज उठविला. केवळ आंदोलन न करता मुख्यमंत्र्यांना व्टिटरवरून सतत पाठपुरावा त्यांनी करून समांतर रस्त्यांचा कामांचा पाठपुरावा केला. सत्ताधाºयांवर याप्रश्नी वेळोवेळी धारेवर धरले. त्यांच्या आंदोलनांची विविध पातळ्यांवर निश्चितच दखल घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता पक्षानेही दखल घेतली असल्याचेच म्हणावे लागेल. कॉँग्रेस पक्षाने राज्यातील १३ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या नव्याने नियुक्त्या केल्या. त्यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. राधेश्याम चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल पक्षाने केल्याचे दिसून येते. पद मिळाल्याने आगामी आव्हांनांना सामोरे जाण्याची जबाबदारी आता डॉ. चौधरी यांच्यावर आली आहे. मावळते अध्यक्ष डॉ. ए.जी. भंगाळे यांनीही वेळोवेळी आपल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. येत्या काळात लोकसभा व त्यानंर लगेच विधानसभांच्या निवडणुका आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी कॉँग्रेसने नव्या व तरूण व्यक्तीमत्वाला संधी दिल्याचेच या निमित्तान लक्षात येत आहे.