जळगाव : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवीत, कृषी कायदा रद्द करण्याची मागणी करत शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. सात दिवसांपासून पंजाब व हरियाणा मधील करोडो शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात रस्त्यावरती उतरून सुमारे 96 हजार ट्रॅक्टर सोबत 1कोटी 20 लाख शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याचे देशाने बघितले असून, या शेतकऱ्यांनी दिल्लीला येऊ नये याकरिता मोदी सरकारने या शेतकऱ्यांवर अमानुषपणे अत्याचार करत लाठीचार्ज, पाण्याचा मारा व रस्ते खोदण्यापासून असे अनेक अत्याचार या शेतकरी बांधवांवरती केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेसच्या वतीने पाठिंबा देण्याकरत संपूर्ण राज्यामध्ये एक दिवसीयय धरणे आंदोलन करण्यात आले, त्याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 3 वाजता हे धरणे आंदोलन केले. यावेळी एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, ब्लॉक अध्यक्ष नदिम काझी, सुरेश पाटील, जनार्दन पाटील, शफी बागवान, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष अमजद पठाण, जिल्हा सचिव जमील शेख, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, मनोज सोनवणे जाकीर बागवान, प्रदीप सोनवणे जगदीश गाडे, विष्णू घोडेस्वार, दीपक सोनवणे, योगेश देशमुख, सुरेंद्र कोल्हे, सागर सपके, युवक शहराध्यक्ष मुजीब पटेल, भाऊसाहेब सोनवणे, परवेज पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.