शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पारोळा येथे कापूस खरेदी केंद्रावर टोकन वाटपावरून गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 15:51 IST

गेल्या शुक्रवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कापूस माल विक्रीचे टोकन देणे बंद झाल्याने २४ रोजी मोठा उद्रेक व्यापारी वजा शेतकऱ्यांनी केला.

ठळक मुद्देपोलिसांच्या मध्यस्थीने मिटला वादबाजार समिती आवारात दीड-दोनशे वाहनांचा गराडा

पारोळा, जि.जळगाव : गेल्या शुक्रवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कापूस माल विक्रीचे टोकन देणे बंद झाल्याने २४ रोजी मोठा उद्रेक व्यापारी वजा शेतकऱ्यांनी केला. टोकन वाटपात वशिलाबाजीचा होत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी या वेळी केला. मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापारी यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १५०-२०० कापसाने भरलेल्या वाहनांचा गराडा यावेळी पडला होता. महामार्गाला लागून या कापूस विक्रीच्या रांगा लागलेला होत्या. या वेळी व्यापारी शेतकरी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांच्यात टोकन देण्यावरून चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांच्या मध्यस्थीने या वादावर अखेर पडला. अर्धा तास काही जणांना टोकन वाटप करण्यात आले. त्यानंतर वाढता गोंधळ पाहून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी टोकन वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला.दळवेल, ता.पारोळा, ओम नमोशिवाय जिनिंग, बालाजी कोटेक्स या तीन केंद्रांवर पणनच्या माध्यमातून शेतकºयांचा कापूस खरेदी केला जात होता. यात कृषी उत्पन्न बाजार समितीकडून टोकन देणे बंद करण्यात आले होते. यामुळे तिन्ही केंद्रांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रमेश चौधरी यांनी ही सर्व वाहने बाजार समितीच्या आवारात आणा. येथून टोकन घेऊ. मग खरेदी केंद्रावर घेऊन जा, असा फतवा काढला. यामुळे १५० ते २०० वाहने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आली. यामुळे वाहने लावण्यास जागा नव्हती. महामार्गालगतदेखील वाहने उभी होती. मग टोकन देण्यावरून खूप वाद झाले. गोंधळ वाढत असल्याने मग पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर व पोलिसांनी मध्यस्थी करीत या वादावर पडदा पडला. त्यानंतर पुन्हा गोंधळ वाढत होता. यामुळे मग सभापती अमोल पाटील यांनी मग टोकन वाटप थांबविली.या वेळी सभापती अमोल पाटील यांच्याशी चर्चा केली असता ग्रेडरचे व्यापाºयाशी संगतमत होते, व्यापाºयांचा माल ग्रेडर सर्रास कोणतीही कट्टी न लावता मोजत होते. पण एखाद्या शेतकºयाचे वाहन आले की कट्टी लावत होते. वास्तविक ग्रेडर यांना कट्टी लावण्याचा अधिकार नसतानाही ते शेतकºयांच्या मालाला कट्टी लावत आहेत. मग शेतकºयांची लूट होत होती. यात ग्रेडर आणि व्यापारी संगनमताने गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप सभापती अमोल पाटील यांनी केला. व्यापारी शेतकºयांचे सातबारा उतारे घेऊन माल विक्री करीत आहे. हा गोंधळ पाहून टोकन वाटपाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.दरम्यान, बाजार समितीचे सचिव रमेश चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता तो होऊ शकला नाहीशेतकºयांनी वाहनाचे भाडे आणि खुंटी का भरावी?कापूस खरेदी केंद्रावर गेले की कापूस तत्काळ मोजला जात नाही. त्याच वाहनाला २२०० रुपये भाडे आणि ७०० रुपये खुटी लागते. गेल्या शुक्रवारपासून आमची वाहने ही जिनच्या बाहेर उभी आहेत. मग आम्ही भाडे आणि खुटी का भरावी? एका बाजूला ग्रेडर आमच्या मालाला कट्टी लावता. पण व्यापाºयाचा माल तो कसाही असो त्याला पहिली ग्रेड दिली जाते. मग आम्ही काय पाप केले आहे? ते आमच्याबाबतीत असे घडते, अशी संतप्त प्रतिक्रिया शेवगे बुद्रूक येथील शेतकरी धनंजय भिला पाटील यांनी व्यक्त केली.