शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

ऐनपूर येथे ग्रामपंचायत मतदार याद्यांमध्ये घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:16 IST

२५ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीने मीटिंग घेऊन ठराव केला की, २०१५ची वॉर्डरचना जी होती ती तशीच असावी, त्यामध्ये कुठलाही ...

२५ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीने मीटिंग घेऊन ठराव केला की, २०१५ची वॉर्डरचना जी होती ती तशीच असावी, त्यामध्ये कुठलाही बदल करू नये, असा ठराव ग्रामपंचायतीने केलेला होता. तरीदेखील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला दिसून येत आहे. यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी सोनवणे हे ग्रामपंचायतीमध्ये आलेले होते, त्यांनी लोकांच्या समस्या समजून घेतल्या व वाॅर्डची रचना ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने राहील असे सांगितले. येथे एकूण पाच वॉर्ड असून, काही लोकांची नावे आलेल्या मतदार यादीतून गायब आहेत, तर काहींची नावे दुसऱ्याच वाॅर्डात आहेत. एकाच कुटुंबातील काही लोकांची नावे वाॅर्ड दोनमध्ये तर काही लोकांची नावे वाॅर्ड तीनमध्ये अशी विभागणी केलेली आहेत. गावातील शेकडो नागरिकांनी मतदार यादी बघण्यासाठी गर्दी केली होती तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे. नागरिकांनी गावातील तलाठ्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे की, जो ज्या वाॅर्डात आहे त्या वाॅर्डात घेऊनच वाॅर्डांची पुनर्रचना करावी. मात्र याबाबत तलाठी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकसुद्धा उपस्थित नसतात. त्याचा या ग्रामपंचायतीत मनमानी व भोंगळ कारभार सुरू आहे. लवकरच निवडणूक होऊन एक सुनियोजित प्रशासन बघायला मिळेल, अशी अपेक्षा गावकरी करीत आहेत. जेणेकरून गावाचा विकास होईल, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. वाॅर्डांची पुनर्रचना करण्यात आली नाही तर ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

यावेळी ग्रामपंचायतींमध्ये अनेक आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यामध्ये रवींद्र महाजन, गणेश पाटील, मनोहर महाजन, धोंडू पाटील, रमेश पाटील, प्रभाकर पाटील, रूपेश महाजन, नितीन जैतकर, सुनील खैरे, सतीश पाटील, शुभम पाटील, संदेश महाजन, यश महाजन आदी उपस्थित होते.